शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

'आरजी'कडून कोळसा विरोधात जागृती मोहीम: आमदार वीरेश बोरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 07:44 IST

रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पाच्या नावाखाली कोळसा, स्टील यांची वाहतूक होणार असल्याचा आरोप त्यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : रेल्वे दुपदरीकरण व कोळसा वाहतूकप्रश्नी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री व भाजप आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी रेव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) पक्षाचे आमदार पत्रकार परिषदेत केली.

वीरेश बोरकर यांनी कोळसा वाहतुकीला आम्ही पाठिंबा देत नाही, असे विधान भाजप सरकारने केले होते. मात्र, सध्याच्या स्थितीत सरकारच कोळसा वाहतुकीला चालना देत असल्याचे चित्र आहे. रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पाच्या नावाखाली कोळसा, स्टील यांची वाहतूक होणार असल्याचा आरोप त्यांनी केला.

बोरकर म्हणाले की, रेल्वे दुपदरीकरण प्रकल्प हा भगवान महावीर अभयारण्य तसेच दाट रान वाटातून जाणार आहे. यामुळे निसर्गाची मोठी हानी होणार आहे. कोळसा वाहतूक नको, असे विधान दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही केले होते. मात्र, आता त्यांनी तसे विधान केलेच नव्हते, असे 'भाजप'चे आमदार सांगत आहेत. चांदोर येथे या प्रकल्पाविरोधात झालेल्या आंदोलनात काँग्रेस पक्षात असताना आमदार दिगंबर कामत, संकल्प आमोणकर व आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी भाग घेतला होता. मात्र, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी मौन बाळगल्याची टीकाही त्यांनी केली.

गोव्यासारख्या पर्यटक राज्यात रेल्वे दुपदरीकरण व कोळसा वाहतूक प्रकल्प नको. एका बाजूने मुख्यमंत्री 'भिवपाची गरज ना' असे विधान करतात. तर दुसरीकडे मात्र कोळसा प्रश्न जनतेवर खऱ्या अर्थाने 'भिवपाची' वेळ आली आहे. रेल्वे दुपदरीकरण व कोळसा वाहतूकप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे बोरकर म्हणाले. 

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण