शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
2
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
3
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
4
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
5
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
6
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
7
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
8
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
9
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
10
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
11
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
12
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
13
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
15
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
16
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
17
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
18
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
19
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
20
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस

'अटल आसरा'चे पैसे वाहने घेण्यासाठी नव्हेत: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 08:35 IST

योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर कारवाई करू : १५ जूनपर्यंत सर्व अर्ज निकालात काढाणार

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: अटल आसरा योजनेचे सर्व अर्ज १५ जूनपर्यंत निकालात काढण्यात येणार असून लाभार्थ्यांच्या खात्यावर लवकरच रक्कम जमा करण्यात येईल. तसेच गरजूंना घरे उभारण्यासाठी दीड लाख रुपये देण्याची योजना आहे. मात्र सरकारी योजनेचाचा गैरफायदा घेतल्यास संबंधितांवर कारवाई करण्यास सरकार मागे पुढे पाहणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.

अटल आसरा अंतर्गत घरेच बांधा. घर बांधण्याचे पुरावे सादर करणे गरजेचे असून योजनेच्या पैशातून मुलांना, नातवांना गाड्या घेतल्यास ती वाहने जप्त करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी साखळीत स्पष्ट केले. समाज कल्याण खात्यातर्फे अटल आसरा योजनेअंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन शनिवारी रवींद्र भवन, साखळी येथे करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या अंतर्गत ज्यांचे अर्ज प्रलंबित आहेत, त्या सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी बोलवून त्यांचे अर्ज मंजूर करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी अनेक अर्जाना मंजुरी देण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

सरकार अनेक योजना आखत आहे. आता त्या योजनांचा गैरफायदा काही लोक घेत असल्याचे निदर्शनास आले असून असे यापुढे चालणार नाही. ज्यांना निवारा गरजेचा आहे, तीन लाख कमी उत्पन्न आहे, अशा लोकांना अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने सरकारने अटल आसरा योजनेअंतर्गत दीड लाख रुपये देण्याची योजना आहे. त्याचा योग्य तो फायदा घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

'सर्व अर्ज निकाली काढू'

समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनुसार, राज्यात विविध ठिकाणी अटल आसरा शिबिरांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. सरकार तुमच्या दारी योजने अंतर्गत तातडीने सर्व दाखले उपलब्ध व्हावेत व कोणाचेही अर्ज प्रलंबित राहू नयेत, त्रुटी असतील त्या दूर कराव्यात हा या शिबिराचा उद्देश असून राज्यातील सर्व अर्ज निकालात काढण्यात येतील, असेही मंत्री फळदेसाई यांनी सांगितले.

राज्यभर शिबिरे

या योजनेंतर्गत अर्ज मंजूर करण्यात ज्या त्रुटी होत्या त्या आहेत, त्या दूर करण्यासाठी राज्यभरात अटल आसरा शिबिर होणार आहे. सर्व कागदपत्रांची छाननी व अर्जाला मान्यता दिली जाईल.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत