शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

भाजपने राज्यपालांचा वापर करून सत्ता बळकावणे यापुढे थांबवावे  - शिवसेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2018 13:42 IST

कर्नाटक विधानसभेतील घटना अपेक्षेनुसारच घडल्या आणि सत्ता बळकावण्याचे व्यर्थ प्रयत्न सोडून देणे भारतीय जनता पक्षाला भाग पडले

पणजी : कर्नाटक विधानसभेतील घटना अपेक्षेनुसारच घडल्या आणि सत्ता बळकावण्याचे व्यर्थ प्रयत्न सोडून देणे भारतीय जनता पक्षाला भाग पडले. भाजपने राज्यपालांचा वापर करून सत्ता बळकावणे आता थांबवावे आणि जनादेशाचा विनम्रपणे आदर करावा, अशी खरमरीत टीका गोवा शिवसेनेच्या उपाध्यक्ष व प्रवक्या राखी प्रभुदेसाई नाईक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे.     

त्या म्हणतात की, ‘राज्यपालपदाचा गैरवापर करून जबरदस्तीने सत्ता काबीज करणे हा भाजपचा धर्मच बनला असून याच क्लृप्त्या त्यांनी गोव्यातही वापरल्या. कर्नाटकात सणसणीत धडा मिळाल्यानंतर तरी त्यांनी हे उद्योग थांबवून जनतेच्या कौलाचा आदर करावा. कर्नाटक विधानसभेत जे काही घडले आहे तो लोकशाहीचा विजय आहे, असे शिवसेना मानते. आमदारांना गृहित धरण्यास भाजपला अटकाव करणाºया सर्वोच्च न्यायालयावरची आमची श्रद्धाही यामुळे दृढ झाली आहे. भाजपकडे बहुमत नसल्यामुळेच येडियुराप्पा यांना राजीनामा देणे भाग पडले.’ 

राष्ट्रगीत सुरू असताना भाजपचे आमदार विधानसभेतून बाहेर पडत होते यावरूनच त्यांच्या ढोंगी देशभक्तीचे दर्शन घडले. राष्ट्रगीताचा अवमान करणाºया या आमदारांविरुद्धही कारवाई केली पाहिजे, अशीही मागणी नाईक यांनी कली आहे.

‘म्हादईबाबत काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी’

कर्नाटकातील राजकीय घटना गोव्याने विसरून चालणार नाही. आम्ही म्हादईच्या विषयावर खरोखरच सुटकेचा नि:श्वास सोडू शकतो काय, हा खरा प्रश्न आहे, असे नमूद करून राखी म्हणतात, की कर्नाटकात सत्तेवर आलो तर पाणी वळविण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. आता भाजप सत्तेत नाही; पण मग काँग्रस-जद यांची भूमिका काय असेल? म्हादईबद्दल गोवा कॉग्रेस पक्षाने नि:संदिग्ध निवेदन केले पाहिजे. आता कर्नाटकात त्यांचे सरकार येत आहे आणि मतदारांना खूष करण्यासाठी आम्ही या विषयावर काँग्रेसकडून कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही.

म्हादईबाबत अमित शहा यांनी केलेल्या निवेदनावर काँग्रेसने नेहमीच टीका केली असली तरी स्वत:चे पत्ते मात्र झाकूनच ठेवले आहेत. काँग्रेस याबाबत तडजोड करणार नाही, हे या पक्षाने स्पष्टपणे सांगितले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८