शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

भाजप-काँग्रेस म्हादईचे डिलर: मनोज परब

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 12:56 IST

पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्यासोबत आमदार वीरेश बोरकर उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : म्हादईच्या विषयावरुन पुन्हा एकदा राज्य सरकार कर्नाटकच्या पुढ्यात नतमस्तक झाले आहे. प्रवाहची बैठक बंगळुरू येथे पार पडली. या बैठकीत कर्नाटकचे ३० प्रतिनिधी उपस्थित होते, तर गोव्याचे केवळ ३ प्रतिनिधी होते. यावरुन राज्य सरकार म्हादईबाबत किती गंभीर आहे हे दिसून येते. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष म्हादईचे डिलर आहेत हे लोकांनी जाणून घ्यावे, अशी टीका रिव्होल्यूशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब यांनी केली. आज, गुरुवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्यासोबत आमदार वीरेश बोरकर उपस्थित होते.

गृहमंत्री अमित शाह यांनी म्हादई कर्नाटकडेच राहणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यांचे हे आश्वासन येथील भाजप सरकार पूर्ण करत करताना दिसत आहे. प्रवाहाच्या बैठकीनंतर जेव्हा हतबल होत जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर सांगतात की, आम्ही संयुक्त पाहणीची मागणी केली होती, पण कर्नाटकने ही मागणी नाकारली. यावरुन आमचे सरकार, मंत्री किती कुमकुवत झाले आहे हे स्पष्ट होते, असेही परब यांनी सांगितले.

...तर नळाला पाणी येईल

काँग्रेस पूर्वी म्हादईसाठी आंदोलने करायचे, पण जसे कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार आले तेव्हा त्यांनी आंदोलने बंद केली. भाजपच्या डबल इंजिन सरकारने निवडणुकीवेळी होणारा फायदा पाहत आणि काँग्रेसने आपले सरकार मजबूत करण्यासाठी म्हादईचा गळा घोटला आहे. लोकांनी या गोष्टी समजून घेत या दोन्ही पक्षांना मते देणे आता बंद केले पाहीजे. तरच आमच्या नळाला पाणी राहणार आहे, असेही परब म्हणाले.

जिथे काम चालू आहे, तिथे जाऊन पाहणी करा : वीरेश

आतापर्यंत अनेकदा म्हादईची पाहणी करण्यात आली आहे. परंतु, ज्या ठिकाणी पाणी वळविण्यासाठी काम होत आहे त्या कळसा-भांडुरा प्रकल्पाला अद्याप सरकारने भेट दिलेली नाही. खरेतर त्या ठिकाणी जाऊन पाहणी करणे आवश्यक आहे. मात्र सरकार त्याबाबतीत निद्रीस्त आहे, असे आमदार वीरेश बोरकर म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण