शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाड्यातील ८५५० पैकी १५१६ गावांतच सापडल्या ‘कुणबी’च्या नोंदी
2
स्वस्ताईचा गुड ॲण्ड सिम्पल टॅक्स! जीएसटीचे ५% आणि १८% असे दोनच दर; विमा पॉलिसींना करसूट, सिमेंटवर १८% जीएसटी
3
Video: पैज लागली, 500 रुपयांसाठी तरुणाची यमुनेच्या पुरात उडी; नंतर बघा काय घडलं?
4
Hyundai ने लॉन्च केले Creta Electric चे नवीन व्हेरिएंट; 510 KM रेंज अन् किंमत फक्त इतकी...
5
घर खरेदीदारांसाठी मोठी भेट! 'या' वस्तूवरील जीएसटीमध्ये मोठी कपात; घर बांधणेही होणार स्वस्त
6
Yamuna Flood: यमुनेचा रौद्रवतार, दिल्लीच्या नाकातोंडात पाणी! घरं पाण्याखाली, रस्तेही बंद; थरकाप उडवणारी दृश्ये
7
३० वर्षांनी गुरु-शनि त्रिदशांश योग: ८ राशींना फायदा, पैसाच पैसा, लाभच लाभ; शुभ-कल्याण घडेल!
8
८ वर्षांत तिप्पट...GST मधून सरकारची बंपर कमाई; नवीन सुधारणांमुळे मोठा फटका बसणार?
9
"तुझ्या चरणी येऊ न शकलेल्या...", भूषण प्रधानने 'लालबागचा राजा'कडे काय मागितलं? होतंय कौतुक
10
चातुर्मासातील पहिला शुक्र प्रदोष: सुख-सुबत्ता-वैभव, ‘असे’ करा व्रत; मंत्र जपाने शिव प्रसन्न!
11
अटीतटीचा सामना, मैदानात वातावरण तापलं, हाणामारीपर्यंत गेलं, मग भज्जीने असं केलं होतं शोएब अख्तरचं गर्वहरण
12
‘खर्रा मिळणार असेल तरच शाळेत येईन’; म्हणणारा योगेश झाला फासेपारधी समाजातील पहिला सेट उत्तीर्ण विद्यार्थी
13
कामगारांच्या कामाचे ९ चे झाले १२ तास, पण ओव्हरटाइमचा मिळणार जादा मोबदला; रजेचेही निकष बदलले
14
अमिताभ बच्चन आणि क्रिती सनॉन यांच्यानंतर कार्तिक आर्यननंही अलिबागमध्ये खरेदी केली जमीन; किती कोटींना झाली डील?
15
२२ षटकारांची आतषबाजी, ठोकल्या ३६७ धावा; धडाकेबाज खेळीमुळे टी२० संघात मिळालं स्थान
16
श्रेयस, यशस्वी अन् शार्दुल... टीम इंडियाच्या स्टार त्रिकुटाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष
17
"मुंबईत कधी आपलेपणा वाटला नाही...", असं का म्हणाले मनोज वाजपेयी? शहर सोडायचा आला विचार
18
GST Rate Cut: पहिले महिन्याला भरत होता ₹१७,७०० चा हेल्थ इन्शुरन्स प्रीमिअम, आता किती वाचतील; ३६ हजारांच्या टीव्हीवर किती बचत?
19
सर्वसामान्यांना दिलासा देणारे GST चे नवीन दर कधी लागू होणार? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिले उत्तर
20
GST दरातील कपातीनंतर शेअर बाजार सुस्साट; Sensex ५४७ अंकांनी वधारला, या शेअर्समध्ये जोरदार तेजी

गोव्यात पूर्णवेळ राज्यपाल नेमा; घटक राज्यदिनी कॉंग्रेसचे राष्ट्रपतींना पत्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 15:39 IST

आज घटनात्मक अधिकार असलेले राज्यपाल पूर्णवेळ गोव्यात उपलब्ध नसल्याने, राज्यात अनागोंदी कारभार सुरू आहे.

