शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

विरोधक गारद होताना भाजप मात्र लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 11:37 IST

देशातील काही प्रादेशिक पक्ष अस्तित्वाची लढाई लढत आहेत.

- सद्गुरु पाटील

लोकसभा निवडणूक जर भाजपने सहा महिने अगोदर घेतली तर सर्व विरोधी पक्षांची गोची होणार आहे. कारण विरोधकांची अजून तयारी झालेली नाही, भाजप मात्र निवडणुकीला सामोरा जाण्यासाठी तयार झालेला आहे.

२०१४ पासून देशातील राजकारण बदलले. विरोधकांची केवळ तोंडे बंद करून ठेवणे पुरेसे नाही तर या विरोधी नेत्यांचे पक्ष संपवण्याची नवी स्टाईल २०१९ पासून आक्रमक झाली आहे. महाराष्ट्रात जे महाभारत सुरु आहे. त्यातून दोन भाजपविरोधी राजकीय पक्ष मुळासकट हादरले आहेत. यातून केवळ विरोधी नेते संपू लागलेत असे नव्हे तर खुद्द भाजपमधीलही अनेकजण मुस्कटदाबी सहन करत आहेत. भाजपमध्ये निष्ठावान जळफळाट व तडफड आतल्याआत अनुभवत आहेत. 

बहुतेकजण सहन करत आहेत. कारण परिस्थितीच तशी आहे. आवाज काढून किंवा बोलून सध्या अर्थ नाही. एखादीच पंकजा मुंडे किंवा नितीन गडकरी अधूनमधून बोलतात.अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून फोडून भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी शरद पवार यांना मोठा शह दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्वच संकटात आणले आहे. एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजप नेत्यांनी बाहेर काढले व उद्धव ठाकरे यांना जवळजवळ नेस्तनाबूत करून ठेवले आहे. ठाकरेंची सेना तूर्त अस्तित्वहीन होऊ लागली आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर केला की, बड़े बड़े राजकीय विरोधक पायाशी येतात हे भाजप नेत्यांनी ओळखले आहे. देशभरातील अनेक विरोधी आमदार सध्या भाजप श्रेष्ठीच्या पायाशी लोळण घेऊ लागले आहेत. काहीजण लोळण घेण्याच्या मार्गावर आहेत, गोव्यासह महाराष्ट्र व आसामपर्यंत हीच स्थिती आहे.

२०२४ मध्ये पुन्हा मोदीच अधिकारावर येतील अशी खूणगाठ मनाशी बाळगून प्रफुल्ल पटेलसह अनेक नेते भाजपला शरण गेले आहेत. सत्ता आणि प्रोटेक्शन हवेय गोव्यातील राजकीय नेत्यांनी व महाराष्ट्रातील पटेल आदी नेत्यांनी ओळखले आहे. 

कोकणातील नारायण राणेपासून गोव्यातील बाबूश मोन्सेरातपर्यंत सगळे नेते भाजपचा जयजयकार करत आहेत. यामागे देशप्रेम किंवा समाजप्रेम आहे असा अर्थ काढणे हा मोठा विनोद ठरेल. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामतांपासून मायकल लोबोंपर्यंत सगळेजण तौड गप्प ठेवून पुन्हा भाजपमध्ये परतले. कारण केंद्रात भाजपची सत्ता असताना आपण विरोधात राहून संघर्ष करू शकणार नाही हे त्यांनी ओळखले. आता विजय सरदेसाई यांच्या कसोटीचा काळ आहे. गोवा फॉरवर्ड पक्ष संपेल की जगेल हे पुढील दोन वर्षांत कळून येणार आहे. सरदेसाई हे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या विरोधात आहेत पण ते भाजपच्या विरोधात नाहीत, असा समज भाजपच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नेत्यांनी करून घेतलेला आहे. 

सुदिन ढवळीकर अगोदरच भाजपच्या मांडीवर बसलेले असल्याने ते सेफ झोनमध्ये आहेत. सरदेसाई यांचे राजकीय भवितव्य सध्या पणाला लागले आहेत. ते आपला पक्ष वाढविण्यासाठी धडपडही करत नाहीत. काँग्रेसचे युरी आलेमाव बिचारे विरोधी पक्षनेतेपद घेऊन बसले आहेत. काँग्रेस पक्ष जे काही काम देईल तेवढेच करावे असे युरीने ठरवलेले दिसते. पुढील विधानसभा निवडणुकीत कुंकळी मतदारसंघात युरीचीही मोठी कसोटी लागणार आहे. 

भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी राजकारणाचा फॉर्म पूर्ण बदलून टाकलाय. पूर्वी काँग्रेस किंवा अन्य पक्षातून भाजपमध्ये एखादा नेता आला की, त्याला लवकर कोअर टीममध्ये घेतले जात नव्हते. त्याला प्रदेशाध्यक्षपद किंवा मुख्यमंत्रिपद दिले जात नव्हते, पण आता ते दिले जाते. गेल्या आठवड्यात सुनील जाखड यांची पंजाब भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली. ते अलिकडेच भाजपमध्ये आले आहेत. आसामाचे हेमंत बिश्व शर्मा है २०१४ पर्यंत काँग्रेसचे नेते होते. आता ते भाजपचे निष्ठावान असून ते आसामचे मुख्यमंत्री आहेत. अरुणाचल प्रदेशचे पेमा खांडू, मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग किंवा त्रिपुराचे सीएम माणिक साहा हे बडे नेते मूळचे भाजपचे नव्हेतच ते काँग्रेसमधूनच भाजपमध्ये आलेत. त्यांच्याकडे आज नेतृत्वाची धुरा आहे. अजित पवार यांनादेखील मुख्यमंत्रिपदाची हमी दिली गेली असावी.

एक दिवस अजित पवार वगैरे भाजपमध्ये विलीन होतील व मुख्यमंत्री होतील असे म्हणण्यास वाव आहे. आपण पाचवेळा उपमुख्यमंत्री झालो, आपल्याला मुख्यमंत्री व्हायचे आहे, असे अजित पवार यांनी गेल्याच आठवड्यात म्हटले आहे. शेवटी भाजपला महाराष्ट्रात पक्ष वाढविण्यासाठी प्रबळ मराठा नेतृत्व हवे आहे. देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात नेले जाऊ शकते. कर्नाटकमध्ये अलिकडेपर्यंत भाजप सरकारचे जेमुख्यमंत्री होते, ते बोम्मईदेखील एकेकाळी जनता दलाचेच होते. आपण काँग्रेसमधून भाजपमध्ये आलो तरी, नजीकच्या भविष्यात आपणदेखील गोव्यात मुख्यमंत्री होऊ शकतो, असे मंत्री विश्वजित राणे यांना वाटते. रोहन खंवटे यांनादेखील तसेच स्वप्न पडते.

पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी आपला पक्ष घट्ट पकडून भाजपविरुद्ध लढत आहेत. त्यांच्या तृणमूल काँग्रेसचीही आतापर्यंत बरीच तोडफोड भाजपने केली आहे. काही नेते तुरुंगातही जाऊन आले. बॅनर्जीचा संघर्ष सुरु आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांचाही संघर्ष तसाच सुरु आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांचे लाँचिंग पक्षाकडून अनेकदा केले जाते. मात्र आज या टप्प्यावरदेखील राहुल गांधी भाजपला टक्कर देण्याएवढे सक्षम नाहीत. राहुल, ममता, नितीश कुमार किंवा शरद पवार, उद्भव, केजरीवाल यांचा संघर्ष जास्त काळ चालेल असे अनेकांना वाटत नाही. ममता आज ६८ वर्षाच्या आहेत, तर शरद पवार ८३. नितीश कुमार ७२ वर्षांचे आहेत. देशभर प्रचार करत मोदींना टक्कर देण्याच्या स्थितीत हे नेते आणि त्यांचे पक्षही नाहीत. विरोधक आणि छोटे विरोधी पक्ष संपत आहेत ही शोकांतिका नव्हे का?

लोकसभा निवडणूक जर भाजपने सहा महिने अगोदर घेतली तर सर्व विरोधी पक्षांची गोची होणार आहे. कारण विरोधकांची अजून तयारी झालेली नाही, भाजप मात्र निवडणुकीला सामोरा जाण्यासाठी तयार झालेला आहे.

देशातील काही प्रादेशिक पक्ष अस्तित्वाची लढाई लढत आहेत. काही पक्ष संपून जातील. गोव्यात म.गो. पक्ष केवळ पक्षाच्या लेटर हेडवर नावापुरताच दिसू लागलाय. दिल्लीत आम आदमी पक्षाने केंद्रीय भाजप नेत्यांशी लढा देण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम असा झाला की मनीष सिसोदियांसारखा नेताही आता तुरुंगात आहे. अरविंद केजरीवाल आता विरोधी पक्षांची मोट बांधू पाहतात. आपल्यासोबत काँग्रेसनेही यावे असे केजरीवाल यांना आता वाटते. मात्र भाजपला घाम काढण्यापूर्वी आपण काँग्रेसला संपवूया व काँग्रेसची जागा आपण प्राप्त करूया, असे केजरीवाल व आपने दहा वर्षापूर्वी ठरवले होते. आता आम आदमी पक्षाच्या शेपटीलाच आग लागलेली असल्याने काँग्रेसने आपल्यासोबत यावे अन्य सर्व विरोधी पक्षांनी आपली साथ द्यावी, असे केजरीवाल यांना वाटते.

टॅग्स :goaगोवाlok sabhaलोकसभा