शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

भोमवासीयांचा अपेक्षाभंग; राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाविरोधातील याचिका खंडपीठाने अखेर फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 14:53 IST

न्यायालयाच्या निवाड्याने त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भोम येथून जाणारा प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग पर्यायी मार्गाने न्यावा, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठाने फेटाळली आहे. हा मार्ग रद्द करण्यात यावा यासाठी भोमवासीयांनी मोठे आंदोलन केले. कायदेशीर लढाई हा त्या आंदोलनाचाच एक भाग होता. मात्र, न्यायालयाच्या निवाड्याने त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.

प्रस्तावित मार्गात अनेक घरे आणि सामाजिक सुविधा नष्ट होत असल्याचा दावा करणारी ही याचिका भोम ग्रामस्थांनी सादर केली होती. परंतु आता सरकारी प्रक्रिया फार पुढे गेली आहे, असे सांगत, तसेच राष्ट्रीय महामार्ग कायद्यानुसार हा प्रकल्प रद्द करता येत नसल्याचे कारण देऊन खंडपीठाने ही याचिका फेटाळली आहे.

खोर्ली आणि भोमा गावातील ५७रहिवाशांनी या राष्ट्रीय महामार्ग ४अ (एनएच-४अ) च्या रुंदीकरणासाठी भू-संपादन प्रक्रियेला आव्हान दिले होते. याचिका फेटाळताना न्यायालयाने सार्वजनिक हित आणि महामार्ग चार पदरी करण्याची गरज लक्षात घेऊन प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्याचा सरकारचा निर्णय रास्त ठरविला आहे. तसेच ज्या लोकांची जमीन या प्रकल्पासाठी संपादित केली जात आहे, त्यांना मोबदला दिल्याच्या सरकारच्या निवेदनाशी न्यायालयाने सहमती दर्शविली आहे.

भोमवासीयांचे काय?

याचिका फेटाळल्याने सरकारला भूसंपादन प्रक्रिया पुढे नेण्याचा आणि प्रकल्प पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट एनएच ४- ए महामार्ग चारपदरी करणे, वाहतूक कोंडी कमी करणे आणि रस्ता सुरक्षा सुधारणे आहे. मागणी फेटाळल्यामुळे भोमवासीयांची चिंता वाढली आहे. त्यामुळे त्यांचे आंदोलन आणखी तीव्र होते की लढ्याची धार कमी होणार हेही लवकरच दिसणार आहे.

निवाड्याचा अभ्यास करून पुढील निर्णय

न्यायालयाच्या निकालामुळे सहाजिकच लोक नाराज झाले असणार. परंतु आमच्या मानसिकतेत काहीच बदल होणार नाही. जो काही न्यायालयाचा निवाडा आहे, त्याचा संपूर्ण अभ्यास केला जाईल व त्यानंतरच पुढील कार्यवाही काय असेल यावर चर्चा विनिमय करण्यात येईल. हा लढा आता फक्त भोमवासीयांचा नसून समस्त गोव्यातील लोकांचा आहे. लोकांनी आम्हाला सहाय्य करावे, असे आंदोलनकर्ते संजय नाईक यांनी सांगितले.

निवाड्यातील महत्त्वाचे मुद्दे

न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की हा प्रकल्प सार्वजनिक हिताचा आहे. महामार्गाचे संरेखन अभियंते आणि क्षेत्रातील तज्ज्ञांनी डिझाइन करून निश्चित केले आहे ते मालमत्ता आणि संरचनांचे नुकसान कमी करण्याची आवश्यकता लक्षात घेऊनच. सरकारने प्रकल्प आधीच रद्द केल्याचा याचिकाकर्त्यांच्या दाव्याला पुरावा नाही. तसेच हा प्रकल्प राज्य सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हाती घेतला जात आहे. याचिकाकर्त्यांनी त्यांच्या मालमत्ता, मंदिरे आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबद्दल चिंता व्यक्त करून प्रकल्पावर आक्षेप नोंदवले होते. तथापि, न्यायालयाने असे नमूद केले की, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि रस्ता सुरक्षा सुधारण्यासाठी हा प्रकल्प आवश्यक आहे.

 

टॅग्स :goaगोवाHigh Courtउच्च न्यायालय