शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

मते फोडण्यासाठी भाजप 'बी टीम' उभी करते! माणिकराव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 08:12 IST

'लोकमत'ला सदिच्छा भेट; अनेक विषयांवर भाष्य

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : प्रत्येक राज्यात सत्ता मिळविणे हे भाजपचे लक्ष्य आहे. त्यासाठी त्या-त्या राज्यात काँग्रेसची मते फोडण्यासाठी भाजपकडून 'बी टीम' उभी केली जाते. आरजीने तेच केले आहे. काँग्रेस स्वाभिमानी पक्ष असून, पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा प्रवेश देण्यासाठी प्रयत्न केलेला नाही, अशी माहिती पक्षाचे नवे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी दिली.

गोवा दौऱ्यावर असलेल्या ठाकरे यांनी काल, बुधवारी 'लोकमत' कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी आयोजित वार्तालापावेळी ते बोलत होते. फेब्रुवारी २०२२च्या विधानसभा निवडणुकीत आरजीमुळे काही मतदार संघांमध्ये काँग्रेसचा विजय हुकला. आरजीने काँग्रेसची मते घेतली. आता लोकसभेसाठीही या पक्षाने दोन्ही मतदार संघांमध्ये आधीच आपले उमेदवार जाहीर केले आहेत? त्याबद्दल विचारले असता ठाकरे म्हणाले की, भाजप प्रत्येक राज्यात एखादा पक्ष हाताशी धरतो आणि काँग्रेसची मते फोडतो. तेलंगणातही त्यांनी असाच प्रयत्न केला. परंतु, तो यशस्वी होऊ शकला नाही.

गेली दोन दिवस मी येथील आमदार, प्रदेश समितीचे पदाधिकारी, गटाध्यक्ष, प्रमुख कार्यकर्ते यांना वैयक्तिकपणे भेटून येथील राजकीय स्थिती समजून घेतली. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काय करायला हवे, याबद्दल काहीजणांनी चांगल्या सूचनाही केल्या. 

अयोध्या सोहळ्यात भक्तीपेक्षा राजकारण जास्त

२२ रोजी अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी तसेच पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी संघ- भाजपचा हा राजकीय प्रकल्प आहे. यात भाजपचा भवित्तभाव वगैरे काही नाही, असा आरोप करत फेटाळले आहे. त्याबद्दल ठाकरे म्हणाले की, भाजपकडून प्रभू श्रीरामचंद्राला राजकारणात ओढले जात आहे, हे दुर्दैव आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी घेतलेली भूमिका योग्यच आहे.

राष्ट्रीयस्तरावर विरोधकांची 'इंडिया' आघाडी आकार घेत असल्याबद्दल ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. विरोधकांची ही आघाडी लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करणार का? या प्रश्नावर ठाकरे म्हणाले की, काँग्रेससुद्धा कधीच निवडणुकीपूर्वी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करत नाही. मल्लिकार्जुन खर्गेचे नाव मला वर्तमानपत्रांमधूनच समजले. - माणिकराव ठाकरे, काँग्रेस नेते

 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसManikrao Thackreyमाणिकराव ठाकरेManikrao Thakareमाणिकराव ठाकरे