शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात भाजपा-मगो युती दुभंगण्याची शक्यता; एकमेकांच्या मतदारसंघात नेते सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 08:44 IST

२०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने २७ जागांवर विजय मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. विधानसभा निवडणूक जवळ आल्यानंतर भाजप आणि मगो संघर्ष तीव्र होईल व मग युती दुभंगण्याची शक्यता आहे, अशी माहिती मिळते.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भाजप आणि मगो हे दोन्ही पक्ष सत्तेत असले तरी, दोन्ही पक्ष आतापासूनच एकमेकांच्या मतदारसंघात जास्त सक्रिय झाल्याने संभाव्य उमेदवारांचे कार्यकर्ते चलबिचल झाले आहेत. जे मतदारसंघ मगो पक्षाकडे नाहीत, तिथे मगोपचे नेते जाऊन काम करत आहेत व जिथे मगोपचे आमदार आहेत, तिथे भाजप नेते सक्रिय झाले आहेत. यामुळे दोन्ही पक्षांमधील काही कार्यकर्तेही गोंधळले आहेत. विधानसभा निवडणूक जवळ आल्यानंतर हा संघर्ष तीव्र होईल व मग युती दुभंगण्याची शक्यता आहे, अशी माहिती मिळते.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना २०२२ च्या विधानसभा निवडणुकीवेळीही भाजप-मगो अशी युती नकोच होती. त्यांनी त्यावेळी आक्षेप घेतला होता, पण देवेंद्र फडणवीस हे त्यावेळी गोव्यात भाजपचे निवडणूक प्रभारी होते. त्यांनी आणि मंत्री विश्वजीत राणे यांनी त्यावेळी ढवळीकर यांच्यासोबत खूप बैठका घेऊन युतीसाठी प्रयत्न केले होते. पण मगोपने तेव्हा तृणमूल काँग्रेससोबत युती केली. मग निवडणूक निकाल लागल्यानंतर गृहमंत्री अमित शाह, फडणवीस व विश्वजीत यांच्यामुळेच सुदिन ढवळीकर यांना मंत्रिपद मिळाले.

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री सावंत यांनी मांद्रे मतदारसंघात जाऊन हा मतदारसंघ भाजपच लढवणार, असे जाहीर केले. यामुळे नव्याने संघर्ष सुरू झाला आहे. सुदिन ढवळीकर यांनी मांद्रे हा मगोपचा पारंपरिक मतदारसंघ असा दावा केला. पण त्यांनी मुख्यमंत्र्यांना दोष दिलेला नाही. तथापि, कार्यकर्त्यांना बरेच काही कळून आले आहे. जीत आरोलकर हे मगोपचे आमदार असले तरी, त्यांना ढवळीकर यांच्यापासून दूर करून भाजपच्या जवळ आणण्यात मुख्यमंत्री सावंत हे यशस्वी ठरू लागले आहेत. मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी चार दिवसांपूर्वीच प्रियोळ मतदारसंघात जाऊन महिला मेळावा घेतला व आपण प्रियोळमधून निवडणूक लढवीनच, असे जाहीर केले आहे. यामुळे मंत्री गोविंद गावडे यांचे समर्थक आश्चर्यचकित झाले आहेत.

२७ जागांवर विजय मिळवणे हेच भाजपचे लक्ष्य : दामू नाईक

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले की, सर्व चाळीसही मतदारसंघांमध्ये पक्ष संघटन वाढवणे ही माझी जबाबदारी आहे. पक्ष वाढवण्यासाठी जे काही करायला हवे ते करण्याचे पूर्ण अधिकार प्रदेशाध्यक्ष या नात्याने मला आहेत. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने २७ जागांवर विजय मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे व त्या दृष्टिकोनातून आमचे काम सुरू आहे. सरकारमध्ये घटक असलेल्या मगोपकडे आमचे चांगले संबंध आहेत. ते पुढेही चालूच ठेवू, परंतु आमच्या पक्षाचे नुकसान करून नव्हे. २०२७ मध्ये युती असावी की नाही याचा निर्णय केंद्रीय नेते घेतील. त्यावेळी प्लस-मायनस काय ते होईल. परंतु आम्ही त्यांच्या मतदारसंघात कामच करू नये, असे म्हणता येणार नाही.

युतीत काही जणांनी मुद्दामहून राजकारण आणले : ढवळीकर

युतीमध्ये काहीजणांनी मुद्दामहून राजकारण आणले आहे. केंद्रीय नेतृत्वाला आम्ही भाजपसोबत राहणार, अशी ग्वाही त्यावेळी दिलेली आहे. २०२७ मध्ये जर भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी वेगळा विचार केला तर मग आम्हाला आमची भूमिका घ्यावी लागेल. पक्ष म्हणून प्रत्येक मतदारसंघात काम करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. प्रियोळमध्ये माझे मतदार आहेत, तिथे मी परवा महिला मेळावा घेतला. मांद्रेतही तिथेही मेळावा घेऊ. मांद्रेचे आमचे आमदार जीत आरोलकर यांना विश्वासात घेऊनच मांद्रेबद्दल पुढील निर्णय घेतला जाईल, असे मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारणPramod Sawantप्रमोद सावंत