शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

ब्राझिल दौऱ्याची भरपाई प्रलंबित

By admin | Updated: February 3, 2015 01:36 IST

पणजी : एरव्ही प्रचंड खर्च करणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या मंत्री, आमदारांकडे आता सरकारचे देणे फेडण्यासाठी मात्र पैसे नाहीत.

पणजी : एरव्ही प्रचंड खर्च करणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या मंत्री, आमदारांकडे आता सरकारचे देणे फेडण्यासाठी मात्र पैसे नाहीत. मंत्री आवेर्तान फुर्तादो यांच्यासह तीन आमदार गेल्या जुलैमध्ये ब्राझिलच्या दौऱ्यावर जाऊन आले; पण आठ महिन्यांचा कालावधी लोटला तरी अजूनही त्यांनी सरकारचे देणे फेडलेले नाही. त्यामुळे आता हा विषय आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी दक्षता खात्याच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाकडे पोहोचविला आहे. ब्राझिल दौऱ्यावर जाऊन आलेल्या मंत्री व आमदारांना देणे फेडण्यासाठी पर्रीकर सरकारने ४५ दिवसांची मुदत गेल्या आॅगस्टमध्ये दिली होती. ती मुदत कधीच संपली. आता फेब्रुवारी महिना सुरू झाला तरी, मंत्री आवेर्तान फुर्तादो, आमदार ग्नेल टिकलो, कार्लुस आल्मेदा व बेंजामिन सिल्वा यांनी शासकीय पैसे परत केलेले नाहीत. ब्राझिलमध्ये फिफा फुटबॉल वर्ल्डकप पाहण्यासाठी मंत्री आवेर्तान व तिघे आमदार गेले होते. क्रीडा मंत्री रमेश तवडकर व वीजमंत्री मिलिंद नाईक यांचीही नावे अगोदर शिष्टमंडळात होती. नंतर त्यांनी माघार घेतली व ते ब्राझिलला गेले नाहीत. गोव्यातील मंत्री, आमदारांच्या या ब्राझिल दौऱ्यावर त्या वेळी राष्ट्रीय स्तरावरून प्रचंड टीका झाली होती. त्यामुळे सरकारने हे मंत्री, आमदार गोव्यात परतल्यानंतर दौऱ्यावरील खर्च स्वत:च्या खिशातून परत करतील, असे जाहीर केले होते. मंत्री, आमदारांच्या दौऱ्यावर प्रत्येकी १४ लाख ९ हजार रुपयांचा खर्च झाला. आश्चर्य म्हणजे १४ लाख रुपये सरकारला परत करण्याऐवजी आवेर्तान यांनी केवळ तीन लाख रुपये परत केले आहेत. टिकलो, कार्लुस व बेंजामिन यांनी प्रत्येकी दोन लाख रुपये भरले आहेत. आम्हाला पैसे भरण्यासाठी वेळ द्या, अशी विनंती या सर्वांनी गेल्या आॅगस्टमध्ये केली होती. सरकारने ही विनंती तत्काळ मान्य करून ४५ दिवसांचा अवधी दिला होता. त्यानंतरही पैसे भरले गेलेले नाहीत. याविषयी सुदीप ताम्हणकर यांनी सोमवारी दक्षता खात्याकडे तक्रार केली आहे. लूट दोन प्रकारची असते, एक कायदेशीर व दुसरी बेकायदा असे पर्रीकर म्हणायचे. काँग्रेसवाले करत होते ती बेकायदा लूट, असेही पर्रीकर सांगायचे. आता विद्यमान मंत्री, आमदार सरकारी पैसे थकवून जी लूट करतात ती कायदेशीर की बेकायदा, असा प्रश्न ताम्हणकर यांनी विचारला आहे. (खास प्रतिनिधी)