शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

वार्षिक सरासरी २ हजार व्यक्तींचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 20:29 IST

पंधरा- वीस कोटी रुपये त्यावर खर्च केले जात असले तरी, हृदयविकाराचा झटका येणा-या रुग्णांची संख्या मात्र कमी झालेली नाही. 

पणजी- राज्यात हृदयरोग्यांवर उपचारांसाठी सरकारी व खासगी क्षेत्रात अधिकाधिक सुविधा निर्माण केल्या जात असल्या तरी व वार्षिक पंधरा- वीस कोटी रुपये त्यावर खर्च केले जात असले तरी, हृदयविकाराचा झटका येणा-या रुग्णांची संख्या मात्र कमी झालेली नाही. 

१०८ रुग्णवाहिका सेवेत अधिकाधिक रुग्णवाहिका जमा केल्या जात आहेत. २०१४ साली गोवा सरकारने कार्डियाक सेंटर सुरू केले. शिवाय खासगी इस्पितळे व सरकार विविध ठिकाणी हृदयरोगावर उपचारांची सोय करत आहे. डॉ. शेखर साळकर यांनी मात्र बुधवारी अधिकृत आकडेवारी जाहीर केली व राज्यात हृदयविकाराचा झटका येउन मृत्यू होणाºया रुग्णांची संख्या गेल्या पाच वर्षांत वाढतच असल्याचे नमूद केले. २०१३ साली १८५५ व्यक्तींना हार्ट अटेकने मृत्यू आला. २०१४ साली १९९६ तर २०१५ साली २०८३ व्यक्तींना हृदयविकाराचा धक्का बसून मृत्यू झाल्याचे आकडेवारी दाखवून देते. २०१६ साली २१२२ तर २०१७ साली २१९० व्यक्तींना हार्ट अटेकने मृत्यू आला. २०१८ सालची आकडेवारी अजून उपलब्ध झालेली नाही असे डॉ. साळकर म्हणाले. 

कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या गोव्यात २०१३ साली ९१७ होती. २०१४ साली ७८८ कॅन्सर रुग्ण दगावले. २०१५ साली ९१५, २०१६ साली ९२२ तर २०१७ मध्ये ९६२ कॅन्सर रुग्ण दगावले. यकृत निकामी ठरल्याने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २०१३ साली ७९१ होती. २०१४ साली अशा प्रकारचे ९६६ रुग्ण मृत्यू पावले. २०१५ साली ८५६ तर २०१६ साली ८१३ रुग्ण दगावले. २०१७ साली लिव्हर निकामी ठरलेले ७६२ रुग्ण मृत झाल्याचे साळकर म्हणाले. किडणीशी निगडीत आजाराचे ३६४ रुग्ण २०१३ साली मृत्युमुखी पडले. २०१४ साली २७९ तर २०१५ साली ४०० रुग्ण मृत्यूमुखी पडले. २०१५ साली मूत्रपिंडाशी संबंधित रोगाने ४१७, तर २०१६ साली ३८० रुग्ण दगावले. 

ट्राफिक सेंटीनल योग्य

डॉ. साळकर म्हणाले, की वाहन अपघातात वार्षिक सुमारे अडिचशे ते तीनशे व्यक्तींचा बळी जातो. २०१५ साली ३०२, २०१६ साली ३१६, २०१७ मध्ये ३०६ आणि २०१८ साली २४८ व्यक्तींचा बळी वाहन अपघातात गेला. केवळ तिस-चाळीस वर्षांचे दुचाकीस्वार ठार होतात व हे सगळे अत्यंत निरोगी असतात. ट्राफीक सेन्टीनल योजनेने ७५ व्यक्तींचे प्राण वाचविले आहेत. एका साध्या योजनेने दिलेले हे मोेठे योगदान आहे. ही योजना बंद केली जाऊ नये. योजनेमुळे ज्या समस्या निर्माण होतात, त्या सोडविता येतील व त्यासाठी एखाद्या लवादाचीही नियुक्ती करता येईल. ट्राफीक सेन्टीनल योजनेमुळे अनेक निरोगी व्यक्तींचे प्राण वाचतील.