शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

गोव्यात नागरी पुरवठा खात्याची सर्व गोदामे आता सीसीटीव्ही कॅमेराचा निगराणीखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2018 13:20 IST

नागरी पुरवठा खात्याच्या कुठ्ठाळी येथील मुख्य गोदामासह अन्य चार गोदामांच्या डागडुजीसाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

पणजी : नागरी पुरवठा खात्याच्या कुठ्ठाळी येथील मुख्य गोदामासह अन्य चार गोदामांच्या डागडुजीसाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील सर्व अकराही गोदामांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी लोकमतला ही माहिती दिली. कुठ्ठाळीतील गोदामाच्या नूतनीकरणावर १ कोटी रुपये तर फोंडा येथील गोदामाच्या डागडुजीवर ३२ लाख रुपये खर्च केले जातील. डिचोली तसेच अन्य एका ठिकाणी असलेले गोदामाचेही नूतनीकरण केले जाईल.या चार गोदामांना डागडुजीनंतर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील. धान्य चोरी तसेच अन्य गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. नागरी पुरवठा खात्याच्या सर्व गोदामांची दैनावस्था झालेली आहे. गोदामात माल पडून राहण्यामागे स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्याची उचल न होणे हेही एक कारण आहे. लोकांच्या गरजेनुसार धान्य मागविले जाते मात्र लोक रेशनवर उचलच करीत नाहीत.आधार जोडणीकडे ३५ टक्के रेशनकार्डधारकांची पाठदरम्यान, रेशन कार्डांना आधार कार्ड जोडण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदत होती. सुमारे ३ लाख ३0 हजार अर्ज वितरित करण्यात आले त्यापैकी ६५ टक्के रेशन कार्डधारकांनी आधार जोडणीसाठी अर्ज भरुन दिलेले आहेत. अन्य ३५ टक्के रेशन कार्डधारकांनी पाठ फिरवली. आधार जोडणीची प्रक्रिया मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.रेशन कार्डधारकांना त्यांची स्वस्त धान्याची सबसिडी यापुढे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा पर्याय आहे. रेशनवर स्वस्त दरातील धान्य स्वीकारणार की बँक खात्यात सबसिडी जमा करायची याबाबतचा निर्णय रेशन कार्डधारकांनी घ्यावयाचा असून तसे खात्याला अर्ज सादर करुन कळवायचे आहे. शिधापत्रिकाधारकांना धान्यावर सवलत देण्याऐवजी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर (डीटीएफ)अर्थात जी काही सवलत आहे त्याची रक्कम थेट खात्यात जमा करण्याची ही नवी योजना आहे.अलीकडेच या अकरा गोदामांमधील सुमारे ७0७ मेट्रिक टन गहू वेळीच कीटकनाशकांची फवारणी न झाल्याने कीड लागून खराब झाला. जुना आणि खराब माल नवीन गव्हामध्ये मिसळून तो सार्वजनिक वितरण व्यवस्थेव्दारे लोकांना वितरित केला जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. गोदामांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यानंतर असे प्रकारही उघडकीस येतील.राज्यात दारिद्र्य रेषेवरील १ लाख ९0 हजार शिधापत्रिकाधारक आहेत. प्रती रेशन कार्ड ७ किलो गहू ९ रुपये १0 पैसे दराने तसेच ८ किलो तांदुळ प्रती किलो ११ रुपये ६0 पैसे दराने दरमहा दिले जातात. नागरी पुरवठा खात्याच्या गोदामांमधून दर महिन्याला साधारणपणे २ तारीखपासून त्या महिन्याचा कोटा उचलण्यास सुरवात होते व वाहतूकदार रेशन दुकानांना धान्य पुरवित असतात. गोव्याला धान्य पुरवठा पंजाबहून होतो. वास्को रेल्वे यार्डात हा माल आल्यानंतर हा माल आधी भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात आणि नंतर नागरी पुरवठा खात्याच्या गोदामांमध्ये पाठवला जातो. मिळालेल्या माहितीनुसार रेशनवर वितरणासाठी दर महिन्याला सुमारे ३६४0 मेट्रिक टन तांदुळ तर १३१३ मेट्रिक टन गहू लागतो. भटिंडा पंजाबहून सोलापूरमार्गे रेल्वे वाघिणीतून गहू तर लुधियानामधून तांदूळ येतो.

टॅग्स :goaगोवा