शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

गोव्यात घटक पक्षांच्या धमक्यांमुळे भाजप आश्चर्यचकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 12:46 IST

भाजपप्रणीत आघाडी सरकारमधील घटक पक्षांच्या विधानांमुळे व विविध मतदारसंघांतील हालचालींमुळे भाजप सध्या थोडा आश्चर्यचकीत झालेला आहे.

पणजी : भाजपप्रणीत आघाडी सरकारमधील घटक पक्षांच्या विधानांमुळे व विविध मतदारसंघांतील हालचालींमुळे भाजप सध्या थोडा आश्चर्यचकीत झालेला आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांना मुख्यमंत्रीपदी आम्ही बसवले, खनिज खाणी लोकसभा निवडणुकीपर्यंत जर खाणी सुरू झाल्या नाही तर लोकसभा निवडणुकीवेळी भाजपला पाठींबा का द्यावा याविषयी फेरविचार करावा लागेल असा इशारा मंत्री विजय सरदेसाई यांनी दिल्यानंतर भाजपला धक्काच बसला आहे.मुख्यमंत्री पर्रीकर हे गेल्या अडिच महिन्यांपासून अमेरिकेत आहेत. त्यांनी तीन मंत्र्यांची एक समिती गोव्याचा कारभार हाकण्यासाठी नेमली आहे पण त्या समितीला मर्यादित अधिकार आहेत. तीन मंत्र्यांच्या समितीपेक्षा जास्त अधिकार सध्या मुख्य सचिव धर्मेद्र शर्मा आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी श्री. कृष्णमूर्ती यांना आहेत. गोवा मंत्रिमंडळाची एकही बैठक मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे गेल्या तीन महिन्यांत होऊ शकलेली नाही. मुख्यमंत्री अडिच महिने अमेरिकेत असले तरी, तत्पूर्वी ते मुंबईत उपचार घेत होते. त्यामुळे सुमारे शंभर दिवस मुख्यमंत्री गोव्याबाहेर आहेत, आजारामुळे ते प्रशासकीय कामाबाबत सक्रिय राहू शकलेले नाहीत अशी स्थिती आहे. सध्या गोवा सरकारमधील अनेक मंत्री व आमदारही सुट्टीच अनुभवत आहेत. काहीच कामे होत नसल्याने आम्ही कुटूंबासोबत मे महिन्यात सुट्टीच अनुभवत आहोत असे एका मंत्र्याने सांगितले. सध्या पर्यटन मंत्री सहकुटूंब अमेरिकेला गेलेले आहेत. त्या शिवाय अन्य दोन मंत्री विदेशात आहेत. काही आमदारही गोव्याबाहेर आहेत. सरकारचा गाडा पुढे नेण्याची जबाबदारी सध्या गोवा फॉरवर्ड आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष या दोनच पक्षांवर आहे. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष असलेले मंत्री सरदेसाई म्हणतात की, त्यांचा गोवा फॉरवर्ड हा पक्ष केंद्रातील एनडीएचा भाग आहे. तथापि, गोव्यातील खनिज खाणी जर सुरू झाल्या नाहीत तर लोकसभा निवडणुकीवेळी भाजपला पाठींबा द्यावा की नाही हे आम्हाला ठरवावे लागेल. मंत्री सरदेसाई यांच्या या विधानावर विरोधी काँग्रेस पक्ष थोडा खूष झाला आहे. मात्र भाजपमध्ये नाराजीचा सूर आहे. भाजपचे प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांना पत्रकारांनी विचारले तेव्हा मंत्री सरदेसाई यांच्याशी भाजप नेतृत्व बोलेल, खनिज खाणी भाजप सरकारने बंद केलेल्या नाहीत, काँग्रेस तसे चित्र उभे करू पाहत आहे असे नाईक म्हणाले.महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा देखील भाजपप्रणीत आघाडी सरकारचा घटक पक्ष आहे. या पक्षाच्या नेत्यांनी आम्ही लोकसभा निवडणुका स्वतंत्रपणो लढवू शकतो अशी विधाने चालवली आहेत. आपण एनडीएचा भाग नाही असे या पक्षाचे म्हणणो आहे. कुठच्याच पक्षाला लोकसभा निवडणुकीवेळी केंद्रात स्पष्ट बहुमत मिळणार नाही अशा अर्थाचे विधान नुकतेच मगोपच्या नेत्यांनी केल्यामुळे भाजपमध्ये त्याबाबतही चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री र्पीकर विदेशात असल्याने गोव्यातील सत्ताधारी आघाडीचे घटक पक्ष वाट्टेल ते बोलत सुटले आहेत अशी भाजपमधील काही आमदारांची भावना होऊ लागली आहे.