शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
3
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
4
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
5
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
6
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
7
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
8
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
9
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
10
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
11
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
12
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
13
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
14
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
15
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
16
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
17
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
18
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
19
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
20
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."

मगोपला न्यायालयात उत्तर देणार - विनय तेंडुलकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 16:56 IST

मगोपने न्यायालयात जी याचिका सादर केली आहे, त्यामागे सरकारमध्ये अस्वस्थता निर्माण करावी असा हेतू आहे. तथापि, भाजपला त्या याचिकेची मुळीच भीती वाटत नाही.

पणजी - मगोपने न्यायालयात जी याचिका सादर केली आहे, त्यामागे सरकारमध्ये अस्वस्थता निर्माण करावी असा हेतू आहे. तथापि, भाजपला त्या याचिकेची मुळीच भीती वाटत नाही. त्या याचिकेला भाजप योग्य ते उत्तर न्यायालयातच देईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. मगोपचे नेते व मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास असून लोकसभा व विधानसभेच्या पोटनिवडणुकीवेळी मगोपकडून भाजपला पाठींबा दिला जाईल याचीही खात्री आहे, असे तेंडुलकर व सरचिटणीस सदानंद तानावडे म्हणाले.

मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर हे विविध विधाने करून लोकांची करमणूक करत आहेत. सरकार चांगले चालले आहे. मंत्री सुदीन ढवळीकर हेही सरकारमध्ये चांगले काम करत आहेत. मगोपने उच्च न्यायालयात याचिका सादर करून सरकारमध्ये अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याचा आम्ही निषेध करतो. मगोपवर आम्ही याचिका मागे घेण्यासाठी कसलाच दबाव टाकत नाही. त्या पक्षाने याचिका मागे घ्यावी अशी आम्ही विनंती देखील करत नाही. न्यायालयच काय तो निवाडा देईल, असे तेंडुलकर व तानावडे म्हणाले. 

मगोपचे मंत्री ढवळीकर हे गोव्याबाहेर असल्याने बुधवारी आम्ही त्यांच्याशी बोलू शकलो नाही पण मंत्री बाबू आजगावकर व दिपक प्रभू पाऊसकर ह्या दोन्ही मगो आमदारांशी आम्ही बोललो. ते सरकारसोबतच आहेत. त्यांची काही तक्रार नाही. मगोपचे अध्यक्ष ढवळीकर हे हास्यास्पद बोलत व वागत आहेत. मगो पक्षातच फुट पडेल असे कदाचित दिपक ढवळीकर यांना  वाटत असावे व त्यामुळे न्यायालयात धाव घेतली गेली असावी, असे तेंडुलकर म्हणाले. ज्येष्ठ मंत्र्याकडे मुख्यमंत्रीपदाचा ताबा द्यावा, अशी मागणी मगो पक्ष करत असल्याविषयी पत्रकारांनी विचारताच भाजपचे केंद्रीय नेतृत्व योग्य निर्णय योग्यवेळी घेईल एवढेच तेंडुलकर यांनी सांगितले. आम्ही केंद्रीय नेत्यांच्या रोज संपर्कात असतो असे ते म्हणाले.

मगोपने लोकसभा व विधानसभेच्या पोटनिवडणुकीवेळी उमेदवार उभे करण्याचा इशारा दिला असल्याविषयी बोलताना तेंडुलकर म्हणाले, की सुदिन ढवळीकर हे मगोपचे विधिमंडळ नेते आहेत. मगोकडून लोकसभा निवडणुकीवेळी व विधानसभेच्या पोटनिवडणुकीवेळीही भाजपला सहकार्य मिळेल. मगोपचे उमेदवार रिंगणात नसतील याची काळजी मंत्री ढवळीकर घेतील. काँग्रेसविरुद्ध केवळ भाजपचेच उमेदवार असतील.

दरम्यान, भाजपचे सगळे आमदार पुढील विधानसभा अधिवेशनावेळी अधिवेशनास उपस्थित राहतील, असेही तेंडुलकर यांनी पत्रकारांच्या प्रश्नादाखल सांगितले. भाजपचे तीन-चार आमदार असाध्य आजारामुळे अंथरुणास खिळलेले आहेत, असे मगोपने याचिकेत म्हटले आहे. त्यावर तेंडुलकर यांनी तसे काही नाही, आमचे आमदार सुस्थितीत आहेत, असे सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारणgoaगोवा