शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विद्वेशाच्या राजकारणाला पाडा; २००हून अधिक लेखकांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 17:44 IST

काश्मिरपासून केरळपर्यंतचे २०० हून अधिक लेखक एकत्र आले असून त्यांनी समताधिष्ठित, बहुविध भारतासाठी जनतेने उत्स्फूर्तपणे लोकसभा निवडणुकीचे माध्यम वापरावे असे प्रसारित निवेदनातून म्हटले आहे.

पणजी : समाजात दुही निर्माण करणा:या विद्वेषाच्या राजकारणास सत्ताभ्रष्ट करण्यासाठी भारतीय नागरिकांनी यावेळी मोठय़ा संख्येने मतदान करावे असे आवाहन देशभरातील लेखकांनी मतदारांना केले आहे.

काश्मिरपासून केरळपर्यंतचे २०० हून अधिक लेखक एकत्र आले असून त्यांनी समताधिष्ठित, बहुविध भारतासाठी जनतेने उत्स्फूर्तपणे लोकसभा निवडणुकीचे माध्यम वापरावे असे प्रसारित निवेदनातून म्हटले आहे.

भारतीय राज्यघटना सर्वाना समान हक्क देते, खानपानाचे, अभिव्यक्तीचे, मतभेदांना व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य देते; मात्र गेल्या काही वर्षात नागरिकांना ते विशिष्ट धर्माचे वा जातीचे असल्याच्या कारणास्तव अत्याचारांना सामोरे जावे लागत आहे अशी नोंद करून अशा प्रकारच्या हिंसेला प्रेरणा देणा:यांना सत्ताभ्रष्ट करण्याची गरज या लेखकांनी प्रसारीत केलेल्या निवेदनातून व्यक्त केली आहे. 

जनतेत भीतीचे वातावरण निर्माण करून देशाला दुभंगून टाकण्याचा हेतू या विद्वेषाच्या राजकारणामागे असून लेखक, कलाकार, चित्रकार, सिनेनिर्माते, संगीतकार अशा अनेकांची सातत्याने होणारी सतावणूक हा याच राजकारणाचा परिपाक असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. सत्ताधीशांना आव्हान देणा:यांना तकलादू कारणावरून अटक केली जात असून मतभेदांनाच उपटण्याचे कारस्थान शिजले असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. 

विवेकवादी विचारवंत, लेखक आणि कार्यकर्त्यांमागे अन्वेषण यंत्रणांचा ससेमिरा लावून त्यांना हतोत्साहित करण्याचा डाव हाणून पाडण्याची आवश्यकता व्यक्त करताना येत्या लोकसभा निवडणुकीत या शक्तींना नामोहरम करावे असे आवाहन या लेखकांनी केले आहे. महिला, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांच्या विरोधातल्या कारवाया हाणून पाडण्यासाठी संघटित मतदानाची गरजही निवेदनातून व्यक्त करण्यात आली असून तसे केले तरच देशाचे वैविध्य आणि लोकशाही अनाघ्रात राहील असा इशारा देण्यात आला आहे. 

देशात दुहीची बिजे पेरणा-यांना मतदानाद्वारे सत्तेपासून दूर ठेवता येईल असा आशावाद व्यक्त करतानाच राज्यघटनेला अपेक्षित असलेली समाजव्यवस्था राखायची असल्यास देशाच्या ऐक्याच्या निकषावर मतदान करण्याचे आवाहन या लेखकांनी केले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक