शहरं
Join us  
Trending Stories
1
विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
2
'आम्हीदेखील देशाचे प्रतिनिधित्व करतो, पण..', पुतिन यांची भेट नाकारल्याने राहुल गांधी संतापले
3
डिजिटल बँकिंगचे नवे नियम १ तारखेपासून लागू होणार; तुमच्यासाठी काय बदलणार, जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
5
थायलंड फिरायला गेले, पण मृत्यूनं गाठलं; दोन्ही मित्र स्विमिंग पूलमध्ये मृतावस्थेत! नेमकं काय झालं?
6
itel Rhythm Echo TWS Earbuds: बॅटरी लाईफही हवी, आजुबाजुचा गोंगाट घालविणारा इअरबड हवा, मग...;  हा बजेटमधील इअरबड कसा आहे...?
7
हायवेवरील ट्रकला कारने दिली जोरदार धडक; ४ डॉक्टरांचा जागीच मृत्यू, आई वडिलांचं स्वप्न भंगलं
8
'मागेल तेवढ्या पगाराची नोकरी', स्वतःच्या स्वप्नांसाठी दुसऱ्यांच्या स्वप्नाची राखरांगोळी 
9
एखाद्या ‘सुंदरी’चा फोटो तीन मिनिटांत करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे, ऑनलाइन व्यवहार करताना सावध रहा
10
High Tide Mumbai: चार दिवस समुद्राला मोठी भरती; साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच लाटा
11
२८ वर्ष जुन्या मित्राला सोबत घेण्यासाठी भाजपाच्या हालचाली?; पुन्हा समीकरणे जुळवण्याची तयारी
12
VIDEO ...अन् रोहितनं केली रिषभ पंतची इच्छापूर्ती! पण हिटमॅननं काय विश मागितली असेल बरं?
13
वाहन चालकांनो, ‘आरटीओ’ कधीच ‘एपीके’ पाठवत नाही; लायसन्स व्हेरिफिकेशनच्या आडून लूट
14
चेहऱ्यावर पदर, हातात गिटार... 'मैंने कभी सोचा ना था' गाण्याने व्हायरल झालेली नववधू आहे कोण?
15
OnePlus Ace 6T: 'इतकी' मोठी बॅटरी...! वनप्लसनं बाजारात आणलाय दीर्घकाळ टिकणारा फोन, किंमत किती?
16
Dhule Crime: मौजमज्जा करण्यासाठी बी. टेकच्या विद्यार्थ्याने मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच घरावर टाकला दरोडा; १० तोळे सोने चोरले
17
‘कायद्यात त्वरित बदल करा’, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार समित्या उद्या बंद, व्यापाऱ्यांचे आंदोलन 
18
VIDEO: बाबाजी का ठुल्लू... विराट कोहलीचे मजेशीर हावभाव, विकेट पडताच मैदानात धमाल-मस्ती
19
सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
20
'सेन्यार'चा कहर थांबेना; थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया अन् श्रीलंका पूरामुळे बेजार! १४००हून अधिक लोकांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडून फुटीचे राजकारण: माणिकराव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 13:35 IST

नावेली जिल्हा पंचायत सदस्य एडविन कार्दोझ काँग्रेसमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : आरएसएस समर्थित भाजप सरकारने कोणत्या प्रकारचे फुटीर राजकारण केले आहे याची गोमंतकीयांना जाणीव आहे. सरकारला राज्यातील विकास आणि मूलभूत सुविधा पुरवण्याची अजिबात काळजी नाही. राज्यातील रस्ते आणि मूलभूत सुविधांची दुरवस्था झाली आहे, अशी टीका काँग्रेसचेगोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केली. शनिवारी संध्याकाळी नावेली जिल्हा पंचायत सदस्य एडविन कार्दोझ (सिप्नु) यांनी नावेलीतील इतर प्रमुख व्यक्तींसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी ठाकरे बोलत होते.

या पक्ष प्रवेशावेळी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, खासदार विरियातो फर्नाडिस आदी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, की नावेलीच्या जनतेने आगामी निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा द्यावा. गेल्या निवडणुकीत दक्षिण गोव्याच्या खासदाराला मतदान केल्याप्रमाणे काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून द्यावे. खासदार फर्नांडिस यांनी सांगितले, की राजकारणी लोकांना कसे मूर्ख बनवत, हे नावेलीतील लोकांनी लक्षात घ्यावे. जनतेने काँग्रेस पक्षासोबत राहावे आणि येणाऱ्या निवडणुकीत नावेली मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार निवडून द्यावे. यावेळी पाटकर म्हणाले की, माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी लोकांना अनेक आश्वासने दिली होती आणि त्यावेळी लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून भाजपला मतदान केले पण त्या बदल्यात भाजपने त्यांची फसवणूक केली. २०१७ मध्येही भाजपने सत्तेत येण्यासाठी कसे खालच्या पातळीवरचे डावपेच खेळले.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, नावेली मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल. यावेळी लोकांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा द्यावा आणि भाजपच्या पोकळ आश्वासनांना बळी पडू नये.

एडविन कार्दोझ यांनी सांगितले की, मी खूप दिवसांपासून काँग्रेस पक्षात सामील होण्याचा विचार करत होतो. बरेच लोक मला काँग्रेस पक्षात सामील होण्याचे सांगत होते आणि आता मी सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. काही लोक मतदारांमध्ये फूट पाडण्याचा आणि भाजपला विजय मिळवून देण्यात भूमिका बजावण्याचा विचार करत आहेत. परंतु यावेळी आपण सतर्क राहिले पाहिजे आणि अशा योजना यशस्वी होऊ देऊ नयेत.

खासदार फर्नांडिस म्हणाले, की भाजप सरकार गोवा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे. गोव्यातील डोंगर नष्ट करून त्या जागी मोठमोठे प्रकल्प आणले जात आहे. कोळसा वाहतूक वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोकांनी भाजपचा हा डाव वेळीच ओळखावा व त्याला विरोध करावा. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणManikrao Thakareमाणिकराव ठाकरेManikrao Thackreyमाणिकराव ठाकरेcongressकाँग्रेस