शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

तूर्त गोव्याचे मुख्यमंत्री बदलण्याची गरज नाही, भाजपाची सावध भुमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 14:21 IST

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या गंभीर आजारामुळे राज्यात निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना भाजपाचे अध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी तूर्त मुख्यमंत्री बदलण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.

पणजी - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या गंभीर आजारामुळे राज्यात निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना भाजपाचे अध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी तूर्त मुख्यमंत्री बदलण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही त्यांनी सांगितले. 

मुख्यमंत्र्यांना तातडीने दिल्ली येथील एम्स् रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर गोव्यात नेतृत्वबदलासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या. परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय निरीक्षक गोव्यात दाखल झाले आहेत. निरीक्षक बी. एल. संतोष सकाळी दाखल झाले होते. तर विजय पुराणिक दुपारी पोहोचले. हे निरीक्षक पणजीतील ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत तिथे भाजापचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, खासदार नरेंद्र सावईकर, पक्षाचे सरचिटणीस सदानंद शेट तनावडे आणि इतर पदाधिकारी त्यांना भेटले. सरकारातील प्रत्येक आमदारांचे मत जाणून घेण्यापूर्वी पक्षाच्या कोअर टीमकडे चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. 

निरीक्षकांना भेटून हॉटेलमधून बाहेर पडताना प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांनी नेतृत्व बदलाचा सध्या तरी प्रश्न नसल्याचे सांगितले. मुख्यमंत्री पर्रीकर यांची प्रकृती स्थिर झाली असून तेच सरकारचे नेतृत्व करतील. इतर काही बदल होणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु कोणते बदल ते स्पष्ट केले नाही. मुख्यमंत्री पदाचा ताबा सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर किंवा नगर नियोजन खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांच्याकडे सोपविण्याच्या प्रस्तावाविषयी विचारले असताही त्यांनी सध्या तशी गरज नसल्याचे सांगितले.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवाBJPभाजपा