शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात घटक पक्षांच्या धमक्यांमुळे भाजप आश्चर्यचकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 12:46 IST

भाजपप्रणीत आघाडी सरकारमधील घटक पक्षांच्या विधानांमुळे व विविध मतदारसंघांतील हालचालींमुळे भाजप सध्या थोडा आश्चर्यचकीत झालेला आहे.

पणजी : भाजपप्रणीत आघाडी सरकारमधील घटक पक्षांच्या विधानांमुळे व विविध मतदारसंघांतील हालचालींमुळे भाजप सध्या थोडा आश्चर्यचकीत झालेला आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांना मुख्यमंत्रीपदी आम्ही बसवले, खनिज खाणी लोकसभा निवडणुकीपर्यंत जर खाणी सुरू झाल्या नाही तर लोकसभा निवडणुकीवेळी भाजपला पाठींबा का द्यावा याविषयी फेरविचार करावा लागेल असा इशारा मंत्री विजय सरदेसाई यांनी दिल्यानंतर भाजपला धक्काच बसला आहे.मुख्यमंत्री पर्रीकर हे गेल्या अडिच महिन्यांपासून अमेरिकेत आहेत. त्यांनी तीन मंत्र्यांची एक समिती गोव्याचा कारभार हाकण्यासाठी नेमली आहे पण त्या समितीला मर्यादित अधिकार आहेत. तीन मंत्र्यांच्या समितीपेक्षा जास्त अधिकार सध्या मुख्य सचिव धर्मेद्र शर्मा आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी श्री. कृष्णमूर्ती यांना आहेत. गोवा मंत्रिमंडळाची एकही बैठक मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे गेल्या तीन महिन्यांत होऊ शकलेली नाही. मुख्यमंत्री अडिच महिने अमेरिकेत असले तरी, तत्पूर्वी ते मुंबईत उपचार घेत होते. त्यामुळे सुमारे शंभर दिवस मुख्यमंत्री गोव्याबाहेर आहेत, आजारामुळे ते प्रशासकीय कामाबाबत सक्रिय राहू शकलेले नाहीत अशी स्थिती आहे. सध्या गोवा सरकारमधील अनेक मंत्री व आमदारही सुट्टीच अनुभवत आहेत. काहीच कामे होत नसल्याने आम्ही कुटूंबासोबत मे महिन्यात सुट्टीच अनुभवत आहोत असे एका मंत्र्याने सांगितले. सध्या पर्यटन मंत्री सहकुटूंब अमेरिकेला गेलेले आहेत. त्या शिवाय अन्य दोन मंत्री विदेशात आहेत. काही आमदारही गोव्याबाहेर आहेत. सरकारचा गाडा पुढे नेण्याची जबाबदारी सध्या गोवा फॉरवर्ड आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष या दोनच पक्षांवर आहे. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष असलेले मंत्री सरदेसाई म्हणतात की, त्यांचा गोवा फॉरवर्ड हा पक्ष केंद्रातील एनडीएचा भाग आहे. तथापि, गोव्यातील खनिज खाणी जर सुरू झाल्या नाहीत तर लोकसभा निवडणुकीवेळी भाजपला पाठींबा द्यावा की नाही हे आम्हाला ठरवावे लागेल. मंत्री सरदेसाई यांच्या या विधानावर विरोधी काँग्रेस पक्ष थोडा खूष झाला आहे. मात्र भाजपमध्ये नाराजीचा सूर आहे. भाजपचे प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांना पत्रकारांनी विचारले तेव्हा मंत्री सरदेसाई यांच्याशी भाजप नेतृत्व बोलेल, खनिज खाणी भाजप सरकारने बंद केलेल्या नाहीत, काँग्रेस तसे चित्र उभे करू पाहत आहे असे नाईक म्हणाले.महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा देखील भाजपप्रणीत आघाडी सरकारचा घटक पक्ष आहे. या पक्षाच्या नेत्यांनी आम्ही लोकसभा निवडणुका स्वतंत्रपणो लढवू शकतो अशी विधाने चालवली आहेत. आपण एनडीएचा भाग नाही असे या पक्षाचे म्हणणो आहे. कुठच्याच पक्षाला लोकसभा निवडणुकीवेळी केंद्रात स्पष्ट बहुमत मिळणार नाही अशा अर्थाचे विधान नुकतेच मगोपच्या नेत्यांनी केल्यामुळे भाजपमध्ये त्याबाबतही चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री र्पीकर विदेशात असल्याने गोव्यातील सत्ताधारी आघाडीचे घटक पक्ष वाट्टेल ते बोलत सुटले आहेत अशी भाजपमधील काही आमदारांची भावना होऊ लागली आहे.