शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

वार्षिक सरासरी २ हजार व्यक्तींचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 20:29 IST

पंधरा- वीस कोटी रुपये त्यावर खर्च केले जात असले तरी, हृदयविकाराचा झटका येणा-या रुग्णांची संख्या मात्र कमी झालेली नाही. 

पणजी- राज्यात हृदयरोग्यांवर उपचारांसाठी सरकारी व खासगी क्षेत्रात अधिकाधिक सुविधा निर्माण केल्या जात असल्या तरी व वार्षिक पंधरा- वीस कोटी रुपये त्यावर खर्च केले जात असले तरी, हृदयविकाराचा झटका येणा-या रुग्णांची संख्या मात्र कमी झालेली नाही. 

१०८ रुग्णवाहिका सेवेत अधिकाधिक रुग्णवाहिका जमा केल्या जात आहेत. २०१४ साली गोवा सरकारने कार्डियाक सेंटर सुरू केले. शिवाय खासगी इस्पितळे व सरकार विविध ठिकाणी हृदयरोगावर उपचारांची सोय करत आहे. डॉ. शेखर साळकर यांनी मात्र बुधवारी अधिकृत आकडेवारी जाहीर केली व राज्यात हृदयविकाराचा झटका येउन मृत्यू होणाºया रुग्णांची संख्या गेल्या पाच वर्षांत वाढतच असल्याचे नमूद केले. २०१३ साली १८५५ व्यक्तींना हार्ट अटेकने मृत्यू आला. २०१४ साली १९९६ तर २०१५ साली २०८३ व्यक्तींना हृदयविकाराचा धक्का बसून मृत्यू झाल्याचे आकडेवारी दाखवून देते. २०१६ साली २१२२ तर २०१७ साली २१९० व्यक्तींना हार्ट अटेकने मृत्यू आला. २०१८ सालची आकडेवारी अजून उपलब्ध झालेली नाही असे डॉ. साळकर म्हणाले. 

कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या गोव्यात २०१३ साली ९१७ होती. २०१४ साली ७८८ कॅन्सर रुग्ण दगावले. २०१५ साली ९१५, २०१६ साली ९२२ तर २०१७ मध्ये ९६२ कॅन्सर रुग्ण दगावले. यकृत निकामी ठरल्याने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २०१३ साली ७९१ होती. २०१४ साली अशा प्रकारचे ९६६ रुग्ण मृत्यू पावले. २०१५ साली ८५६ तर २०१६ साली ८१३ रुग्ण दगावले. २०१७ साली लिव्हर निकामी ठरलेले ७६२ रुग्ण मृत झाल्याचे साळकर म्हणाले. किडणीशी निगडीत आजाराचे ३६४ रुग्ण २०१३ साली मृत्युमुखी पडले. २०१४ साली २७९ तर २०१५ साली ४०० रुग्ण मृत्यूमुखी पडले. २०१५ साली मूत्रपिंडाशी संबंधित रोगाने ४१७, तर २०१६ साली ३८० रुग्ण दगावले. 

ट्राफिक सेंटीनल योग्य

डॉ. साळकर म्हणाले, की वाहन अपघातात वार्षिक सुमारे अडिचशे ते तीनशे व्यक्तींचा बळी जातो. २०१५ साली ३०२, २०१६ साली ३१६, २०१७ मध्ये ३०६ आणि २०१८ साली २४८ व्यक्तींचा बळी वाहन अपघातात गेला. केवळ तिस-चाळीस वर्षांचे दुचाकीस्वार ठार होतात व हे सगळे अत्यंत निरोगी असतात. ट्राफीक सेन्टीनल योजनेने ७५ व्यक्तींचे प्राण वाचविले आहेत. एका साध्या योजनेने दिलेले हे मोेठे योगदान आहे. ही योजना बंद केली जाऊ नये. योजनेमुळे ज्या समस्या निर्माण होतात, त्या सोडविता येतील व त्यासाठी एखाद्या लवादाचीही नियुक्ती करता येईल. ट्राफीक सेन्टीनल योजनेमुळे अनेक निरोगी व्यक्तींचे प्राण वाचतील.