शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

राजधानीला जोडणारे सर्व महामार्ग पाच वर्षांत पूर्ण होतील: मुख्यमंत्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2024 08:33 IST

पश्चिम बगलमार्गावरील २.७५ किलोमीटरचा भाग खुला

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : राज्यातील शहरांना महामार्ग, उड्डाणपुलांच्या माध्यमातून राजधानी पणजीशी जोडले जाणार आहे. मडगाव ते काणकोण हा महामार्ग येत्या चार वर्षांत पूर्ण होणार आहे. राज्याच्या सर्व सीमांवरून पणजी शहराला जोडणारे पत्रादेवी, मोले, काणकोण, केरी (सत्तरी) हे महामार्ग येत्या पाच वर्षांत पूर्ण होतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. येथील पश्चिम बगलमार्ग प्रकल्पाच्या काही भागांचे उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी पर्यावरणमंत्री अॅलेक्स सिक्वेरा, मडगावचे आमदार दिगंबर कामत, फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, गेल्या काही वर्षांत भाजप सरकारने राज्यात मूलभूत सुविधा आणि जनहितार्थ विविध प्रकल्प आणले आहेत. त्यातच सरकार राज्यात रस्ते आणि उड्डाणपूल उभारून शहरांना जवळ आणण्याचे काम करत आहे. त्याचाच भाग म्हणून मडगाव ते काणकोण हा महामार्ग येत्या चार वर्षात पूर्ण होणार आहे. पश्चिम बगलमार्गाची एकूण लांबी १२ किलोमीटर आहे. त्यातील २.७५ किलोमीटरचा रस्ता लोकांसाठी खुला करण्यात आला आहे. या प्रकल्पाला केंद्र सरकारच्या माध्यमातून २४७ कोटी आणि राज्य सरकारकडून २३५ कोटी खर्च करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले, की ऐन नाताळाच्या काळात अनेक पर्यटक दक्षिण गोव्यात येत आहेत. येथील रहदारी वाढत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ लागली होती. ही समस्या लक्षात घेऊन आम्ही हा बगलरस्ता खुला करण्याचा निर्णय घेतला. ही दक्षिण गोव्यातील लोकांसाठी नाताळाची भेट आहे.

अडीच कोटींची नुकसान भरपाई 

राज्यात 'गुड गव्हर्नन्स वीक' सुरू आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली होती. याबाबत ते म्हणाले, की विविध प्रकरणांमध्ये लोकांना सरकारकडून नुकसान भरपाई देणे बाकी होते. अशा लोकांना सोमवारी २.५ कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे. त्याचबरोबर वानरमारे समाजातील लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले. 

टॅग्स :goaगोवाhighwayमहामार्गPramod Sawantप्रमोद सावंत