पणजी  : गोवा राज्य ३५ वा घटक राज्यदिन साजरा करीत असतानाच गोव्याला पूर्णवेळ राज्यपाल नाही याकडे प्रदेश कॉंग्रेसने लक्ष वेधले असून गोमंतकीयांचे हित जपणाऱ्या पूर्णवेळ राज्यपालांची नेमणूक करावी व गोमंतकीयांना न्याय द्यावा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत व प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून केली आहे.

पत्रात असे म्हटले आहे की, भाजप सरकारच्या बेजबाबदार व असंवेदनशील कारभारामुळे गोमंतकीय गुदमरत आहेत. गोमंतकीयांच्या समस्यांची दखल घेण्यासाठी मागील नऊ महिने गोव्याला पूर्णवेळ राज्यपाल नाहीत. गोव्यातील एकंदर परिस्थितीची त्यांना कल्पना राष्ट्रपतींना देण्यात आली आहे. पत्रात नमूद केल्याप्रमाणे कोविड महामारीत गोवेकर संकटात आहेत. त्यातच तौक्ते चक्रीवादळाने  संकटात भर टाकली आहे. राज्यात कोविडने आज पर्यंत  २५९७ लोकांना मृत्यू झाले. गोव्यात भाजप सरकारने लोकांचा घटनात्मक जगण्याचा अधिकार हिरावून घेतल्याने गोवा राज्याची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी झाल्याचे नमूद करून गोमेकॉत प्राणवायुच्या कमतरतेमुळे सुमारे ७५ बळी गेल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. 

तौक्ते चक्रीवादळात सुमारे १४६ कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे. गोव्याला चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर पंतप्रधानांनी गोव्याची हवाई पाहणी करण्याचे टाळले तसेच गोव्यासाठी कसलीच मदत जाहीर केली नाही याचा पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. गोव्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळल्याचे नमूद करुन, बंद असलेला खाण व्यवसाय, ठप्प झालेला पर्यटन व्यवसाय व आता कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लावलेला कर्फ्यू  यामुळे लोक हवालदील झाल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यमान आमदार व मुख्यमंत्र्यांना निवेदने सादर करुनही सरकारकडून कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही हे राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. 

आज घटनात्मक अधिकार असलेले राज्यपाल पूर्णवेळ गोव्यात उपलब्ध नसल्याने, राज्यात अनागोंदी कारभार सुरू आहे. मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री तसेच इतर मंत्रीगण एकामेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. राज्य मंत्रीमंडळातील सर्व मंत्री परस्पर विरोधी विधाने करीत असल्याने लोकांमध्ये अविश्वास बळावला आहे असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. विद्यमान भाजप सरकार बरखास्त करावे अशी मागणी करणारे निवेदन राज्यपालांनाही दिल्याचेही राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची स्तुती सदर पत्रात करण्यात आली असून, त्यांनी गोमंतकीयांचे हित जपण्यासाठी वेळोवेळी पावले उचलली होती हे राष्ट्रपतींच्या लक्षात आणून देण्यात आले आहे. म्हादई प्रश्न, जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा यावर माजी राज्यपालांनी घेतलेल्या भुमिकेचे कॉंग्रेस पक्षाने कौतुक करुन त्यांचे आभार मानले आहेत. 

गोव्यात आज सरकारी कारभार  पूर्णपणे कोलमडला असून सगळीकडे सावळा गोंधळ चालू आहे. अशा कठिण काळात गोव्यात पूर्णवेळ राज्यपाल नेमणे गरजेचे असल्याचे  पक्षाने म्हटले आहे. गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाला असल्याने पूर्णवेळ राज्यपाल नेमणे हा गोवेकरांचा अधिकार असल्याचे कॉंग्रेस पक्षाने राष्ट्रपतींच्या नजरेसमोर मांडले आहे.

टॅग्स :congressकाँग्रेस