शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' शेतकऱ्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार ! कुटुंबीयांनी धानोरकरांवर केले गंभीर आरोप
2
समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
3
“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका
4
भारतासोबतच्या संघर्षादरम्यान मोठी घडामोड; अमेरिका पाकिस्तानला देणार अत्याधुनिक क्षेपणास्त्रे!
5
इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल; गाझाशी आहे कनेक्शन
6
IND vs WI 2nd Test: बुमराहला संघाबाहेर ठेवणार? Playing XI मध्ये 'हे' २ बदल होण्याची शक्यता
7
अरे हा माणूस आहे का 'क्रेडिट कार्ड'? तब्बल १६३८ कार्ड वापरुन कमावतो पैसे; एक रुपयाही कर्ज नाही
8
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
9
देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड?
10
Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
11
कंपनीला एक चूक महागात पडली; सॅलरीपेक्षा ३०० पट रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर पाठवली, मग जे घडलं...
12
Rajvir Jawanda: लोकप्रिय गायक राजवीर जवंदा यांच्या मृत्युमागचं कारण आलं समोर!
13
पतीवर उकळतं तेल फेकलं; तडफडताना पाहून मिरची पावडर जखमांवर ओतली! पत्नी इतकी क्रूर का झाली?
14
“धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अन्यथा गोठवा”; ठाकरे गटाच्या नेत्याची सुप्रीम कोर्टाला विनंती
15
मराठी अभिनेत्री २५ वर्षांनंतर मूळ गावी रमली, कुटुंबासोबतचे व्हिडिओ पोस्ट करत म्हणाली...
16
प्रचंड मानसिक त्रास; पूरन कुमार यांचा सुसाइड नोटमधून 8 IPS आणि 2 IAS अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
17
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
18
बंपर लिस्टिंग...! या शेअरनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी केली; दुप्पट केला पैसा, दिला छप्परफाड परतावा
19
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा 'या' ५ वस्तू, कुबेर महाराज म्हणतील तथास्तु!
20
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?

गोव्यात बीएची पदवी आता संस्कृतमधून

By admin | Updated: May 11, 2016 17:05 IST

काळाच्या ओघात मागे पडलेल्या संस्कृत भाषेला पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी विविध पातळयांवर प्रयत्न सुरु आहेत.

ऑनलाइन लोकमत 

पणजी, दि. ११ - काळाच्या ओघात मागे पडलेल्या संस्कृत भाषेला पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी विविध पातळयांवर प्रयत्न सुरु आहेत. लवकरच तुम्हाला गोव्यामधून संस्कृत भाषेमधून बीएची पदवी घेता येणार आहे. गोव्याच्या कुंदायम मठाच्या श्री ब्रम्हानंद संस्कृत प्रबोधिनीला संस्कृतमधून बीएची पदवी देण्यासाठी गोव्याच्या उच्च शिक्षण महासंचालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे. 
 
गोव्यामध्ये प्रथमच पदवीसाठी संस्कृतचा अभ्यासक्रम सुरु होणार आहे. श्री ब्रम्हानंद संस्कृत प्रबोधिनीने दिलेला प्रस्ताव आता गोवा विद्यापीठ तपासणार आहे. गोवा विद्यापीठाचे संलग्नतेचे निकष पूर्ण केल्यास मान्यता मिळू शकते. गोवा विद्यापीठाची मान्यता मिळाली तर, २०१६-१७ शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रम सुरु होऊ शकतो. 
 
कुंदायम मठाच्या कॅम्पसमध्ये संस्कृतचे अभ्यासवर्ग चालवले जातील. कुठल्याही शाखेच्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याचा कुंदायम मठाने प्रस्ताव दिला आहे. सध्या गोव्यामध्ये फक्त शालेय स्तरावर संस्कृत शिकवले जाते. 
 
विशेष म्हणजे जर्मनीसारख्या देशामध्ये 14 विद्यापीठात जातेय संस्कृत भाषा... सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा.
 
महाराष्ट्रातही संस्कृत अकादमी स्थापणार
 
नागपूर : संस्कृत ही ज्ञानभाषा आहे. या भाषेत जगाला मार्ग दाखविण्याची क्षमता आणि शक्ती असल्याने महाराष्ट्रातही या भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी लवकरच संस्कृत अकादमी स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानेवारीमध्ये केली होती.
रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मारक भवनात आयोजित संस्कृत भारती विदर्भ प्रांत कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते जयराम व्यंकटेश पल्लेवार यांनी लिहिलेल्या ‘भारतरत्नमंजरी’ या संस्कृत काव्यपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू उमा वैद्य, संस्कृत भारतीचे अखिल भारतीय संघटनमंत्री दिनेश कामत, प्रचार व प्रसार प्रमुख श्री.श. देवपुजारी व अन्य मान्यवर उपस्थित होते. राज्यातील सर्व विभागांत संस्कृत भाषेचे बीएड महाविद्यालय सुरू करण्यात येईल. यासोबतच शालेय शिक्षणात संस्कृत भाषेचा समावेश कसा करता येईल, यासाठी शिक्षणमंत्र्यांसोबत चर्चा करून धोरण निश्चित करण्यात येईल. कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठाच्या विस्तारासाठी तसेच आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
इंग्रज राजवटीत संस्कृत भाषेच्या ज्ञानापासून वंचित ठेवण्याचे जाणीवपूर्वक शिक्षण पद्धतीत बदल करून संस्कृत भाषेला दूर ठेवण्यात आले, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, इंग्रज येण्यापूर्वी भारतात संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी १२,५०० विद्यालये तर ७४२ महाविद्यालये होती.