शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

दिल्लीतील निवडणुकीनंतर गोव्यात मंत्रिमंडळ फेररचना; CM प्रमोद सावंत यांनी घेतली अमित शाह यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2025 13:25 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतरच गोव्यात मंत्रिमंडळ फेररचना केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन गोव्यातील राजकीय स्थितीची कल्पना त्यांना दिली. दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतरच गोव्यात मंत्रिमंडळ फेररचना केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्याबद्दल आधीच नाराजी आहे. त्यामुळे त्यांना डच्चू दिला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. मंत्रिमंडळ फेरबदलाचा बोलबाला असतानाच मुख्यमंत्र्यांनी शाह यांच्या घेतलेल्या भेटीमुळे या चर्चेला वेग आला आहे.

दरम्यान, राज्यात नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून दामू नाईक यांची झालेली निवड, तसेच सुमारे ४ लाख २५ हजार जणांनी पक्षाची घेतलेली सदस्यता यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी शाह यांना माहिती दिली. सावंत यांनी बैठकीनंतर सोशल मीडियावर शाह यांना विविध विषयांची माहिती दिली तसेच त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली, एवढेच म्हटले आहे.

अर्थमंत्री सीतारामण यांनाही सावंत भेटले

सावंत यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचीही दिल्लीत भेट घेतली. सोळाव्या वित्त आयोगासमोर मांडलेल्या मागण्यांविषयी सावंत यांनी त्यांना माहिती दिली. तसेच आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात गोव्याबद्दल विशेष विचार व्हावा, अशी विनंती केली. सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगरिया तसेच सदस्य अजय नारायण झा व अजय पांडा गेल्या ९ रोजी गोवा भेटीवर आले असता वेगवेगळ्या खात्यांच्या १३ प्रस्तावित प्रकल्पांसह अन्य कामांसाठी राज्य सरकारने आयोगाकडे एकूण ३२,७४६ कोटी रुपये निधीची मागणी केल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी अर्थमंत्र्यांना सांगितले.

२१ गावांसाठी पुन्हा केंद्राला साकडे

गोव्यातील पश्चिम घाटात येणाऱ्या पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील अधिसूचित १०८ गावांपैकी २१ गावे वगळावीत, तसेच २०१९च्या सीझेडएमपीला अंतिम स्वरूप देण्याची मागणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी दिल्लीत केंद्रीय पर्यावरण तथा वनमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन केली. बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, गोव्याच्या शाश्वत विकासाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर यादव यांच्याशी मी चर्चा केली. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने गोव्यातील १०८ गावे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील अधिसूचित केली आहेत. स्थानिकांचा या गोष्टीला विरोध आहे. २१ गावे वगळावीत, अशी सरकारची मागणी आहे. तीन निकषांवर गावे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील ठरविली आहेत. खाणी वगैरे व्यावसायिक तत्त्वावर चालवता येणार नाहीत. तसेच बांधकामांवरही निर्बंध येतील. त्यामुळे स्थानिक नाराज आहेत.

१४६१ चौरस किमी क्षेत्र

अधिसूचनेनुसार गोव्यात पश्चिम घाटातील १४६१ चौरस किमी क्षेत्राचा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील विभागात समावेश झालेला असून सत्तरी तालुक्यात ५६, काणकोणात ५ व सांगे ३८ व इतर मिळून १०८ गावांचा यात समावेश आहे. सत्तरीत भिरोंडा, पिसुर्ले सारख्या ठिकाणी खाणी आहेत.

उद्या हा भाग जर पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील अधिसूचित केला गेला तर खाणीही सुरू करणे अशक्य होईल. सांगे तालुक्यातही हीच स्थिती आहे, त्यामुळे आरोग्य मंत्री विश्वजित राणे तसेच समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांचाही विरोध आहे. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतAmit Shahअमित शाह