भू-संपादन पूर्ण होऊन जी जागा कला व संस्कृती खात्याच्या ताब्यात आली होती, त्या जागेवर कला भवन बांधायचेच नाही, असे सरकारने ठरविणे हे कुठल्या राजकारण्यांच्या व कुठल्या बिल्डरांच्या फायद्याचे आहे, हे म्हापशातील लोकांना ठाऊक आहे. सरकार नवी जागा शोधून ती जागा कला भवनसाठी निश्चित करेपर्यंत म्हापसावासियांना आणखी किती वर्षे थांबावे लागेल ते सांगता येत नाही. ताब्यात असलेल्या जागेत लघु कला भवन बांधा, अशी मागणी म्हापशातील लोक सातत्याने करत होते. ती जागा आता बिल्डरांच्याच ताब्यात जाईल; कारण यापूर्वी २००९ साली विक्री करारही झाला आहे. त्याचमुळे सरकारने आता त्या जागेवर पाणी सोडले आहे.- विजय भिके, काँग्रेसचे प्रवक्ते.............................................म्हापशात कला भवन बांधण्यासाठी साडेआठ हजार चौरस मीटर जागा कला व संस्कृती खात्याने सगळे सोपस्कार पार पाडून ताब्यात घेतली होती. ती जागा आपोआप रद्दबातल ठरू शकत नाही. सरकार आता त्या जागेबाबत काय करणार आहे, याची मला कल्पना नाही. तिथे कला भवन बांधावे म्हणून आम्ही चळवळ केली होती.- नारायण कारेकर, समाज-कार्यकर्ते
कला भवन जोड वृत्त
By admin | Updated: May 7, 2014 00:49 IST