शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

'सावकारी' धोरण राबविणाऱ्या भाजपला कष्टकरी शेतकऱ्यांच्या व्यथा कळत नाहीत- गिरीश चोडणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 19:35 IST

नवीन कायद्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढणार याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

मडगाव: भाजप पक्ष श्रीमंतांचा उदोउदो करण्याचे धोरण राबवुन देशात "सावकारी" राजवट  आणण्यात व्यस्त असुन, त्यामुळेच भाजप सरकारला गरीब शेतकऱ्यांच्या व्यथा कळत नाहीत. भाजपच्या ह्या धनाड्यांच्या  प्रेमामुळेच भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना राजभवनावरील  काँग्रेसच्या भव्य मोर्चात सामील झालेले शेकडो कष्टकरी  "शेतकरी" दिसले नव्हते अशी टिका  गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी रिवण येथे किसान काँग्रेस तर्फे आयोजीत किसान मेळाव्यात बोलताना केली. या मेळाव्याला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

भाजपला जर शेतकऱ्यांचा खराच पुळका असता तर गोव्यातील ऊस, काजू, सुपारी, नारळ तसेच भातशेती करणाऱ्या गोमंतकीय शेतकऱ्यांच्या व्यथा व समस्या  ऐकुन घेण्यासाठी मागच्या आठवड्यात गोव्यात भाजपची  जाहिरतबाजी करण्यास आलेले  केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर का भेटले नाहीत असा प्रश्न विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी यावेळी विचारुन, भाजपने आणलेल्या नव्या कायद्याने विवीध पिकांसाठी मिळणारी  सरकारी आधारभुत किम्मत यापुढे बंद करुन शेतकऱ्यांना मोठ्या उद्योगपती व व्यापाऱ्यांच्या घशात घालण्याचे कारस्थान  भाजप सरकारने आखल्याचा दावा केला. या नवीन कायद्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढणार याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

क्रोनी कॅपिटालीस्टांचे हित जपणाऱ्या भाजपला देशातला गरीब दिसत नसुन, या असंवेदनशील भाजपच्या कानावर सामान्यांच्या समस्या पडत नाहीत असा टोला खासदार फ्रांसीस सार्दिन यांनी यावेळी बोलताना हाणला.  नवा कृषी कायदा आणल्याने "दलाली" बंद होणार असे सांगणाऱ्या केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांना  सदर कायद्यामुळे राज्य सरकारला ९ कोटी नुकसान होणार असे स्पष्ट सांगणारे भाजपचेच ज्येष्ठ नेते प्रकाश वेळीप हे " दलाल" वाटतात का हे त्यांनी  स्पष्ट करावे अशी मागणी काँग्रेस किसान मोर्चाचे निमंत्रक अभिजीत देसाई यांनी केली. 

यावेळीस्थानीक शेतकरी बोसत्यांव सिमोईस , सांगे गट काँग्रेस अध्यक्षा जोसफीना रोड्रीगीस ,विकेएसएस सोसायटीचे अध्यक्ष व माजी सरपंच जुझे आफोंसो यानी भाजप सरकारच्या किसान विरोधी कायद्यावर टिका केली. काँग्रेसचे प्रदेश सचिव रजनीकांत नाईक यांनी स्वागत केले तर सांगे युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश भगत यांनी आभार व्यक्त केले. सुत्रसंचालन अमरनाथ पणजीकर यांनी केले. 

टॅग्स :goaगोवाFarmerशेतकरी