शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

संवेदनशील क्षेत्र नकोच; वाळपई येथील बैठकीत सत्तरीवासीय आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 09:36 IST

संवेदनाशील समितीच्यावतीने क्षेत्र अभ्यास वाळपई नगरपालिकेच्या सभागृहामध्ये सभा झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क वाळपई: सत्तरी तालुक्यात पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र जाहीर झाल्यास विकासावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहेत. अभयारण्याची अधिसूचना जाहीर होऊन २४ वर्षे उलटली आहेत. ती रद्द करण्याची वारंवार मागणी केली जाते. मात्र ती अद्याप रद्द झालेली नाही. अभयारण्य क्षेत्र झाल्यास जनतेच्या उदरनिर्वाहावर विपरीत परिणाम होईल. त्यामुळे याला कोणत्याही परिस्थितीत मंजुरी देऊ नये अशी जोरदार मागणी लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी केली. संवेदनाशील समितीच्यावतीने क्षेत्र अभ्यास वाळपई नगरपालिकेच्या सभागृहामध्ये सभा झाली.

यावेळी उपस्थितांनी अभयारण्य क्षेत्र झाल्यास होणारे परिणाम मांडत जनतेला आज अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यात दुप्पट वाढ होईल अशी भीती व्यक्त केली. सत्तरी पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र मान्य झाल्यास त्याचे गंभीर परिणाम जनतेच्या उदरनिर्वाहावर होणार आहेत असे सांगण्यात आले. यावेळी प्रत्येकाने या प्रस्तावाला जोरदार विरोध केला. विकासावर कोणत्या प्रकारे दुष्परिणाम होऊ शकतात याची माहिती दिली. आमदार डॉ. दिव्या राणे, समितीचे अध्यक्ष डॉ. सुजय कुमार, डॉ. एस. सी गारगोटी, डॉ. हितेंद्र पडियाला, डॉ. रितेश जोशी, डब्लू, भारतसिंग, आर. पी. सिंग, पी. के. गाजभैया, डॉ. एस. केरकट्टी, डॉ. सुकुमार सिंग यांची उपस्थिती होती. 

समितीचे अध्यक्ष डॉ. सुजय कुमार यांनी सांगितले की भावी पिढीसाठी पर्यावरणाची जतन होणे तेवढेच महत्त्वाचे आहे. अन्यथा भावी पिढीला अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर विकाससुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. पर्यावरणाचे रक्षण व विकासाची गती तीव्रतेने पुढे गेली पाहिजे. सत्तरी तालुक्यातील जनतेने संवेदनशील क्षेत्राला केलेल्या विरोधाची निश्चितच दखल घेण्यात येईल.

आमदार दिव्या राणे यांनी सांगितले की, सत्तरी तालुका पूर्णपणे जंगलाने वेढलेला आहे. शेकडो वर्षापासून तालुक्यातील जनता या जंगलांमधील अनेक घटकांच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करते. यावर आघात झाल्यास उदरनिर्वाहावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. निसर्गाचे रक्षण जरूर करण्यात येईल. मात्र विकासावर त्याचे आघात होणार नाहीत याची दक्षता घ्या' असे सांगत त्यांनी संवेदनशील क्षेत्र म्हणून मंजुरी देण्यात येऊ नये याचा पुनरुच्चार केला.

सुरुवातीला उदय सावंत यांनी नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर व विकासावर काय परिणाम होऊ शकतात याची माहिती दिली. भूमीपूत्र संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र गावस यांनी तालुक्यातील जनता कशा प्रकारे हाल सहन करत आहे ते सांगितले. अभयारण्याची अधिसूचना मंजूर झाल्यास तालुक्यातील जनता पेटून उठणार असा इशारा दिला.

सरपंच उदयसिंग राणे यांनी, विकासाच्या आड येणाऱ्या प्रत्येक गोष्टी या सहन केल्या जाणार नाहीत असा इशारा दिला. बी. डी. मोटे यांनी तालुक्याच्या सद्यस्थितीविषयी माहिती दिली. उदय सावंत यांनी सूत्रसंचालन केले.

 

टॅग्स :goaगोवा