शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

भाजप ३४, मगो ९ जागा लढवणार

By admin | Updated: February 28, 2015 02:03 IST

पणजी : येत्या १८ मार्च रोजी होत असलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी अधिकृतरीत्या युतीची घोषणा केली.

पणजी : येत्या १८ मार्च रोजी होत असलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी अधिकृतरीत्या युतीची घोषणा केली. जिल्हा पंचायतीच्या ५० पैकी ३४ जागा भाजप, तर ९ जागा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष लढवणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी केली. मंत्री मिकी पाशेको यांच्या गोवा विकास पक्षाला पाच, तर अपक्ष मंत्री आवेर्तान फुर्तादो व आमदार बेंजामिन सिल्वा यांना सासष्टीतील प्रत्येकी एक जागा भाजपकडून सोडण्यात आली आहे. भाजपकडून मगो पक्षाला जिल्हा पंचायतीच्या नऊ जागा सोडल्या जातील, असे वृत्त दोन दिवसांपूर्वी ‘लोकमत’नेच दिले होते. उसगाव, बेतकी-खांडोळा, कुर्टी-खांडेपार, वेलिंग-प्रियोळ, कवळे, बार्से, सांकवाळ, सांताक्रुझ आणि चिंबल हे जिल्हा पंचायत मतदारसंघ मगो पक्ष लढवणार आहे. उत्तर गोव्यातील सांताक्रुझ व चिंबल हे दोनच जिल्हा पंचायत मतदारसंघ मगो पक्षासाठी देण्यात आले आहेत. राज्यातील सत्ताधारी आघाडीतील सर्वांत मोठा पक्ष असलेला भाजप उत्तर गोव्यातील २३, तर दक्षिण गोव्यातील ११ जागा लढवणार आहे. हरमल, मोरजी, धारगळ, तोरसे, शिवोली, कोलवाळ, हळदोणे, शिरसई, अंजुणे, कळंगुट, सुकूर, रेईश मागूश, पेन्ह द फ्रान्स, ताळगाव, खोर्ली, सेंट लॉरेन्स (आगशी), लाटंबार्से, सर्वण-कारापूर, मये, पाळी, होंडा, केरी, नगरगाव, बोरी, शिरोडा, दवर्ली, गिरदोली, सावर्डे, धारबांदोडा, रिवण, शेल्डे, खोला, पैंगीण व कुठ्ठाळी हे मतदारसंघ भाजप लढवणार आहे. मंत्री पाशेको यांच्या गोवा विकास पक्षाला राय, नुवे, कोलवा, बाणावली व कुडतरी या पाच जागा देण्यात आल्या आहेत. वेळ्ळी आणि नावेली हे दोन जिल्हा पंचायत मतदारसंघ अपक्ष आमदार बेंजामिन सिल्वा व मंत्री फुर्तादो यांच्या उमेदवारांसाठी सोडण्यात आले आहेत. मगोचे मंत्री सुदिन ढवळीकर, दीपक ढवळीकर, ‘गोविप’चे पाशेको, अपक्ष मंत्री फुर्तादो, सिल्वा, पंचायतमंत्री दयानंद मांद्रेकर, आमदार विष्णू वाघ, खासदार नरेंद्र सावईकर हेही पत्रकार परिषदेस उपस्थित होते. स्थैर्यासाठी २०१७ सालीही युती भाजप, मगो पक्ष, गोविप, अपक्ष आमदार अशी युती आम्ही २०१२च्या विधानसभा निवडणुकीवेळी केली होती. ही युती आता जिल्हा पंचायत निवडणुकीवेळीही आम्ही कायम ठेवली आहे आणि २०१७ सालच्या विधानसभा निवडणुकीवेळीही ती कायम असेल, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. गोव्याला राजकीय स्थैर्य आहे. जिल्हा पंचायतींना जास्त अधिकार व जास्त निधीही मिळेल. (खास प्रतिनिधी)