शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

राजधानीला जोडणारे सर्व महामार्ग पाच वर्षांत पूर्ण होतील: मुख्यमंत्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2024 08:33 IST

पश्चिम बगलमार्गावरील २.७५ किलोमीटरचा भाग खुला

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : राज्यातील शहरांना महामार्ग, उड्डाणपुलांच्या माध्यमातून राजधानी पणजीशी जोडले जाणार आहे. मडगाव ते काणकोण हा महामार्ग येत्या चार वर्षांत पूर्ण होणार आहे. राज्याच्या सर्व सीमांवरून पणजी शहराला जोडणारे पत्रादेवी, मोले, काणकोण, केरी (सत्तरी) हे महामार्ग येत्या पाच वर्षांत पूर्ण होतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. येथील पश्चिम बगलमार्ग प्रकल्पाच्या काही भागांचे उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी पर्यावरणमंत्री अॅलेक्स सिक्वेरा, मडगावचे आमदार दिगंबर कामत, फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, गेल्या काही वर्षांत भाजप सरकारने राज्यात मूलभूत सुविधा आणि जनहितार्थ विविध प्रकल्प आणले आहेत. त्यातच सरकार राज्यात रस्ते आणि उड्डाणपूल उभारून शहरांना जवळ आणण्याचे काम करत आहे. त्याचाच भाग म्हणून मडगाव ते काणकोण हा महामार्ग येत्या चार वर्षात पूर्ण होणार आहे. पश्चिम बगलमार्गाची एकूण लांबी १२ किलोमीटर आहे. त्यातील २.७५ किलोमीटरचा रस्ता लोकांसाठी खुला करण्यात आला आहे. या प्रकल्पाला केंद्र सरकारच्या माध्यमातून २४७ कोटी आणि राज्य सरकारकडून २३५ कोटी खर्च करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले, की ऐन नाताळाच्या काळात अनेक पर्यटक दक्षिण गोव्यात येत आहेत. येथील रहदारी वाढत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ लागली होती. ही समस्या लक्षात घेऊन आम्ही हा बगलरस्ता खुला करण्याचा निर्णय घेतला. ही दक्षिण गोव्यातील लोकांसाठी नाताळाची भेट आहे.

अडीच कोटींची नुकसान भरपाई 

राज्यात 'गुड गव्हर्नन्स वीक' सुरू आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली होती. याबाबत ते म्हणाले, की विविध प्रकरणांमध्ये लोकांना सरकारकडून नुकसान भरपाई देणे बाकी होते. अशा लोकांना सोमवारी २.५ कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे. त्याचबरोबर वानरमारे समाजातील लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले. 

टॅग्स :goaगोवाhighwayमहामार्गPramod Sawantप्रमोद सावंत