शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
4
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
5
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
6
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
7
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
8
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
9
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
10
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
11
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
12
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
13
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
14
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
15
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
16
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
17
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
18
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
19
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
20
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू

दिल्लीतील निवडणुकीनंतर गोव्यात मंत्रिमंडळ फेररचना; CM प्रमोद सावंत यांनी घेतली अमित शाह यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2025 13:25 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतरच गोव्यात मंत्रिमंडळ फेररचना केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन गोव्यातील राजकीय स्थितीची कल्पना त्यांना दिली. दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतरच गोव्यात मंत्रिमंडळ फेररचना केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्याबद्दल आधीच नाराजी आहे. त्यामुळे त्यांना डच्चू दिला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. मंत्रिमंडळ फेरबदलाचा बोलबाला असतानाच मुख्यमंत्र्यांनी शाह यांच्या घेतलेल्या भेटीमुळे या चर्चेला वेग आला आहे.

दरम्यान, राज्यात नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून दामू नाईक यांची झालेली निवड, तसेच सुमारे ४ लाख २५ हजार जणांनी पक्षाची घेतलेली सदस्यता यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी शाह यांना माहिती दिली. सावंत यांनी बैठकीनंतर सोशल मीडियावर शाह यांना विविध विषयांची माहिती दिली तसेच त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली, एवढेच म्हटले आहे.

अर्थमंत्री सीतारामण यांनाही सावंत भेटले

सावंत यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचीही दिल्लीत भेट घेतली. सोळाव्या वित्त आयोगासमोर मांडलेल्या मागण्यांविषयी सावंत यांनी त्यांना माहिती दिली. तसेच आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात गोव्याबद्दल विशेष विचार व्हावा, अशी विनंती केली. सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगरिया तसेच सदस्य अजय नारायण झा व अजय पांडा गेल्या ९ रोजी गोवा भेटीवर आले असता वेगवेगळ्या खात्यांच्या १३ प्रस्तावित प्रकल्पांसह अन्य कामांसाठी राज्य सरकारने आयोगाकडे एकूण ३२,७४६ कोटी रुपये निधीची मागणी केल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी अर्थमंत्र्यांना सांगितले.

२१ गावांसाठी पुन्हा केंद्राला साकडे

गोव्यातील पश्चिम घाटात येणाऱ्या पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील अधिसूचित १०८ गावांपैकी २१ गावे वगळावीत, तसेच २०१९च्या सीझेडएमपीला अंतिम स्वरूप देण्याची मागणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी दिल्लीत केंद्रीय पर्यावरण तथा वनमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन केली. बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, गोव्याच्या शाश्वत विकासाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर यादव यांच्याशी मी चर्चा केली. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने गोव्यातील १०८ गावे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील अधिसूचित केली आहेत. स्थानिकांचा या गोष्टीला विरोध आहे. २१ गावे वगळावीत, अशी सरकारची मागणी आहे. तीन निकषांवर गावे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील ठरविली आहेत. खाणी वगैरे व्यावसायिक तत्त्वावर चालवता येणार नाहीत. तसेच बांधकामांवरही निर्बंध येतील. त्यामुळे स्थानिक नाराज आहेत.

१४६१ चौरस किमी क्षेत्र

अधिसूचनेनुसार गोव्यात पश्चिम घाटातील १४६१ चौरस किमी क्षेत्राचा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील विभागात समावेश झालेला असून सत्तरी तालुक्यात ५६, काणकोणात ५ व सांगे ३८ व इतर मिळून १०८ गावांचा यात समावेश आहे. सत्तरीत भिरोंडा, पिसुर्ले सारख्या ठिकाणी खाणी आहेत.

उद्या हा भाग जर पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील अधिसूचित केला गेला तर खाणीही सुरू करणे अशक्य होईल. सांगे तालुक्यातही हीच स्थिती आहे, त्यामुळे आरोग्य मंत्री विश्वजित राणे तसेच समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांचाही विरोध आहे. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतAmit Shahअमित शाह