शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

'आरजी'कडून कोळसा विरोधात जागृती मोहीम: आमदार वीरेश बोरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 07:44 IST

रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पाच्या नावाखाली कोळसा, स्टील यांची वाहतूक होणार असल्याचा आरोप त्यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : रेल्वे दुपदरीकरण व कोळसा वाहतूकप्रश्नी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री व भाजप आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी रेव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) पक्षाचे आमदार पत्रकार परिषदेत केली.

वीरेश बोरकर यांनी कोळसा वाहतुकीला आम्ही पाठिंबा देत नाही, असे विधान भाजप सरकारने केले होते. मात्र, सध्याच्या स्थितीत सरकारच कोळसा वाहतुकीला चालना देत असल्याचे चित्र आहे. रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पाच्या नावाखाली कोळसा, स्टील यांची वाहतूक होणार असल्याचा आरोप त्यांनी केला.

बोरकर म्हणाले की, रेल्वे दुपदरीकरण प्रकल्प हा भगवान महावीर अभयारण्य तसेच दाट रान वाटातून जाणार आहे. यामुळे निसर्गाची मोठी हानी होणार आहे. कोळसा वाहतूक नको, असे विधान दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही केले होते. मात्र, आता त्यांनी तसे विधान केलेच नव्हते, असे 'भाजप'चे आमदार सांगत आहेत. चांदोर येथे या प्रकल्पाविरोधात झालेल्या आंदोलनात काँग्रेस पक्षात असताना आमदार दिगंबर कामत, संकल्प आमोणकर व आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी भाग घेतला होता. मात्र, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी मौन बाळगल्याची टीकाही त्यांनी केली.

गोव्यासारख्या पर्यटक राज्यात रेल्वे दुपदरीकरण व कोळसा वाहतूक प्रकल्प नको. एका बाजूने मुख्यमंत्री 'भिवपाची गरज ना' असे विधान करतात. तर दुसरीकडे मात्र कोळसा प्रश्न जनतेवर खऱ्या अर्थाने 'भिवपाची' वेळ आली आहे. रेल्वे दुपदरीकरण व कोळसा वाहतूकप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे बोरकर म्हणाले. 

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण