शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

कृषी धोरणाची ऐशीतैशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2025 10:37 IST

गोवा सरकारने अखेर राज्याचे कृषी धोरण जाहीर केले.

गोवा सरकारने काल अखेर राज्याचे कृषी धोरण जाहीर केले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत व कृषिमंत्री रवी नाईक यांनी नव्या कृषी धोरणाची वैशिष्ट्ये सांगितली. अर्थात अशा प्रकारची अनेक धोरणे येतात व जातात; पण जोपर्यंत सरकारचा कारभार सुधारत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचे किंवा छोट्या बागायतदारांचे कल्याण होत नाही. शेतजमिनींचे रूपांतरण बंद करणार ही सत्ताधाऱ्यांची आवडती घोषणा आहे. दर पाच वर्षांनी ही चवदार घोषणा होत असते. प्रत्यक्षात लाखो चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जमिनींचे रूपांतरण टीसीपी खाते करत असते. पूर्वी तर काही टीसीपी मंत्री स्वतःकडेच कृषी खाते ठेवत होते. म्हणजे शेतजमीन शोधायची व ती रूपांतरित करून द्यायची. ही दोन्ही कामे सुलभतेने राजकारणी करू शकत होते. 

मध्यंतरी मुख्यमंत्री सावंत यांनी डिचोलीत एका कार्यक्रमात बोलताना जाहीर केले की, गोव्याची हिरवाई वाचविण्यासाठी आपण अनेक कायदेशीर गोष्टी केल्या आहेत. त्या नेमक्या कोणत्या ते त्यांनी स्पष्ट केले नाही. पण सांकवाळला भुतानीचा प्रकल्प किंवा रेईशमागूश भागातील वाढती बांधकामे पाहिली की, सरकारच्या घोषणेतील फोलपणा कळून येतो. ग्रीनरी वाचविण्यासाठी अगोदर खनिज धंदा मर्यादित ठेवावा लागेल. खाण कंपन्यांचे लाड पुरविणाऱ्या सरकारने कितीही कृषी धोरणे, ग्रीनरी विषयक उपाययोजना केल्या, तरी त्या व्यर्थच. पूर्वी सत्तरी, डिचोली, सांगे, केपे या भागातील बागायती, शेती यांची सर्वाधिक हानी खाण कंपन्यांनीच केलेली आहे. सत्तरी-डिचोलीतील काजू बागायतदारांना संकटात लोटण्याचे काम अंदाधुंद खनिज खाण व्यवसायानेच केले आहे.

नव्या कृषी धोरणानुसार यापुढे तरी शेतजमिनींचे रूपांतरण थांबणार असेल तर ते स्वागतार्हच मानावे लागेल. गोव्यात काही शैक्षणिक संस्था, काही मठ, चर्च संस्था यांनी आपल्या प्रकल्पांसाठी शेतजमिनी रूपांतरित करून घेतल्या आहेतच. शिवाय मोठ्या संख्येने सरकारी प्रकल्पांसाठीही जमिनींचे रूपांतरण होत असते. गोव्याचा निसर्ग, पर्यावरण, शेती हे सारे राखून ठेवण्याचे मोठे आव्हान आता आहे. लोक रस्त्यावर उतरले तरी, सत्ताधारी पर्वा करत नाहीत. गेल्या आठवड्यात अनेक नागरिकांनी आझाद मैदानावर एकत्र येऊन मेणबत्ती मोर्चा काढला. शेवटी गोव्याची थोडीफार शिल्लक असलेली शेती, हिरवाई, नद्या, डोंगर टिकले तरच पर्यटक येतील, पर्यटन व्यवसाय टिकविण्यासाठी अगोदर गोव्याची ग्रीनरी टिकवून ठेवावी लागेल. कृषी धोरणाची अंमलबजावणी जर प्रामाणिकपणे झाली तरच शेती व शेतजमिनींचे रक्षण होऊ शकेल. सरकारने बिल्डरांना रान कसे मोकळे करून दिले आहे ते ताळगाव व बांबोळीला जाऊन पाहा. ताळगावच्या खोल शेतात एक मोठा प्रकल्प येत आहे. तिथे याच दिवसांत कित्येक ट्रक भरून माती टाकून शेतजमीन बुजविली जात आहे. मुख्यमंत्री सावंत व कृषिमंत्री नाईक यांनी तातडीने भेट देऊन एकदा पाहणी करावी. जमेल का?

गोवा मुक्तिनंतरच्या काळात अनेक कुटुंबे शेती करायची. गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांची उपजीविका शेतीवर चालायची. गावडा, कुणबी, वेळीप यांनी शेती राखून ठेवली होती. भूमिपुत्रांनी खूप कष्ट काढले. मात्र केवळ शेतीवरच कुटुंब पोसण्याचे दिवस १९८० सालापासून मागे पडले. मजुरी परवडेनाशी झाली. गोव्यात लहान जागेत शेती करावी लागते. महाराष्ट्रासारख्या मोठ्या जमिनी इथे नाहीत. आईवडिलांच्या पश्चात मुलांनी शेतजमीन पडीक टाकून सरकारी नोकरीचा मार्ग पत्करला. अशी स्थिती उत्तर गोव्यातील बार्देशातही अनुभवास येते. काही तरुण अजून नव्या पद्धतीने शेती करतात हे विशेष. कुणी कलिंगडाचे पीक घेतोय तर कुणी विविध भाज्यांचे, तर कुणी स्ट्रॉबेरीचेदेखील पीक घेतोय. मात्र सरकारी पातळीवरून गरीब शेतकऱ्यांना भरीव मदत मिळत नाही. दुधाची आधारभूत किंमतदेखील वेळेत देऊ न शकणारे राज्यकर्ते आपल्याकडे आहेत. कृषी खात्याचे अधिकारी फिल्डवर उतरत नाहीत. 

कागदोपत्री अनेक सोपस्कार पार पाडण्याची शिक्षा शेतकऱ्यांना दिली जाते. यामुळे सरकारी योजनांचा लाभ ग्रामीण भागातील छोट्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे कृषी धोरणे ही वांझोटी, निरूपयोगी ठरतात. 

 

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकारAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी