शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

गोव्यात पूर्णवेळ राज्यपाल नेमा; घटक राज्यदिनी कॉंग्रेसचे राष्ट्रपतींना पत्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 15:39 IST

आज घटनात्मक अधिकार असलेले राज्यपाल पूर्णवेळ गोव्यात उपलब्ध नसल्याने, राज्यात अनागोंदी कारभार सुरू आहे.

पणजी  : गोवा राज्य ३५ वा घटक राज्यदिन साजरा करीत असतानाच गोव्याला पूर्णवेळ राज्यपाल नाही याकडे प्रदेश कॉंग्रेसने लक्ष वेधले असून गोमंतकीयांचे हित जपणाऱ्या पूर्णवेळ राज्यपालांची नेमणूक करावी व गोमंतकीयांना न्याय द्यावा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत व प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून केली आहे.

पत्रात असे म्हटले आहे की, भाजप सरकारच्या बेजबाबदार व असंवेदनशील कारभारामुळे गोमंतकीय गुदमरत आहेत. गोमंतकीयांच्या समस्यांची दखल घेण्यासाठी मागील नऊ महिने गोव्याला पूर्णवेळ राज्यपाल नाहीत. गोव्यातील एकंदर परिस्थितीची त्यांना कल्पना राष्ट्रपतींना देण्यात आली आहे. पत्रात नमूद केल्याप्रमाणे कोविड महामारीत गोवेकर संकटात आहेत. त्यातच तौक्ते चक्रीवादळाने  संकटात भर टाकली आहे. राज्यात कोविडने आज पर्यंत  २५९७ लोकांना मृत्यू झाले. गोव्यात भाजप सरकारने लोकांचा घटनात्मक जगण्याचा अधिकार हिरावून घेतल्याने गोवा राज्याची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी झाल्याचे नमूद करून गोमेकॉत प्राणवायुच्या कमतरतेमुळे सुमारे ७५ बळी गेल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. 

तौक्ते चक्रीवादळात सुमारे १४६ कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे. गोव्याला चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर पंतप्रधानांनी गोव्याची हवाई पाहणी करण्याचे टाळले तसेच गोव्यासाठी कसलीच मदत जाहीर केली नाही याचा पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. गोव्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळल्याचे नमूद करुन, बंद असलेला खाण व्यवसाय, ठप्प झालेला पर्यटन व्यवसाय व आता कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लावलेला कर्फ्यू  यामुळे लोक हवालदील झाल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यमान आमदार व मुख्यमंत्र्यांना निवेदने सादर करुनही सरकारकडून कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही हे राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. 

आज घटनात्मक अधिकार असलेले राज्यपाल पूर्णवेळ गोव्यात उपलब्ध नसल्याने, राज्यात अनागोंदी कारभार सुरू आहे. मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री तसेच इतर मंत्रीगण एकामेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. राज्य मंत्रीमंडळातील सर्व मंत्री परस्पर विरोधी विधाने करीत असल्याने लोकांमध्ये अविश्वास बळावला आहे असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. विद्यमान भाजप सरकार बरखास्त करावे अशी मागणी करणारे निवेदन राज्यपालांनाही दिल्याचेही राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची स्तुती सदर पत्रात करण्यात आली असून, त्यांनी गोमंतकीयांचे हित जपण्यासाठी वेळोवेळी पावले उचलली होती हे राष्ट्रपतींच्या लक्षात आणून देण्यात आले आहे. म्हादई प्रश्न, जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा यावर माजी राज्यपालांनी घेतलेल्या भुमिकेचे कॉंग्रेस पक्षाने कौतुक करुन त्यांचे आभार मानले आहेत. 

गोव्यात आज सरकारी कारभार  पूर्णपणे कोलमडला असून सगळीकडे सावळा गोंधळ चालू आहे. अशा कठिण काळात गोव्यात पूर्णवेळ राज्यपाल नेमणे गरजेचे असल्याचे  पक्षाने म्हटले आहे. गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाला असल्याने पूर्णवेळ राज्यपाल नेमणे हा गोवेकरांचा अधिकार असल्याचे कॉंग्रेस पक्षाने राष्ट्रपतींच्या नजरेसमोर मांडले आहे.

टॅग्स :congressकाँग्रेस