शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडून फुटीचे राजकारण: माणिकराव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 13:35 IST

नावेली जिल्हा पंचायत सदस्य एडविन कार्दोझ काँग्रेसमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : आरएसएस समर्थित भाजप सरकारने कोणत्या प्रकारचे फुटीर राजकारण केले आहे याची गोमंतकीयांना जाणीव आहे. सरकारला राज्यातील विकास आणि मूलभूत सुविधा पुरवण्याची अजिबात काळजी नाही. राज्यातील रस्ते आणि मूलभूत सुविधांची दुरवस्था झाली आहे, अशी टीका काँग्रेसचेगोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केली. शनिवारी संध्याकाळी नावेली जिल्हा पंचायत सदस्य एडविन कार्दोझ (सिप्नु) यांनी नावेलीतील इतर प्रमुख व्यक्तींसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी ठाकरे बोलत होते.

या पक्ष प्रवेशावेळी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, खासदार विरियातो फर्नाडिस आदी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, की नावेलीच्या जनतेने आगामी निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा द्यावा. गेल्या निवडणुकीत दक्षिण गोव्याच्या खासदाराला मतदान केल्याप्रमाणे काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून द्यावे. खासदार फर्नांडिस यांनी सांगितले, की राजकारणी लोकांना कसे मूर्ख बनवत, हे नावेलीतील लोकांनी लक्षात घ्यावे. जनतेने काँग्रेस पक्षासोबत राहावे आणि येणाऱ्या निवडणुकीत नावेली मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार निवडून द्यावे. यावेळी पाटकर म्हणाले की, माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी लोकांना अनेक आश्वासने दिली होती आणि त्यावेळी लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून भाजपला मतदान केले पण त्या बदल्यात भाजपने त्यांची फसवणूक केली. २०१७ मध्येही भाजपने सत्तेत येण्यासाठी कसे खालच्या पातळीवरचे डावपेच खेळले.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, नावेली मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल. यावेळी लोकांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा द्यावा आणि भाजपच्या पोकळ आश्वासनांना बळी पडू नये.

एडविन कार्दोझ यांनी सांगितले की, मी खूप दिवसांपासून काँग्रेस पक्षात सामील होण्याचा विचार करत होतो. बरेच लोक मला काँग्रेस पक्षात सामील होण्याचे सांगत होते आणि आता मी सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. काही लोक मतदारांमध्ये फूट पाडण्याचा आणि भाजपला विजय मिळवून देण्यात भूमिका बजावण्याचा विचार करत आहेत. परंतु यावेळी आपण सतर्क राहिले पाहिजे आणि अशा योजना यशस्वी होऊ देऊ नयेत.

खासदार फर्नांडिस म्हणाले, की भाजप सरकार गोवा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे. गोव्यातील डोंगर नष्ट करून त्या जागी मोठमोठे प्रकल्प आणले जात आहे. कोळसा वाहतूक वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोकांनी भाजपचा हा डाव वेळीच ओळखावा व त्याला विरोध करावा. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणManikrao Thakareमाणिकराव ठाकरेManikrao Thackreyमाणिकराव ठाकरेcongressकाँग्रेस