शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

भाजप ३४, मगो ९ जागा लढवणार

By admin | Updated: February 28, 2015 02:03 IST

पणजी : येत्या १८ मार्च रोजी होत असलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी अधिकृतरीत्या युतीची घोषणा केली.

पणजी : येत्या १८ मार्च रोजी होत असलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी अधिकृतरीत्या युतीची घोषणा केली. जिल्हा पंचायतीच्या ५० पैकी ३४ जागा भाजप, तर ९ जागा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष लढवणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी केली. मंत्री मिकी पाशेको यांच्या गोवा विकास पक्षाला पाच, तर अपक्ष मंत्री आवेर्तान फुर्तादो व आमदार बेंजामिन सिल्वा यांना सासष्टीतील प्रत्येकी एक जागा भाजपकडून सोडण्यात आली आहे. भाजपकडून मगो पक्षाला जिल्हा पंचायतीच्या नऊ जागा सोडल्या जातील, असे वृत्त दोन दिवसांपूर्वी ‘लोकमत’नेच दिले होते. उसगाव, बेतकी-खांडोळा, कुर्टी-खांडेपार, वेलिंग-प्रियोळ, कवळे, बार्से, सांकवाळ, सांताक्रुझ आणि चिंबल हे जिल्हा पंचायत मतदारसंघ मगो पक्ष लढवणार आहे. उत्तर गोव्यातील सांताक्रुझ व चिंबल हे दोनच जिल्हा पंचायत मतदारसंघ मगो पक्षासाठी देण्यात आले आहेत. राज्यातील सत्ताधारी आघाडीतील सर्वांत मोठा पक्ष असलेला भाजप उत्तर गोव्यातील २३, तर दक्षिण गोव्यातील ११ जागा लढवणार आहे. हरमल, मोरजी, धारगळ, तोरसे, शिवोली, कोलवाळ, हळदोणे, शिरसई, अंजुणे, कळंगुट, सुकूर, रेईश मागूश, पेन्ह द फ्रान्स, ताळगाव, खोर्ली, सेंट लॉरेन्स (आगशी), लाटंबार्से, सर्वण-कारापूर, मये, पाळी, होंडा, केरी, नगरगाव, बोरी, शिरोडा, दवर्ली, गिरदोली, सावर्डे, धारबांदोडा, रिवण, शेल्डे, खोला, पैंगीण व कुठ्ठाळी हे मतदारसंघ भाजप लढवणार आहे. मंत्री पाशेको यांच्या गोवा विकास पक्षाला राय, नुवे, कोलवा, बाणावली व कुडतरी या पाच जागा देण्यात आल्या आहेत. वेळ्ळी आणि नावेली हे दोन जिल्हा पंचायत मतदारसंघ अपक्ष आमदार बेंजामिन सिल्वा व मंत्री फुर्तादो यांच्या उमेदवारांसाठी सोडण्यात आले आहेत. मगोचे मंत्री सुदिन ढवळीकर, दीपक ढवळीकर, ‘गोविप’चे पाशेको, अपक्ष मंत्री फुर्तादो, सिल्वा, पंचायतमंत्री दयानंद मांद्रेकर, आमदार विष्णू वाघ, खासदार नरेंद्र सावईकर हेही पत्रकार परिषदेस उपस्थित होते. स्थैर्यासाठी २०१७ सालीही युती भाजप, मगो पक्ष, गोविप, अपक्ष आमदार अशी युती आम्ही २०१२च्या विधानसभा निवडणुकीवेळी केली होती. ही युती आता जिल्हा पंचायत निवडणुकीवेळीही आम्ही कायम ठेवली आहे आणि २०१७ सालच्या विधानसभा निवडणुकीवेळीही ती कायम असेल, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. गोव्याला राजकीय स्थैर्य आहे. जिल्हा पंचायतींना जास्त अधिकार व जास्त निधीही मिळेल. (खास प्रतिनिधी)