शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

म्हादई जल प्राधिकरणास मंजुरी; केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय, गोव्याची एक मागणी अखेर पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 15:26 IST

कर्नाटकला म्हादईचे पाणी बेकायदेशीररित्या वळविण्याच्या बाबतीत रोखण्यास यामुळे मदत होईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: केंद्रीय मंत्रिमंडळाने 'प्रवाह' या नावाने म्हादई जल प्राधिकरण स्थापन करण्यास काल मंजुरी दिली. गोव्याने केलेल्या मागणीनुसार हे प्राधिकरण स्थापन होणार असून ही बाब राज्यासाठी दिलासादायक आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबद्दल लगेच ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे याबद्दल आभार मानले आहेत.

म्हादई जल व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करावे, यासाठी गेले सहा महिने राज्य सरकारचा केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार सुरू होता. कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्राचे प्रत्येकी दोन सदस्य या प्राधिकरणावर घ्यावेत व केंद्राने आपले तीन सदस्य नेमावेत, अशी मागणी आहे. या प्राधिकरणासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली भेटीवर गेलेल्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे पाठपुरावाही केला होता. 

केंद्राने कर्नाटकचा डीपीआर मंजूर केला असला तरी बऱ्याच अटी घातलेल्या आहेत. याबाबतीत राज्य सरकार कोणतीही तडजोड करणार नाही, असा पुनरुच्चार राज्य सरकारने केला आहे. दरम्यान, कर्नाटकने बेकायदेशीररित्या पाणी वळविले आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याने राज्य वन्यप्राणी मंडळातर्फे कर्नाटकला नोटीस पाठवली होती त्यावर कर्नाटकने उत्तरही दिले आहे तींत वन्यप्राणी संवर्धन कायद्याच्या कलम २९ खालील निर्बंध कळसा- भांडुराच्या कामाला लागू होत नाहीत, असा दावा कर्नाटकने केला आहे. आता जल प्राधिकरण स्थापन झाल्याने कर्नाटकच्या अरेरावीला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पाणी वळवण्यापासून रोखण्यास मदत

मुख्यमंत्री म्हणाले की, म्हादई प्रश्नी जल प्राधिकरण स्थापन करणे ही आमची प्रमुख मागणी होती. कर्नाटकला म्हादईचे पाणी बेकायदेशीररित्या वळविण्याच्या बाबतीत रोखण्यास यामुळे मदत होईल. म्हादईच्या बाबतीत केंद्र सरकार गोव्यावर कोणताही अन्याय करणार नाही, हेही यातून अधोरेखित झालेले आहे.

सरकारकडून पाठपुरावा

संपूर्ण उत्तर गोवा आणि म्हादई अभयारण्य, भगवान महावीर अभयारण्य, बोंडला अभयारण्य, मोले राष्ट्रीय उद्यान व सलीम अली पक्षी अभयारण्य अशी पाच अभयारण्ये म्हादईवर अवलंबून आहेत. त्यामुळे कर्नाटकला पाणी वळवू न देण्याबाबत राज्य सरकार ठाम आहे. कळसा- भांडुरा प्रकल्पाच्या डीपीआरला दिलेली मंजुरी मागे घ्यावी यासाठीही पाठपुरावा चालू आहे.

कार्यालयही गोव्यातच?

दरम्यान, म्हादई जल व्यवस्थापन प्राधिकरणाचे कार्यालय गोव्यातच व्हावे, अशीही राज्य सरकारची मागणी होती. गोव्यात कार्यालय उघडून ही मागणीही केंद्र सरकार पूर्ण करील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. गोव्यात कार्यालय झाल्यास अन्य दिल्ली किंवा अन्य ठिकाणी जावे लागणार नाही आणि गोवा सरकारला ते सुलभ ठरेल.

केंद्रीय जलशक्तीमंत्री शेखावत म्हणाले...

केंद्रीय जलशक्त्तीमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी म्हटले आहे की, 'आता प्राधिकरण स्थापन झालेले असल्याने म्हादई पाणी तंटा लवादाने जो निवाडा दिला आहे. त्याची योग्य रीतीने व प्रभावीपणे अंमलबजावणी होईल. गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यात आपापसात विश्वासाचे संबंध निर्माण करण्याबाबतही प्राधिकरणामुळे मदत होईल.'

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा