शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
6
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
8
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
9
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
10
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
11
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
12
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
13
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
14
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
15
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
16
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
17
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
18
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
19
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
20
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?

वार्षिक सरासरी २ हजार व्यक्तींचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 20:29 IST

पंधरा- वीस कोटी रुपये त्यावर खर्च केले जात असले तरी, हृदयविकाराचा झटका येणा-या रुग्णांची संख्या मात्र कमी झालेली नाही. 

पणजी- राज्यात हृदयरोग्यांवर उपचारांसाठी सरकारी व खासगी क्षेत्रात अधिकाधिक सुविधा निर्माण केल्या जात असल्या तरी व वार्षिक पंधरा- वीस कोटी रुपये त्यावर खर्च केले जात असले तरी, हृदयविकाराचा झटका येणा-या रुग्णांची संख्या मात्र कमी झालेली नाही. 

१०८ रुग्णवाहिका सेवेत अधिकाधिक रुग्णवाहिका जमा केल्या जात आहेत. २०१४ साली गोवा सरकारने कार्डियाक सेंटर सुरू केले. शिवाय खासगी इस्पितळे व सरकार विविध ठिकाणी हृदयरोगावर उपचारांची सोय करत आहे. डॉ. शेखर साळकर यांनी मात्र बुधवारी अधिकृत आकडेवारी जाहीर केली व राज्यात हृदयविकाराचा झटका येउन मृत्यू होणाºया रुग्णांची संख्या गेल्या पाच वर्षांत वाढतच असल्याचे नमूद केले. २०१३ साली १८५५ व्यक्तींना हार्ट अटेकने मृत्यू आला. २०१४ साली १९९६ तर २०१५ साली २०८३ व्यक्तींना हृदयविकाराचा धक्का बसून मृत्यू झाल्याचे आकडेवारी दाखवून देते. २०१६ साली २१२२ तर २०१७ साली २१९० व्यक्तींना हार्ट अटेकने मृत्यू आला. २०१८ सालची आकडेवारी अजून उपलब्ध झालेली नाही असे डॉ. साळकर म्हणाले. 

कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या गोव्यात २०१३ साली ९१७ होती. २०१४ साली ७८८ कॅन्सर रुग्ण दगावले. २०१५ साली ९१५, २०१६ साली ९२२ तर २०१७ मध्ये ९६२ कॅन्सर रुग्ण दगावले. यकृत निकामी ठरल्याने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २०१३ साली ७९१ होती. २०१४ साली अशा प्रकारचे ९६६ रुग्ण मृत्यू पावले. २०१५ साली ८५६ तर २०१६ साली ८१३ रुग्ण दगावले. २०१७ साली लिव्हर निकामी ठरलेले ७६२ रुग्ण मृत झाल्याचे साळकर म्हणाले. किडणीशी निगडीत आजाराचे ३६४ रुग्ण २०१३ साली मृत्युमुखी पडले. २०१४ साली २७९ तर २०१५ साली ४०० रुग्ण मृत्यूमुखी पडले. २०१५ साली मूत्रपिंडाशी संबंधित रोगाने ४१७, तर २०१६ साली ३८० रुग्ण दगावले. 

ट्राफिक सेंटीनल योग्य

डॉ. साळकर म्हणाले, की वाहन अपघातात वार्षिक सुमारे अडिचशे ते तीनशे व्यक्तींचा बळी जातो. २०१५ साली ३०२, २०१६ साली ३१६, २०१७ मध्ये ३०६ आणि २०१८ साली २४८ व्यक्तींचा बळी वाहन अपघातात गेला. केवळ तिस-चाळीस वर्षांचे दुचाकीस्वार ठार होतात व हे सगळे अत्यंत निरोगी असतात. ट्राफीक सेन्टीनल योजनेने ७५ व्यक्तींचे प्राण वाचविले आहेत. एका साध्या योजनेने दिलेले हे मोेठे योगदान आहे. ही योजना बंद केली जाऊ नये. योजनेमुळे ज्या समस्या निर्माण होतात, त्या सोडविता येतील व त्यासाठी एखाद्या लवादाचीही नियुक्ती करता येईल. ट्राफीक सेन्टीनल योजनेमुळे अनेक निरोगी व्यक्तींचे प्राण वाचतील.