शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

संवेदनशील क्षेत्र नकोच; वाळपई येथील बैठकीत सत्तरीवासीय आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 09:36 IST

संवेदनाशील समितीच्यावतीने क्षेत्र अभ्यास वाळपई नगरपालिकेच्या सभागृहामध्ये सभा झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क वाळपई: सत्तरी तालुक्यात पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र जाहीर झाल्यास विकासावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहेत. अभयारण्याची अधिसूचना जाहीर होऊन २४ वर्षे उलटली आहेत. ती रद्द करण्याची वारंवार मागणी केली जाते. मात्र ती अद्याप रद्द झालेली नाही. अभयारण्य क्षेत्र झाल्यास जनतेच्या उदरनिर्वाहावर विपरीत परिणाम होईल. त्यामुळे याला कोणत्याही परिस्थितीत मंजुरी देऊ नये अशी जोरदार मागणी लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी केली. संवेदनाशील समितीच्यावतीने क्षेत्र अभ्यास वाळपई नगरपालिकेच्या सभागृहामध्ये सभा झाली.

यावेळी उपस्थितांनी अभयारण्य क्षेत्र झाल्यास होणारे परिणाम मांडत जनतेला आज अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यात दुप्पट वाढ होईल अशी भीती व्यक्त केली. सत्तरी पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र मान्य झाल्यास त्याचे गंभीर परिणाम जनतेच्या उदरनिर्वाहावर होणार आहेत असे सांगण्यात आले. यावेळी प्रत्येकाने या प्रस्तावाला जोरदार विरोध केला. विकासावर कोणत्या प्रकारे दुष्परिणाम होऊ शकतात याची माहिती दिली. आमदार डॉ. दिव्या राणे, समितीचे अध्यक्ष डॉ. सुजय कुमार, डॉ. एस. सी गारगोटी, डॉ. हितेंद्र पडियाला, डॉ. रितेश जोशी, डब्लू, भारतसिंग, आर. पी. सिंग, पी. के. गाजभैया, डॉ. एस. केरकट्टी, डॉ. सुकुमार सिंग यांची उपस्थिती होती. 

समितीचे अध्यक्ष डॉ. सुजय कुमार यांनी सांगितले की भावी पिढीसाठी पर्यावरणाची जतन होणे तेवढेच महत्त्वाचे आहे. अन्यथा भावी पिढीला अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर विकाससुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. पर्यावरणाचे रक्षण व विकासाची गती तीव्रतेने पुढे गेली पाहिजे. सत्तरी तालुक्यातील जनतेने संवेदनशील क्षेत्राला केलेल्या विरोधाची निश्चितच दखल घेण्यात येईल.

आमदार दिव्या राणे यांनी सांगितले की, सत्तरी तालुका पूर्णपणे जंगलाने वेढलेला आहे. शेकडो वर्षापासून तालुक्यातील जनता या जंगलांमधील अनेक घटकांच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करते. यावर आघात झाल्यास उदरनिर्वाहावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. निसर्गाचे रक्षण जरूर करण्यात येईल. मात्र विकासावर त्याचे आघात होणार नाहीत याची दक्षता घ्या' असे सांगत त्यांनी संवेदनशील क्षेत्र म्हणून मंजुरी देण्यात येऊ नये याचा पुनरुच्चार केला.

सुरुवातीला उदय सावंत यांनी नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर व विकासावर काय परिणाम होऊ शकतात याची माहिती दिली. भूमीपूत्र संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र गावस यांनी तालुक्यातील जनता कशा प्रकारे हाल सहन करत आहे ते सांगितले. अभयारण्याची अधिसूचना मंजूर झाल्यास तालुक्यातील जनता पेटून उठणार असा इशारा दिला.

सरपंच उदयसिंग राणे यांनी, विकासाच्या आड येणाऱ्या प्रत्येक गोष्टी या सहन केल्या जाणार नाहीत असा इशारा दिला. बी. डी. मोटे यांनी तालुक्याच्या सद्यस्थितीविषयी माहिती दिली. उदय सावंत यांनी सूत्रसंचालन केले.

 

टॅग्स :goaगोवा