शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

गोव्याच्या काजूची ब्रॅँडिंग हाेणे गरजेचे, मुख्यमंत्र्यांचे आंतराष्ट्रीय काजू परिषदेत उद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 17:16 IST

...त्यामुळे गाेमंतकीय काजूची खास ब्रॅँडिंग हाेणे गरजेचे आहे, असे मख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

नारायण गावस -पणजी: राज्यातील काही कारखानदार आफ्रिकन देशातील कमी दरात मिळत असलेल्या काजू बिया आणून गोवन काजू म्हणून विकले जात आहे. त्यामुळे अस्सल गोमंतकीय शेतकऱ्यांच्या काजू बियांना चांगला दर मिळत नाही. त्यामुळे गाेमंतकीय काजूची खास ब्रॅँडिंग हाेणे गरजेचे आहे, असे मख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

काजू आणि कोको विकास संचालनालय, कोची (केरळ) व कृषी संचालनालय (गोवा), गोवा फलोत्पादन महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राजभवन दोनापावला येथे आयोजित केलेल्या काजूवर आधारित राष्ट्रीय परिषदच्या उद्घाटनाला प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते या परिषदेत उद्घाटन करण्यात आले. रविवारीही काजू विषयावर चर्चा सत्र होणार आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले गोव्याचा काजू हा आंतराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. राज्यात काजू उत्पादन वाढावे यासाठी आम्ही विविध याेजना देत असतो. तसेच शेतकऱ्यांसाठी खास आधारभूत किमतही दिली जाते. पण आता राज्यात आफ्रिकन काजू आणून तो गाेवन काजू म्हणून विकला जात आहे. त्यासाठी आता खास गाेमंतकीय काजूचे ब्रॅडिंग होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले, काजू पासून बनविल्या जाणाऱ्या फेणीला जीआय टॅग मिळाला आहे तसेच आता हुर्राक आणि काजू गरालाही जीआय टॅग मिळणार आहे. यामुळे गाेव्याची काजू फेणी जगभर प्रसिद्ध झाली आहे. काजू गर प्रसिद्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. असेही मुख्यमंत्री म्हणाले.

'काजूचे सक्षम उत्पादन' ही परिषदेची संकल्पना आहे. काजू उत्पादन वाढ आणि त्यासमोरील आव्हाने हा परिषदेचा प्रमुख विषय आहे. या परिषदेला देशभरातून सुमारे २५० ते ३०० प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. काजू विषयावर विविध चर्चासत्राचा त्या घेतली जात आहेत. त्यासाठी काजू क्षेत्रातील मान्यवरांना पाचारण करण्यात आले असून त्यांची व्याख्याने व मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळत आहे.गोवा राज्यात काजू हे प्रमुख पीक असून अनेक शेतकरी त्या पिकावर अवलंबून आहेत. ग्रामीण भागात तर अनेक कुटुंबे काजूवर अवलंबून आहेत. गोव्यातील काजू शेतकऱ्यांनी या परिषदेस हजेरी लावावी असे आवाहन कृषी खाते संचालक संदीप फळदेसाई यांनी केले आहे. 'काजूचे सक्षम उत्पादन' ही परिषदेची संकल्पना आहे. 

टॅग्स :goaगोवा