शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

नोटाबंदी फसल्याने मोदींनी पायउतार होऊन प्रायश्चित घ्यावे, माजी केंद्रीय मंत्र्याचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 18:45 IST

दोन वर्षांपूर्वी ८ नोव्हेंबर रोजी मोदी सरकारने केलेली नोटबंदी सपशेल अपयशी ठरल्याने पापाचे प्रायश्चित म्हणून मोदी यांनी पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे आणि तसे न केल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत लोकांनी भाजपला धडा शिकवावा, असे आवाहन प्रदेश काँग्रेसने केले आहे.

पणजी : दोन वर्षांपूर्वी ८ नोव्हेंबर रोजी मोदी सरकारने केलेली नोटबंदी सपशेल अपयशी ठरल्याने पापाचे प्रायश्चित म्हणून मोदी यांनी पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे आणि तसे न केल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत लोकांनी भाजपला धडा शिकवावा, असे आवाहन प्रदेश काँग्रेसने केले आहे.काँग्रेसचे प्रदेश मुख्य प्रवक्ते अ‍ॅड. रमाकांत खलप म्हणाले की, नोटाबंदीचा केंद्र सरकारचा निर्णय घिसाडघाईने घेतला गेला. लोकांना चलन बदलून घेण्यासाठी पुरेसा अवधीही दिला नाही. मोदी सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता हिरावून घेतली. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदावरुन एका रात्रीत रघुराम राजन यांना हटवून ऊर्जित पटेल यांना आणले.चलनातून पाचशे आणि हजाराच्या नोटा काढून टाकताना नव्या नोटा छापण्यासाठी तब्बल २२ हजार कोटी रुपये खर्च केले. काळा पैसा बाहेर काढण्यासाठीच्या उद्देशाने नोटाबंदी आणली परंतु प्रत्यक्षात १0 हजार कोटी रुपयेच रिझर्व्ह बँकेत आले. याचा अर्थ १२ हजार कोटी रुपयांचे नुकसानच झाले. देशाचे एकूण स्थानिक उत्पन्न ९ टक्क्यांवरून ७.५ टक्क्यांपर्यंत खाली आले. खलप म्हणाले की, देशभरातील सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, सर्वसामान्यांचे दिवशी उत्पन्न सरासरी २00 रुपये असते. नोटाबंदीमुळे एकूण लोकसंख्येपैकी दोन-तृतीयांश लोकांचे उत्पन्न बुडाले. आर्थिक व्यवहारांच्या डिजिटलायझेशनमुळे विदेशी कंपन्यांना फायदा झाला. पेटीएमचा व्यवसाय ४५0 टक्क्यांनी वाढला. नफा १५0 टक्क्यांनी वाढला. २५ कोटी भारतीयांनी पेटीएमसाठी नोंदणी केली. हे काम भारतीय बँकांच्या माध्यमातूनही करता आले असते.स्वाभिमान असेल तर पार्सेकरांनी सोपटेंना पराभूत करण्यासाठी वावरावेदरम्यान, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना खरोखरच स्वाभिमान असेल तर त्यांनी मांद्रे मतदारसंघात आगामी निवडणुकीत सोपटे यांचा पराभव करण्यासाठी वावरावे, असे खलप म्हणाले. आगामी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारीसाठी दावा करणार काय, या प्रश्नावर थेट उत्तर न देता ते असे म्हणाले की, मांद्रेतील लोकांना त्यांचे प्रश्न विधानसभेत मांडण्यासाठी प्रभावी आमदाराची गरज आहे. विधानसभेत चांगले कायदे करण्यासाठी चर्चेत भाग घेऊ शकेल, अशा अभ्यासू आमदाराची गरज आहे. या दोन्ही पात्रता आपल्याकडे असल्याचे त्यांना अप्रत्यक्षपणे सुचवायचे होते. लोकसभेबरोबरच विधानसभेच्याही मध्यावधी निवडणुका लागल्या तर आपण स्थानिक राजकारणात राहणे पसंत कराल की केंद्रीय राजकारणात जाल, असा सवाल केला असता त्याबद्दल अजून काही विचार केलेला नाही, असे ते म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेस