शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

गोव्यात बीएची पदवी आता संस्कृतमधून

By admin | Updated: May 11, 2016 17:05 IST

काळाच्या ओघात मागे पडलेल्या संस्कृत भाषेला पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी विविध पातळयांवर प्रयत्न सुरु आहेत.

ऑनलाइन लोकमत 

पणजी, दि. ११ - काळाच्या ओघात मागे पडलेल्या संस्कृत भाषेला पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी विविध पातळयांवर प्रयत्न सुरु आहेत. लवकरच तुम्हाला गोव्यामधून संस्कृत भाषेमधून बीएची पदवी घेता येणार आहे. गोव्याच्या कुंदायम मठाच्या श्री ब्रम्हानंद संस्कृत प्रबोधिनीला संस्कृतमधून बीएची पदवी देण्यासाठी गोव्याच्या उच्च शिक्षण महासंचालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे. 
 
गोव्यामध्ये प्रथमच पदवीसाठी संस्कृतचा अभ्यासक्रम सुरु होणार आहे. श्री ब्रम्हानंद संस्कृत प्रबोधिनीने दिलेला प्रस्ताव आता गोवा विद्यापीठ तपासणार आहे. गोवा विद्यापीठाचे संलग्नतेचे निकष पूर्ण केल्यास मान्यता मिळू शकते. गोवा विद्यापीठाची मान्यता मिळाली तर, २०१६-१७ शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रम सुरु होऊ शकतो. 
 
कुंदायम मठाच्या कॅम्पसमध्ये संस्कृतचे अभ्यासवर्ग चालवले जातील. कुठल्याही शाखेच्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याचा कुंदायम मठाने प्रस्ताव दिला आहे. सध्या गोव्यामध्ये फक्त शालेय स्तरावर संस्कृत शिकवले जाते. 
 
विशेष म्हणजे जर्मनीसारख्या देशामध्ये 14 विद्यापीठात जातेय संस्कृत भाषा... सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा.
 
महाराष्ट्रातही संस्कृत अकादमी स्थापणार
 
नागपूर : संस्कृत ही ज्ञानभाषा आहे. या भाषेत जगाला मार्ग दाखविण्याची क्षमता आणि शक्ती असल्याने महाराष्ट्रातही या भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी लवकरच संस्कृत अकादमी स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानेवारीमध्ये केली होती.
रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मारक भवनात आयोजित संस्कृत भारती विदर्भ प्रांत कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते जयराम व्यंकटेश पल्लेवार यांनी लिहिलेल्या ‘भारतरत्नमंजरी’ या संस्कृत काव्यपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू उमा वैद्य, संस्कृत भारतीचे अखिल भारतीय संघटनमंत्री दिनेश कामत, प्रचार व प्रसार प्रमुख श्री.श. देवपुजारी व अन्य मान्यवर उपस्थित होते. राज्यातील सर्व विभागांत संस्कृत भाषेचे बीएड महाविद्यालय सुरू करण्यात येईल. यासोबतच शालेय शिक्षणात संस्कृत भाषेचा समावेश कसा करता येईल, यासाठी शिक्षणमंत्र्यांसोबत चर्चा करून धोरण निश्चित करण्यात येईल. कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठाच्या विस्तारासाठी तसेच आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
इंग्रज राजवटीत संस्कृत भाषेच्या ज्ञानापासून वंचित ठेवण्याचे जाणीवपूर्वक शिक्षण पद्धतीत बदल करून संस्कृत भाषेला दूर ठेवण्यात आले, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, इंग्रज येण्यापूर्वी भारतात संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी १२,५०० विद्यालये तर ७४२ महाविद्यालये होती.