शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
2
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
4
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
5
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
6
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
7
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
8
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
9
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
10
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
11
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
12
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
13
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
14
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
15
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
16
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
17
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
18
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
19
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
20
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
Daily Top 2Weekly Top 5

संपादकीय: जंगले जळतात, माणसे रडतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 12:51 IST

सत्तरी तालुक्यातच आगी लागल्या असे नव्हे तर कुठ्ठाळीच्या जंगलातही वणवा पसरला.

गेले काही दिवस राज्यात जंगले जळत आहेत. सत्तरी तालुक्यातच आगी लागल्या असे नव्हे तर कुठ्ठाळीच्या जंगलातही वणवा पसरला. सगळीकडे अग्नितांडव सुरू आहे. त्यात सर्वाधिक हानी झाली ती सत्तरीतील म्हादई अभयारण्याची. साट्रेतील राखीव जंगलासह मोर्लेगडालादेखील आग लागली. वनखात्याच्या यंत्रणेची मर्यादा उघड झाली. शिवाय आपल्या राज्यात आपत्ती व्यवस्थापन म्हणून फार मोठे असे काही नाही हेही सिद्ध झाले. होळीदिवशी डोंगरच पेटले. निसर्ग, पर्यावरण, प्राणी, जैवविविधता याचा विचार करणाऱ्या संवेदनशील माणसांना खूप वाईट वाटले. 

म्हादई अभयारण्यातील जंगलाची व एकूणच सत्तरी तालुक्यातील घनदाट अरण्यांची झालेली हानी धक्कादायक आहे. स्थिती चिंताजनक आहे. सत्तरीतील डोंगर तीन दिवस जळत राहिल्यानंतर होळीदिवशी रात्री सरकारने धावपळ केली. मोर्लेगडाला आग लागली तेव्हा गोव्याच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला थोडी जाग आली. त्यामुळेच रात्रीच्यावेळी बैठक घेण्यात आली. आग विझविण्यासाठी अनेकांनी आपापल्यापरीने प्रयत्न केले, पण ते अपुरे ठरले. ही आग वाढत जाणार हे लोकांना, पर्यावरणप्रेमींना पहिल्याच दिवशी कळले होते. सरकारी यंत्रणेच्या ते थोडे उशिरा लक्षात आले. काल-परवा हेलिकॉप्टरचा वापर करावा लागला. तेव्हा खऱ्या अर्थाने आग आटोक्यात आली. तोपर्यंत बरेच नुकसान होऊन गेले. जंगल तयार होण्यासाठी पिढ्या जाव्या लागतात. ते नष्ट मात्र सहज व लवकर होते. गोवा सरकारने जंगलाची हानी काही प्रमाणात तरी भरून काढण्यासाठी तिथे फळझाडांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्याची मोहीम हाती घ्यायला हवी. अन्यथा रानात शिल्लक राहिलेली जनावरे गावांमध्ये येऊ लागतील. लोकांचा संघर्ष गवे, रानडुक्कर, बिबटे यांच्याशी एरवीही होतच असतो.

मुळात वनखात्याचे अधिकारी फिल्डवर असत नाहीत. जंगले सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ज्या वनरक्षकांवर व अधिकाऱ्यांवर आहे तेही गंभीरपणे काम करत नाहीत. सत्तरीच्याच जंगलात दीड-दोन वर्षांपूर्वी विष घालून पट्टेरी वाघांना मारले गेले होते. बारा-चौदा वर्षांपूर्वी केरीच्या भागात फास लावून एका वाघाची हत्या करण्यात आली होती. बंदुका घेऊन शिकारी जंगलांमध्ये फिरत असतात. शिवाय रानडुक्कर, ससे, मेरू यांच्या मांसाला चटावलेले काहीजण सगळीकडे तारांचे फास घालून ठेवतात. काहीजण गावठी बॉम्ब पेरून ठेवतात. रानडुकरे व इतर काही प्राण्यांची हत्या करून मांस भक्षण केले जाते. अशाच सापळ्यांत कधी बिबटे तर कधी पट्टेरी वाघ सापडतात. 

गोवा सरकार गोव्यातील म्हादईच्या पाण्याचे रक्षण करू शकत नाही, जंगलांचे रक्षण करू शकत नाही आणि वन्यप्राण्यांचेही हित जपू शकत नाही. जंगलांना लागलेल्या किंवा लावल्या गेलेल्या आगी या एका मोठ्या षडयंत्राचा भाग आहेत, असे म्हणण्यास वाव आहे. हे षडयंत्र कुणी रचलेय याचा शोध लावण्यासाठी सरकारने चौकशी आयोग नेमण्याची गरज आहे. यापूर्वी वाघ हत्या प्रकरणी अंतर्गत चौकशांचे प्रयोग निष्फळ ठरले. एखाद्या निवृत्त न्यायाधीशामार्फत किंवा निवृत्त आयएफएस अधिकाऱ्याच्या पथकामार्फत चौकशी करून घेतली तर बरे होईल. त्या आधारे सत्यस्थितीपर्यंत पोहोचता येईल. भविष्यात जंगले जळू नयेत म्हणून काय करता येईल यावरही विचार करून उपाययोजना करता येईल. तहान लागली की विहीर खोदण्याचे काम सरकार करते. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे काम हे असेच चालले आहे. पावसाळ्यात शहरांत पूर आला तरी ही यंत्रणा फार मोठा दिलासा देऊ शकत नाही. 

जंगलांना आग लागल्यानंतर चौथ्या दिवशी आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेतली जाते. वन खात्याचे काही कर्मचारी, सत्तरीतील काही युवक, काही पंचायती यांनी आग विझविण्यासाठी कष्ट घेतले. अनेकांची दमछाक झाली. मात्र जंगलांमधून चार दिवस धुराचे लोट सगळीकडे पसरले. वन्यप्राण्यांची, साप व अन्य सरपटणाऱ्या प्राण्यांची आगीने काय स्थिती केली असेल याची कल्पना यापुढे येईलच. अभयारण्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात आग लागण्याची घटना यापूर्वी कधीच घडली नव्हती. डोंगर सपाट करून तिथे आपले वेगळे हेतू भविष्यात साध्य करण्याचे काहीजणांचे कारस्थान तर नव्हे ना, या दृष्टिकोनातून सरकारने तपास करून घ्यावा.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा