शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पर्रीकरांचं पार्थिव ठेवल्यानं कला अकादमीचं 'शुद्धीकरण'?; राज्यभरातून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 07:40 IST

जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी

पणजी: माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं पार्थिव ठेवण्यात आलेल्या कला अकादमीचं शुद्धीकरण करण्यात आल्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या या कृतीचा राज्यभरातून निषेध करण्यात आला आहे. ही कृती म्हणजे पर्रीकर यांच्या स्मृतीचा उपमर्द तर आहेच, इतकेच नव्हे तर राज्य सरकारचं कला आणि संस्कृती खातं धार्मिक विकृतीच्या आहारी जात असल्याच्या प्रतिक्रिया राज्यभरात उमटू लागल्या आहेत.मनोहर पर्रीकर यांचं 17 मार्चला निधन झालं. त्यांच्यावर 18 मार्चला शासकीय इमतामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी पणजीतील कला अकादमीत ठेवण्यात आलं होतं. या अकादमीचं शुद्धीकरण करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. काही ब्राह्मणांनी गोमूत्र शिंपडल्यानंतर संकुल 'पवित्र' झाल्याचं जाहीर केलं. यावेळी कला अकादमीचे सदस्य सचिव गुरुदास पिळर्णकर ब्राह्मणांसोबत होते. त्यांना याबद्दल विचारलं असता, त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. मात्र त्यांच्यासोबत असलेल्या कामत नामक कर्मचाऱ्यानं या प्रकाराचे आयोजन 'आम्ही' केलं आहे, असं उत्तर दिलं. 'आम्ही' म्हणजे कला अकादमीनं की कुणा व्यक्तीनं, असा प्रतिप्रश्न केला असता त्यांनी उत्तर न देता तेथून जाणं पसंत केलं. या संदर्भात कला अकादमीचे अध्यक्ष आणि कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितलं की, कला अकदमीत होम करण्यासाठी आपल्याकडे विचारणा करण्यात आली होती. मात्र नेमकं काय झालं याची कल्पना मला नाही. या घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याची माहिती गावडे यांनी दिली. या प्रकारावरुन राज्यभरातून प्रशासनावर टीका होत आहे. हाच न्याय लावायचा असेल, तर पुण्यातील साहित्य परिषद, टिळक स्मारक, एस. एम. जोशी सभागृह यांचं रोजच शुद्धीकरण करावं लागेल, अशी टिप्पणी पत्रकार चिंतामण पत्की यांनी केली. कला अकादमीचा प्रतिगामी आणि सनातनी चेहरा या प्रकारातून पुढे आला असून त्याला जबाबदार असलेल्यांवर त्वरित कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा