शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

भाजप-काँग्रेस म्हादईचे डिलर: मनोज परब

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 12:56 IST

पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्यासोबत आमदार वीरेश बोरकर उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : म्हादईच्या विषयावरुन पुन्हा एकदा राज्य सरकार कर्नाटकच्या पुढ्यात नतमस्तक झाले आहे. प्रवाहची बैठक बंगळुरू येथे पार पडली. या बैठकीत कर्नाटकचे ३० प्रतिनिधी उपस्थित होते, तर गोव्याचे केवळ ३ प्रतिनिधी होते. यावरुन राज्य सरकार म्हादईबाबत किती गंभीर आहे हे दिसून येते. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष म्हादईचे डिलर आहेत हे लोकांनी जाणून घ्यावे, अशी टीका रिव्होल्यूशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब यांनी केली. आज, गुरुवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्यासोबत आमदार वीरेश बोरकर उपस्थित होते.

गृहमंत्री अमित शाह यांनी म्हादई कर्नाटकडेच राहणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यांचे हे आश्वासन येथील भाजप सरकार पूर्ण करत करताना दिसत आहे. प्रवाहाच्या बैठकीनंतर जेव्हा हतबल होत जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर सांगतात की, आम्ही संयुक्त पाहणीची मागणी केली होती, पण कर्नाटकने ही मागणी नाकारली. यावरुन आमचे सरकार, मंत्री किती कुमकुवत झाले आहे हे स्पष्ट होते, असेही परब यांनी सांगितले.

...तर नळाला पाणी येईल

काँग्रेस पूर्वी म्हादईसाठी आंदोलने करायचे, पण जसे कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार आले तेव्हा त्यांनी आंदोलने बंद केली. भाजपच्या डबल इंजिन सरकारने निवडणुकीवेळी होणारा फायदा पाहत आणि काँग्रेसने आपले सरकार मजबूत करण्यासाठी म्हादईचा गळा घोटला आहे. लोकांनी या गोष्टी समजून घेत या दोन्ही पक्षांना मते देणे आता बंद केले पाहीजे. तरच आमच्या नळाला पाणी राहणार आहे, असेही परब म्हणाले.

जिथे काम चालू आहे, तिथे जाऊन पाहणी करा : वीरेश

आतापर्यंत अनेकदा म्हादईची पाहणी करण्यात आली आहे. परंतु, ज्या ठिकाणी पाणी वळविण्यासाठी काम होत आहे त्या कळसा-भांडुरा प्रकल्पाला अद्याप सरकारने भेट दिलेली नाही. खरेतर त्या ठिकाणी जाऊन पाहणी करणे आवश्यक आहे. मात्र सरकार त्याबाबतीत निद्रीस्त आहे, असे आमदार वीरेश बोरकर म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण