शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

१0८ कर्मचाऱ्यांचे वेतन अडल्याने नाराजी

By admin | Updated: September 22, 2015 00:49 IST

पणजी : जीव्हीके इएमआरआय कंपनीच्या व्यवस्थापनाने १0८ रुग्णसेवेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे थकलेले वेतन आणि पगारवाढ अजूनपर्यंत दिली नाही

पणजी : जीव्हीके इएमआरआय कंपनीच्या व्यवस्थापनाने १0८ रुग्णसेवेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे थकलेले वेतन आणि पगारवाढ अजूनपर्यंत दिली नाही. याबाबत कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधाला असता या प्रक्रियेसंदर्भातील कागदपत्रे (फाईल) सरकार दरबारी असून ती मंजूर न झाल्याने यंदा गोव्यातील कर्मचाऱ्यांना थकलेले वेतन देणे तसेच दरवर्षी चतुर्थीपूर्वी देण्यात येणारी पगारवाढ देणे शक्य झाले नसल्याचे सांगण्यात आले. जीव्हीके इएमआरआय कंपनी गोवा राज्याबरोबरच इतर आठ राज्यांत सेवा पुरवते. येथील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इतर सर्व राज्यांतील कर्मचाऱ्यांना चतुर्थीपूर्वीचे थकबाकी वेतन (एरियस) दिले गेले आहे. मात्र, गोव्यातील कर्मचाऱ्यांना थकबाकी देण्यात आली नाही. कंपनीने राज्यात १0८ सेवा सुरू केल्यापासून ते गतवर्षीपर्यंत चतुर्थीपूर्वी कर्मचाऱ्यांना थकबाकी दिली होती. मात्र, यंदा व्यवस्थापनाने कोणतीही सूचना न देता तसेच याबाबत १0८ कर्मचारी संघटनेच्या सदस्यांनी वारंवार कंपनीकडे चौकशी केल्यानंतरही कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता सरकारी प्रक्रियेबाबत मौन पाळले. कर्मचाऱ्यांना थकबाकी आणि पगारवाढ या दोन्ही गोष्टी का अडून राहिल्या आहेत याबाबत कोणतीही माहिती नसल्याने १0८ समितीच्या एका सदस्याने सांगितले. या कंपनीअंतर्गत एकूण १९४ कर्मचारी काम करतात. जीव्हीके इएमआरआयच्या सेवा नियंत्रक प्रतिष्ठा मुद्रस म्हणाल्या की, कर्मचाऱ्यांची थकबाकी आणि पगारवाढीबाबतची प्रक्रिया सुरू आहे. सध्या ही फाईल सरकार दरबारी असून ती मंजूर होऊन येईपर्यंत आम्ही कर्मचाऱ्यांना थकबाकी वेतन आणि पगारवाढीबाबत कोणतीही पूर्वकल्पना दिली नाही. सरकारकडून हे सोपस्कार त्वरित पूर्ण व्हावेत म्हणून व्यवस्थान प्रयत्न करीत आहे.