शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

राजधानीला जोडणारे सर्व महामार्ग पाच वर्षांत पूर्ण होतील: मुख्यमंत्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2024 08:33 IST

पश्चिम बगलमार्गावरील २.७५ किलोमीटरचा भाग खुला

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : राज्यातील शहरांना महामार्ग, उड्डाणपुलांच्या माध्यमातून राजधानी पणजीशी जोडले जाणार आहे. मडगाव ते काणकोण हा महामार्ग येत्या चार वर्षांत पूर्ण होणार आहे. राज्याच्या सर्व सीमांवरून पणजी शहराला जोडणारे पत्रादेवी, मोले, काणकोण, केरी (सत्तरी) हे महामार्ग येत्या पाच वर्षांत पूर्ण होतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. येथील पश्चिम बगलमार्ग प्रकल्पाच्या काही भागांचे उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी पर्यावरणमंत्री अॅलेक्स सिक्वेरा, मडगावचे आमदार दिगंबर कामत, फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, गेल्या काही वर्षांत भाजप सरकारने राज्यात मूलभूत सुविधा आणि जनहितार्थ विविध प्रकल्प आणले आहेत. त्यातच सरकार राज्यात रस्ते आणि उड्डाणपूल उभारून शहरांना जवळ आणण्याचे काम करत आहे. त्याचाच भाग म्हणून मडगाव ते काणकोण हा महामार्ग येत्या चार वर्षात पूर्ण होणार आहे. पश्चिम बगलमार्गाची एकूण लांबी १२ किलोमीटर आहे. त्यातील २.७५ किलोमीटरचा रस्ता लोकांसाठी खुला करण्यात आला आहे. या प्रकल्पाला केंद्र सरकारच्या माध्यमातून २४७ कोटी आणि राज्य सरकारकडून २३५ कोटी खर्च करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले, की ऐन नाताळाच्या काळात अनेक पर्यटक दक्षिण गोव्यात येत आहेत. येथील रहदारी वाढत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ लागली होती. ही समस्या लक्षात घेऊन आम्ही हा बगलरस्ता खुला करण्याचा निर्णय घेतला. ही दक्षिण गोव्यातील लोकांसाठी नाताळाची भेट आहे.

अडीच कोटींची नुकसान भरपाई 

राज्यात 'गुड गव्हर्नन्स वीक' सुरू आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली होती. याबाबत ते म्हणाले, की विविध प्रकरणांमध्ये लोकांना सरकारकडून नुकसान भरपाई देणे बाकी होते. अशा लोकांना सोमवारी २.५ कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे. त्याचबरोबर वानरमारे समाजातील लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले. 

टॅग्स :goaगोवाhighwayमहामार्गPramod Sawantप्रमोद सावंत