शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
4
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
5
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
6
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
7
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
8
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
9
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
10
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
11
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
12
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
13
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
14
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
15
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
16
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
17
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
18
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
19
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
20
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका

गोव्यात भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची भूमिका ठरणार पक्षाला मारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 17:27 IST

काँग्रेसच्या दोन आमदारांना पक्षात दिलेल्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर  ज्येष्ठ नेत्यांनी घेतलेली टोकाची भूमिका उत्तर गोव्यात पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी एकंदरीत मारक ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

म्हापसा - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या जागी नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्याची प्रक्रिया जोर धरू लागली असली तर काही दिवसापूर्वी राज्य मंत्रीमंडळात केलेल्या फेरबदलानंतर उत्तर गोव्यातील अल्पसंख्याक आमदारांनी पक्षावर केलेली टीका व त्यानंतर काँग्रेसच्या दोन आमदारांना पक्षात दिलेल्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर  ज्येष्ठ नेत्यांनी घेतलेली टोकाची भूमिका उत्तर गोव्यात पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी एकंदरीत मारक ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

पक्षाच्या ध्येय धोरणांवर नेत्यांकडून वारंवार होत असलेल्या टीकेतून कार्यकर्ता मात्र सध्या अस्वस्थ झाला असून, त्याचे विपरीत परिणाम होणाऱ्या लोकसभा तसेच विधासभेच्या पोटनिवडणुकीवर होण्याचे चिन्हे दिसू लागली आहेत. यावर मात करुन पुढील वाटचाल करण्याची परिस्थिती पक्षावर येवून ठेपली आहे.  

गोव्यातील दोन्ही जिल्ह्यांची तुलना केल्यास उत्तर गोव्यातील मतदार संघावर भाजपचे प्रभुत्व जास्त प्रमाणावर आहे. विद्यमान केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक सतत चारवेळा लोकसभेवर निवडून येणे हे त्याचे प्रामुख्याने उदाहरण आहे. भाजपने राज्यातील सत्ता ज्यावेली काबीज केली त्याची मुहूर्तमेढ उत्तरेतून रोवली आाहे. अशा या जिल्ह्यातून पक्षाने घेतलेल्या निर्णयाला होत असलेला विरोध प्रचंडपणे वाढू लागला आहे. त्याची सुरुवात मंत्रिमंडळात करण्यात आलेल्या फेरबदलातून झाली. 

म्हापसा मतदार संघाचे आमदार पक्षाचे जेष्ठ नेते अ‍ॅड. फ्रन्सिस डिसोझा यांना मंत्रीमंडळातून डच्चू दिल्यानंतर त्याची खऱ्या अर्थाने सुरवात झाली. बार्देश तालुक्यातील पक्षाच्या इतर दोन अल्पसंख्यांक आमदारांनी डिसोझा यांचे समर्थन करुन पक्षावर उघडपणे टीका करुन आव्हान उभे केले. सुरू झालेला हा वाद शमण्याच्या वाटेवर असताना दोन काँग्रेस आमदारांना पक्षात प्रवेश देवून दुसऱ्या वादाला तोंड फुटले. 

दुसऱ्या वादाची सुरवात माजी मुख्यमंत्री दोन वेळचे प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडून झाली. त्याला नंतर माजी सभापती राजेंद्र आर्लेकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर व आता आमदार अ‍ॅड. फ्रन्सिस डिसोझा यांनी मुठमाती दिली. या चारही ज्येष्ठ नेत्यांनी घेतलेली भूमिका तसेच उघडपणे व्यक्त केलेली नाराजी पक्षाला मारक ठरणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. या  ज्येष्ठ नेत्यांची पक्षावर टीका करण्याची कारणे विविध असली तरी स्वत:ला वाटत असलेली असुरक्षितता त्या मागचे प्रमुख कारण मानले जात आहे. पक्षातील त्यांचे कमी झालेले महत्त्व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा परिणामकार ठरण्याची शक्यता त्यांना वाटू लागली आहे. 

पक्षात प्रवेश केलेले काँग्रेसचे आमदार दयानंद सोपटे यांनी मागील विधानसभेच्या निवडणुकीत पार्सेकरांचा पराभव केला होता. त्यामुळे सोपटेंच्या प्रवेशानंतर त्यांना आपली वाटचाल असुरक्षित वाटू लागली आहे. आर्लेकरांवर कार्यकर्त्यांच्या वाढलेल्या नाराजीमुळे त्यांना पुन्हा त्यांच्या पेडणे मतदार संघातून उमेदवारी मिळवण्यावर प्रश्न निर्माण झाले आहेत. डिसोझा हे सततच्या आजारपणामुळे पुन्हा निवडणुका लढवण्याची शक्यता कमी आहे तर मांद्रेकरांच्या जागी पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता सुद्धा आहे. त्यामुळे या ज्येष्ठ नेत्यांची भूमिका पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी मारक ठरण्याची शक्यता दिसू लागली आहे. 

टॅग्स :BJPभाजपाgoaगोवाPoliticsराजकारण