शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

खाणींच्या प्रश्नावरील मौन भाजपने सोडावे, शिवसेनेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 21:38 IST

गोव्यातील लाखो लोकांवर प्रतिकूल परिणाम करणा-या खाण प्रश्नावरील मौन भाजपने सोडावे, असे मत गोवा शिवसेनेने व्यक्त केले आहे.   

पणजी - गोव्यातील लाखो लोकांवर प्रतिकूल परिणाम करणा-या खाण प्रश्नावरील मौन भाजपने सोडावे, असे मत गोवा शिवसेनेने व्यक्त केले आहे.   

खाण उद्योगातील सध्याचा पेचप्रसंग सोडविण्यात सरकारला अपयश आले तर गोवा फॉरवर्ड आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका गोवा फॉरवर्डने घेतली आहे.  या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावरील भाजपच्या मौनामुळे आघाडीतील घटक पक्षांमधेच अस्वस्थता असल्याचे यातून प्रतिबिंबित होते, असे उपाध्यक्ष राखी प्रभुदेसाई नाईक यांनी म्हटले आहे. 

नाईक म्हणतात की, सध्या भाजप दिशाहीन झालेला असल्याने तो या प्रश्नावर मौन बाळगून अनिश्चितता कायम ठेवील, अशी आमची अटकळ होतीच. राज्यातील परिस्थितीशी भाजपला काहीही देणेघेणे नाही. 

खाण उद्योग पूर्ववत सुरू करण्यात सरकारला सतत येत असलेले अपयश आणि त्याची अकार्यक्षमता यामुळे खाण पटट्यातील लोकांमधे उदासीनता पसरली आहे. खाण उद्योगाच्या सद्य:स्थितीला केवळ आणि केवळ भाजपच जबाबदार आहे, असेही नाईक यांनी म्हटले आहे. त्या पुढे म्हणतात, की खाण उद्योग २०१२ सालापर्यंत व्यवस्थित चालू होता; पण भाजप सत्तेवर आल्यापासून सगळे अडथळे त्याच्यापुढे निर्माण झाले यावरूनच या उद्योगासंबंधातील भाजपचा दोष ठळकपणे दिसतो. या उद्योगावर अवलंबून असणा-या लोकांच्या समस्या सोडविण्याचे प्रयत्नच झालेले नाहीत.     

गोवा फॉरवर्डने प्रत्यक्ष कृती करून सरकारमधून बाहेर पडावे. या पक्षाने लोकांना गृहित धरू नये आणि खाण उद्योगाचा राजकीय स्वाथार्साठी उपयोग करू नये, असा इशाराही नाईक यांनी दिला आहे.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा