शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

गोव्यात भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची भूमिका ठरणार पक्षाला मारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 17:27 IST

काँग्रेसच्या दोन आमदारांना पक्षात दिलेल्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर  ज्येष्ठ नेत्यांनी घेतलेली टोकाची भूमिका उत्तर गोव्यात पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी एकंदरीत मारक ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

म्हापसा - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या जागी नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्याची प्रक्रिया जोर धरू लागली असली तर काही दिवसापूर्वी राज्य मंत्रीमंडळात केलेल्या फेरबदलानंतर उत्तर गोव्यातील अल्पसंख्याक आमदारांनी पक्षावर केलेली टीका व त्यानंतर काँग्रेसच्या दोन आमदारांना पक्षात दिलेल्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर  ज्येष्ठ नेत्यांनी घेतलेली टोकाची भूमिका उत्तर गोव्यात पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी एकंदरीत मारक ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

पक्षाच्या ध्येय धोरणांवर नेत्यांकडून वारंवार होत असलेल्या टीकेतून कार्यकर्ता मात्र सध्या अस्वस्थ झाला असून, त्याचे विपरीत परिणाम होणाऱ्या लोकसभा तसेच विधासभेच्या पोटनिवडणुकीवर होण्याचे चिन्हे दिसू लागली आहेत. यावर मात करुन पुढील वाटचाल करण्याची परिस्थिती पक्षावर येवून ठेपली आहे.  

गोव्यातील दोन्ही जिल्ह्यांची तुलना केल्यास उत्तर गोव्यातील मतदार संघावर भाजपचे प्रभुत्व जास्त प्रमाणावर आहे. विद्यमान केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक सतत चारवेळा लोकसभेवर निवडून येणे हे त्याचे प्रामुख्याने उदाहरण आहे. भाजपने राज्यातील सत्ता ज्यावेली काबीज केली त्याची मुहूर्तमेढ उत्तरेतून रोवली आाहे. अशा या जिल्ह्यातून पक्षाने घेतलेल्या निर्णयाला होत असलेला विरोध प्रचंडपणे वाढू लागला आहे. त्याची सुरुवात मंत्रिमंडळात करण्यात आलेल्या फेरबदलातून झाली. 

म्हापसा मतदार संघाचे आमदार पक्षाचे जेष्ठ नेते अ‍ॅड. फ्रन्सिस डिसोझा यांना मंत्रीमंडळातून डच्चू दिल्यानंतर त्याची खऱ्या अर्थाने सुरवात झाली. बार्देश तालुक्यातील पक्षाच्या इतर दोन अल्पसंख्यांक आमदारांनी डिसोझा यांचे समर्थन करुन पक्षावर उघडपणे टीका करुन आव्हान उभे केले. सुरू झालेला हा वाद शमण्याच्या वाटेवर असताना दोन काँग्रेस आमदारांना पक्षात प्रवेश देवून दुसऱ्या वादाला तोंड फुटले. 

दुसऱ्या वादाची सुरवात माजी मुख्यमंत्री दोन वेळचे प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडून झाली. त्याला नंतर माजी सभापती राजेंद्र आर्लेकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर व आता आमदार अ‍ॅड. फ्रन्सिस डिसोझा यांनी मुठमाती दिली. या चारही ज्येष्ठ नेत्यांनी घेतलेली भूमिका तसेच उघडपणे व्यक्त केलेली नाराजी पक्षाला मारक ठरणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. या  ज्येष्ठ नेत्यांची पक्षावर टीका करण्याची कारणे विविध असली तरी स्वत:ला वाटत असलेली असुरक्षितता त्या मागचे प्रमुख कारण मानले जात आहे. पक्षातील त्यांचे कमी झालेले महत्त्व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा परिणामकार ठरण्याची शक्यता त्यांना वाटू लागली आहे. 

पक्षात प्रवेश केलेले काँग्रेसचे आमदार दयानंद सोपटे यांनी मागील विधानसभेच्या निवडणुकीत पार्सेकरांचा पराभव केला होता. त्यामुळे सोपटेंच्या प्रवेशानंतर त्यांना आपली वाटचाल असुरक्षित वाटू लागली आहे. आर्लेकरांवर कार्यकर्त्यांच्या वाढलेल्या नाराजीमुळे त्यांना पुन्हा त्यांच्या पेडणे मतदार संघातून उमेदवारी मिळवण्यावर प्रश्न निर्माण झाले आहेत. डिसोझा हे सततच्या आजारपणामुळे पुन्हा निवडणुका लढवण्याची शक्यता कमी आहे तर मांद्रेकरांच्या जागी पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता सुद्धा आहे. त्यामुळे या ज्येष्ठ नेत्यांची भूमिका पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी मारक ठरण्याची शक्यता दिसू लागली आहे. 

टॅग्स :BJPभाजपाgoaगोवाPoliticsराजकारण