शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

मते फोडण्यासाठी भाजप 'बी टीम' उभी करते! माणिकराव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 08:12 IST

'लोकमत'ला सदिच्छा भेट; अनेक विषयांवर भाष्य

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : प्रत्येक राज्यात सत्ता मिळविणे हे भाजपचे लक्ष्य आहे. त्यासाठी त्या-त्या राज्यात काँग्रेसची मते फोडण्यासाठी भाजपकडून 'बी टीम' उभी केली जाते. आरजीने तेच केले आहे. काँग्रेस स्वाभिमानी पक्ष असून, पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा प्रवेश देण्यासाठी प्रयत्न केलेला नाही, अशी माहिती पक्षाचे नवे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी दिली.

गोवा दौऱ्यावर असलेल्या ठाकरे यांनी काल, बुधवारी 'लोकमत' कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी आयोजित वार्तालापावेळी ते बोलत होते. फेब्रुवारी २०२२च्या विधानसभा निवडणुकीत आरजीमुळे काही मतदार संघांमध्ये काँग्रेसचा विजय हुकला. आरजीने काँग्रेसची मते घेतली. आता लोकसभेसाठीही या पक्षाने दोन्ही मतदार संघांमध्ये आधीच आपले उमेदवार जाहीर केले आहेत? त्याबद्दल विचारले असता ठाकरे म्हणाले की, भाजप प्रत्येक राज्यात एखादा पक्ष हाताशी धरतो आणि काँग्रेसची मते फोडतो. तेलंगणातही त्यांनी असाच प्रयत्न केला. परंतु, तो यशस्वी होऊ शकला नाही.

गेली दोन दिवस मी येथील आमदार, प्रदेश समितीचे पदाधिकारी, गटाध्यक्ष, प्रमुख कार्यकर्ते यांना वैयक्तिकपणे भेटून येथील राजकीय स्थिती समजून घेतली. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काय करायला हवे, याबद्दल काहीजणांनी चांगल्या सूचनाही केल्या. 

अयोध्या सोहळ्यात भक्तीपेक्षा राजकारण जास्त

२२ रोजी अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी तसेच पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी संघ- भाजपचा हा राजकीय प्रकल्प आहे. यात भाजपचा भवित्तभाव वगैरे काही नाही, असा आरोप करत फेटाळले आहे. त्याबद्दल ठाकरे म्हणाले की, भाजपकडून प्रभू श्रीरामचंद्राला राजकारणात ओढले जात आहे, हे दुर्दैव आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी घेतलेली भूमिका योग्यच आहे.

राष्ट्रीयस्तरावर विरोधकांची 'इंडिया' आघाडी आकार घेत असल्याबद्दल ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. विरोधकांची ही आघाडी लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करणार का? या प्रश्नावर ठाकरे म्हणाले की, काँग्रेससुद्धा कधीच निवडणुकीपूर्वी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करत नाही. मल्लिकार्जुन खर्गेचे नाव मला वर्तमानपत्रांमधूनच समजले. - माणिकराव ठाकरे, काँग्रेस नेते

 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसManikrao Thackreyमाणिकराव ठाकरेManikrao Thakareमाणिकराव ठाकरे