शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

मगोपला न्यायालयात उत्तर देणार - विनय तेंडुलकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 16:56 IST

मगोपने न्यायालयात जी याचिका सादर केली आहे, त्यामागे सरकारमध्ये अस्वस्थता निर्माण करावी असा हेतू आहे. तथापि, भाजपला त्या याचिकेची मुळीच भीती वाटत नाही.

पणजी - मगोपने न्यायालयात जी याचिका सादर केली आहे, त्यामागे सरकारमध्ये अस्वस्थता निर्माण करावी असा हेतू आहे. तथापि, भाजपला त्या याचिकेची मुळीच भीती वाटत नाही. त्या याचिकेला भाजप योग्य ते उत्तर न्यायालयातच देईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. मगोपचे नेते व मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास असून लोकसभा व विधानसभेच्या पोटनिवडणुकीवेळी मगोपकडून भाजपला पाठींबा दिला जाईल याचीही खात्री आहे, असे तेंडुलकर व सरचिटणीस सदानंद तानावडे म्हणाले.

मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर हे विविध विधाने करून लोकांची करमणूक करत आहेत. सरकार चांगले चालले आहे. मंत्री सुदीन ढवळीकर हेही सरकारमध्ये चांगले काम करत आहेत. मगोपने उच्च न्यायालयात याचिका सादर करून सरकारमध्ये अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याचा आम्ही निषेध करतो. मगोपवर आम्ही याचिका मागे घेण्यासाठी कसलाच दबाव टाकत नाही. त्या पक्षाने याचिका मागे घ्यावी अशी आम्ही विनंती देखील करत नाही. न्यायालयच काय तो निवाडा देईल, असे तेंडुलकर व तानावडे म्हणाले. 

मगोपचे मंत्री ढवळीकर हे गोव्याबाहेर असल्याने बुधवारी आम्ही त्यांच्याशी बोलू शकलो नाही पण मंत्री बाबू आजगावकर व दिपक प्रभू पाऊसकर ह्या दोन्ही मगो आमदारांशी आम्ही बोललो. ते सरकारसोबतच आहेत. त्यांची काही तक्रार नाही. मगोपचे अध्यक्ष ढवळीकर हे हास्यास्पद बोलत व वागत आहेत. मगो पक्षातच फुट पडेल असे कदाचित दिपक ढवळीकर यांना  वाटत असावे व त्यामुळे न्यायालयात धाव घेतली गेली असावी, असे तेंडुलकर म्हणाले. ज्येष्ठ मंत्र्याकडे मुख्यमंत्रीपदाचा ताबा द्यावा, अशी मागणी मगो पक्ष करत असल्याविषयी पत्रकारांनी विचारताच भाजपचे केंद्रीय नेतृत्व योग्य निर्णय योग्यवेळी घेईल एवढेच तेंडुलकर यांनी सांगितले. आम्ही केंद्रीय नेत्यांच्या रोज संपर्कात असतो असे ते म्हणाले.

मगोपने लोकसभा व विधानसभेच्या पोटनिवडणुकीवेळी उमेदवार उभे करण्याचा इशारा दिला असल्याविषयी बोलताना तेंडुलकर म्हणाले, की सुदिन ढवळीकर हे मगोपचे विधिमंडळ नेते आहेत. मगोकडून लोकसभा निवडणुकीवेळी व विधानसभेच्या पोटनिवडणुकीवेळीही भाजपला सहकार्य मिळेल. मगोपचे उमेदवार रिंगणात नसतील याची काळजी मंत्री ढवळीकर घेतील. काँग्रेसविरुद्ध केवळ भाजपचेच उमेदवार असतील.

दरम्यान, भाजपचे सगळे आमदार पुढील विधानसभा अधिवेशनावेळी अधिवेशनास उपस्थित राहतील, असेही तेंडुलकर यांनी पत्रकारांच्या प्रश्नादाखल सांगितले. भाजपचे तीन-चार आमदार असाध्य आजारामुळे अंथरुणास खिळलेले आहेत, असे मगोपने याचिकेत म्हटले आहे. त्यावर तेंडुलकर यांनी तसे काही नाही, आमचे आमदार सुस्थितीत आहेत, असे सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारणgoaगोवा