शहरं
Join us  
Trending Stories
1
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
2
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
3
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
4
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
5
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
6
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
7
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
8
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
9
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
10
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
11
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
12
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
13
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
14
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
15
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
16
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
17
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
18
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
19
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
20
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!

भाजपकडून फुटीचे राजकारण: माणिकराव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 13:35 IST

नावेली जिल्हा पंचायत सदस्य एडविन कार्दोझ काँग्रेसमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : आरएसएस समर्थित भाजप सरकारने कोणत्या प्रकारचे फुटीर राजकारण केले आहे याची गोमंतकीयांना जाणीव आहे. सरकारला राज्यातील विकास आणि मूलभूत सुविधा पुरवण्याची अजिबात काळजी नाही. राज्यातील रस्ते आणि मूलभूत सुविधांची दुरवस्था झाली आहे, अशी टीका काँग्रेसचेगोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केली. शनिवारी संध्याकाळी नावेली जिल्हा पंचायत सदस्य एडविन कार्दोझ (सिप्नु) यांनी नावेलीतील इतर प्रमुख व्यक्तींसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी ठाकरे बोलत होते.

या पक्ष प्रवेशावेळी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, खासदार विरियातो फर्नाडिस आदी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, की नावेलीच्या जनतेने आगामी निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा द्यावा. गेल्या निवडणुकीत दक्षिण गोव्याच्या खासदाराला मतदान केल्याप्रमाणे काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून द्यावे. खासदार फर्नांडिस यांनी सांगितले, की राजकारणी लोकांना कसे मूर्ख बनवत, हे नावेलीतील लोकांनी लक्षात घ्यावे. जनतेने काँग्रेस पक्षासोबत राहावे आणि येणाऱ्या निवडणुकीत नावेली मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार निवडून द्यावे. यावेळी पाटकर म्हणाले की, माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी लोकांना अनेक आश्वासने दिली होती आणि त्यावेळी लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून भाजपला मतदान केले पण त्या बदल्यात भाजपने त्यांची फसवणूक केली. २०१७ मध्येही भाजपने सत्तेत येण्यासाठी कसे खालच्या पातळीवरचे डावपेच खेळले.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, नावेली मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल. यावेळी लोकांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा द्यावा आणि भाजपच्या पोकळ आश्वासनांना बळी पडू नये.

एडविन कार्दोझ यांनी सांगितले की, मी खूप दिवसांपासून काँग्रेस पक्षात सामील होण्याचा विचार करत होतो. बरेच लोक मला काँग्रेस पक्षात सामील होण्याचे सांगत होते आणि आता मी सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. काही लोक मतदारांमध्ये फूट पाडण्याचा आणि भाजपला विजय मिळवून देण्यात भूमिका बजावण्याचा विचार करत आहेत. परंतु यावेळी आपण सतर्क राहिले पाहिजे आणि अशा योजना यशस्वी होऊ देऊ नयेत.

खासदार फर्नांडिस म्हणाले, की भाजप सरकार गोवा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे. गोव्यातील डोंगर नष्ट करून त्या जागी मोठमोठे प्रकल्प आणले जात आहे. कोळसा वाहतूक वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोकांनी भाजपचा हा डाव वेळीच ओळखावा व त्याला विरोध करावा. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणManikrao Thakareमाणिकराव ठाकरेManikrao Thackreyमाणिकराव ठाकरेcongressकाँग्रेस