शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

खाण बंदीमुळे बहुजन समाज उद्ध्वस्त: वीरेश बोरकर यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2024 13:04 IST

पक्ष कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : निवडणुका जवळ येतात तेव्हा काँग्रेस, भाजप राज्यातील खाण व्यवसाय सुरु करण्याची आश्वासने देतात; परंतु ज्या खाण व्यवसायावर येथील बहुजन समाज अवलंबून होता तोच व्यवसाय बंद करून त्यांना उद्ध्वस्त केले, असा आरोप आरजीचे प्रमुख मनोज परब आणि सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी संयुक्तपणे केला. सोमवारी पक्ष कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

परब म्हणाले, भाजप सरकारने २०११ साली राष्ट्रपतींना निवेदन सादर करत तत्कालीन मुख्यमंत्री, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि नेत्यांनी जवळपास २५ हजार कोटींचा खाण घोटाळा केल्याचा आरोप केला होता; परंतु आजपर्यंत कोणत्याच प्रकारची कार्यवाही त्यांच्यावर झाली नाही. मात्र, भाजपने ज्यांच्यावर गंभीर आरोप केले आज तेच नेते या पक्षात आले. भाजप, काँग्रेसने बहुजन समाजाची वाट लावली आहे.

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी याआधीही सांगितले होते की, अशा घोटाळेबाजांना तुरुंगात पाठविले जाणार; परंतु असे कधीच घडले नाही. आज घोटाळेबाजांना या भाजप पक्षाने संरक्षण दिले; परंतु सामान्य गोवेकरांना पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकले आहे, असेही ते म्हणाले.

आमदार वीरेश बोरकर म्हणाले, खाण व्यवसाय बंद पडल्यामुळे अडचणीत सापडलेल्या गावांना भेट देताना अनेक गोष्टी दृष्टीस पडत आहेत. गंजलेल्या अवस्थेत पडलेल्या अनेक गाड्या, बेरोजगार माणसे, बंद पडलेली दुकाने जागोजागी दिसतात. अत्यंत दयनीय अवस्था या खाण प्रभावित क्षेत्रांची आहे. याला भाजप सरकार जबाबदार आहे.

 

टॅग्स :goaगोवाgoa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४