शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

वार्षिक सरासरी २ हजार व्यक्तींचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 20:29 IST

पंधरा- वीस कोटी रुपये त्यावर खर्च केले जात असले तरी, हृदयविकाराचा झटका येणा-या रुग्णांची संख्या मात्र कमी झालेली नाही. 

पणजी- राज्यात हृदयरोग्यांवर उपचारांसाठी सरकारी व खासगी क्षेत्रात अधिकाधिक सुविधा निर्माण केल्या जात असल्या तरी व वार्षिक पंधरा- वीस कोटी रुपये त्यावर खर्च केले जात असले तरी, हृदयविकाराचा झटका येणा-या रुग्णांची संख्या मात्र कमी झालेली नाही. 

१०८ रुग्णवाहिका सेवेत अधिकाधिक रुग्णवाहिका जमा केल्या जात आहेत. २०१४ साली गोवा सरकारने कार्डियाक सेंटर सुरू केले. शिवाय खासगी इस्पितळे व सरकार विविध ठिकाणी हृदयरोगावर उपचारांची सोय करत आहे. डॉ. शेखर साळकर यांनी मात्र बुधवारी अधिकृत आकडेवारी जाहीर केली व राज्यात हृदयविकाराचा झटका येउन मृत्यू होणाºया रुग्णांची संख्या गेल्या पाच वर्षांत वाढतच असल्याचे नमूद केले. २०१३ साली १८५५ व्यक्तींना हार्ट अटेकने मृत्यू आला. २०१४ साली १९९६ तर २०१५ साली २०८३ व्यक्तींना हृदयविकाराचा धक्का बसून मृत्यू झाल्याचे आकडेवारी दाखवून देते. २०१६ साली २१२२ तर २०१७ साली २१९० व्यक्तींना हार्ट अटेकने मृत्यू आला. २०१८ सालची आकडेवारी अजून उपलब्ध झालेली नाही असे डॉ. साळकर म्हणाले. 

कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या गोव्यात २०१३ साली ९१७ होती. २०१४ साली ७८८ कॅन्सर रुग्ण दगावले. २०१५ साली ९१५, २०१६ साली ९२२ तर २०१७ मध्ये ९६२ कॅन्सर रुग्ण दगावले. यकृत निकामी ठरल्याने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २०१३ साली ७९१ होती. २०१४ साली अशा प्रकारचे ९६६ रुग्ण मृत्यू पावले. २०१५ साली ८५६ तर २०१६ साली ८१३ रुग्ण दगावले. २०१७ साली लिव्हर निकामी ठरलेले ७६२ रुग्ण मृत झाल्याचे साळकर म्हणाले. किडणीशी निगडीत आजाराचे ३६४ रुग्ण २०१३ साली मृत्युमुखी पडले. २०१४ साली २७९ तर २०१५ साली ४०० रुग्ण मृत्यूमुखी पडले. २०१५ साली मूत्रपिंडाशी संबंधित रोगाने ४१७, तर २०१६ साली ३८० रुग्ण दगावले. 

ट्राफिक सेंटीनल योग्य

डॉ. साळकर म्हणाले, की वाहन अपघातात वार्षिक सुमारे अडिचशे ते तीनशे व्यक्तींचा बळी जातो. २०१५ साली ३०२, २०१६ साली ३१६, २०१७ मध्ये ३०६ आणि २०१८ साली २४८ व्यक्तींचा बळी वाहन अपघातात गेला. केवळ तिस-चाळीस वर्षांचे दुचाकीस्वार ठार होतात व हे सगळे अत्यंत निरोगी असतात. ट्राफीक सेन्टीनल योजनेने ७५ व्यक्तींचे प्राण वाचविले आहेत. एका साध्या योजनेने दिलेले हे मोेठे योगदान आहे. ही योजना बंद केली जाऊ नये. योजनेमुळे ज्या समस्या निर्माण होतात, त्या सोडविता येतील व त्यासाठी एखाद्या लवादाचीही नियुक्ती करता येईल. ट्राफीक सेन्टीनल योजनेमुळे अनेक निरोगी व्यक्तींचे प्राण वाचतील.