शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

पैसेवाल्यांची दादागिरी, पोलिसांचीही कसोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 11:16 IST

जनतेत संताप व्यक्त होत आहे. 

बाणस्तारी येथील अपघात पूर्ण गोमंतकीय समाजाला सुन्न करणारा ठरला आहे. चार दिवस उलटले, तरी राज्यभर केवळ त्याचीच चर्चा सुरू आहे. तिघा निष्पाप व्यक्तींचा जीव घेणारा वाहन चालक कुणीही असो; पण तो सुटू नये ही सगळ्यांचीच भावना आहे. चालक परेश सावर्डेकरविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला असला तरी लोकांचा पोलिसांवर विश्वास नाही. त्यामुळेच लोक गेले दोन दिवस म्हार्दोळ पोलिस स्थानकावर धाव घेत आहेत. गर्दी करत आहेत. जनतेत संताप व्यक्त होत आहे. 

फडते दाम्पत्यासह तिघांना वाहन चालकाने संपविले. त्याशिवाय काही जण गंभीर जखमी झाले. जखमी व्यक्तींची आणि त्यांच्या कुटुंबाची वेदना शब्दात व्यक्त करता येणार नाही. अपघात पाहिलेले साक्षीदार सांगतात की, पत्नी मेघना वाहन चालवत होती. दिग्विजय वेलिंगकर या साक्षीदाराने तशी तक्रारही पोलिसांत दिली आहे. मात्र, पोलिसांचे म्हणणे असे की परेश सावर्डेकरच अपघातग्रस्त मर्सिडीज चालवत होते. गाडीची नोंदणी मेघनाच्या नावावर आहे. अपघात झाला तेव्हा दोघांनीही दारू ढोसली होती, मग पत्नीची चाचणी का केली नाही, असा प्रश्न लोक विचारत आहेत. पोलिस मेघनाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ग्रामस्थांना वाटते. सत्य काय हे पोलिस शोधून काढतील असे म्हणण्यासारखी परिस्थिती नाही. 

हायप्रोफाइल मंडळी अपघातात गुंतलेली आहेत. सरकार असो किंवा पोलिस, अनेकदा संशयित आरोपींचे समाजातील स्थान, ऐश्वर्य, पद यांचा विचार करतात. लोकांचा पोलिसांवरचा विश्वास फार पूर्वीच उडाला आहे. तरीदेखील मुख्यमंत्री सावंत यांना वाटते की, तपासकार्य योग्य प्रकारे सुरू आहे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन मुख्यमंत्री करतात. म्हणजे लोकांनी पोलिसांवर, राजकारण्यांवर विश्वास ठेवावा, असा अर्थ झाला. वास्तविक वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी पूर्वीच म्हटलेय की, पोलिसांनी कोणताही बेबनाव करू नये. बास्तातील अपघात हा तिघांचा केलेला खूनच आहे. 

सरकारमधील एक मंत्री असे बोलतो. भाजपचेच एक आमदार राजेश फळदेसाई लोकांसमवेत म्हार्दोळ पोलिस स्थानकावर जाऊन मेघना सावर्डेकरला अटक व्हावी, या जनभावनेशी सहमती दर्शवतात. पोलिसांनी ज्याला पकडलेय तो खरोखर परेश सावर्डेकरच आहे ना, याची खात्रीदेखील फळदेसाई स्वत: कोठडीपाशी जाऊन करून घेतात. आपल्याच सरकारच्या हाती असलेल्या पोलिस यंत्रणेवर आमदारांचाही शंभर टक्के विश्वास नाही, असे यातून समजावे काय, असा प्रश्न मनात येतोच. वास्तविक सरकारने हे अपघात प्रकरण सीआयडी विभागाकडे ( क्राइम बँच) सोपवायला हवे. एरव्ही साधी प्रकरणे काढून गुन्हा अन्वेषण विभागाकडे दिली जातात. सध्या सगळीकडे जनतेचा आक्रोश असताना हे प्रकरण क्राइम ब्रँचकडे सोपवावे, असे सरकारला का वाटत नाही? गरीब माणसांच्या मुसक्या आवळायच्या असतात तेव्हा सरकार उत्साह दाखवते.

मात्र, सध्या सरकारच्याही हातापायांना मुंग्या आलेल्या असतील, असा संशय येतो. बाणस्तारीत अपघात झाल्यानंतर लगेच पोलिसांनी चालकाला अटक केली नाही. पोलिस म्हणतात त्याप्रमाणे खरोखर मेघना वाहन चालवत नव्हती, असेदेखील समजता येते. कदाचित साक्षीदाराचा गैरसमज झाला असावा. अपघात झाल्यानंतर ती स्टेअरिंगच्या ठिकाणी बसून अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरून बाजूला काढत होती, असेदेखील मानता येते. 

मात्र, क्राइम बँचकडे किंवा प्रामाणिक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाकडे हे प्रकरण तपासासाठी दिले गेले तरच लोकांचा विश्वास बसेल. या अपघात प्रकरणात गुंतलेल्या व्यक्ती साध्या सुध्या नाहीत. प्रचंड पैसा असलेली माणसे आहेत. राजकीय व उद्योग वर्तुळात दबदबा आहे. तथाकथित उच्चभ्रू समाजाला कोणतेच सरकार कधी दुखवू पाहत नाही. सध्या पोलिसांची व सरकारचीही कसोटीच आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सिद्ध झाला तर संबंधित आरोपीला दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होते. तशी कायद्यात तरतूद आहे. मात्र, तपासकामात कच्चे दुवे ठेवण्याची पोलिसांना सवय असते. त्यामुळे जागते रहो, एवढाच संदेश सध्या लोकांना द्यावा लागेल. 

टॅग्स :goaगोवाAccidentअपघात