शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

सहा वर्षे पूर्ण, तरच पहिल्या वर्गात प्रवेश; केंद्राच्या परिपत्रकामुळे विद्यार्थी-पालक भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2024 07:57 IST

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने गोव्यासह सर्व राज्यांना जारी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये १ जूनपूर्वी वयाची ६ वर्षे पूर्ण करणाऱ्या मुलांनाच इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश देण्यात यावा, असा आदेश केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने गोव्यासह सर्व राज्यांना जारी केला आहे.

केंद्राच्या या परिपत्रकामुळे गोव्यात एकच गोंधळ उडाला असून गोव्यातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकही पेचात पडले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी ही टप्याटप्याने करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता आणि त्यानुसार नर्सरी विभागापासून बदल करण्यात येणार होता.

मागील शैक्षणिक वर्षापासून नर्सरीमध्ये वयाची ३ वर्षे पूर्ण केल्यानंतरच प्रवेश देण्यात आला होता. या क्रमाने २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात १ जूनपूर्वी ६ वर्षे पूर्ण झालेल्या मुलांनाच पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळणार होता, म्हणजे इयत्ता पहिली प्रवेशासाठी ६ वर्षे पूर्ण होणे सक्तीची करण्याची अंमलबजावणी ही पुढील दोन वर्षांनी होणार होती, केंद्राच्या परिपत्रकामुळे आता याच शैक्षणिक वर्षापासून करावी लागणार आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या या पत्रकाने पालकांमध्ये चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे. तसेच प्रशासनाही बुचकळ्यात पडले आहेत. या नियमानुसार आगामी शैक्षणिक वर्षात मुलांना प्रवेश द्यायचा का? याबाबत संभ्रम निर्माण झाला असून शिक्षण खात्याच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

अंमलबजावणी गोंधळाची

पहिलीच्या वर्गातील प्रवेशासंबंधीच्या केंद्राच्या परिपत्रकाची गोव्यात येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी केल्यास राज्यात गोंधळाची स्थिती निर्माण होईल. सहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर इयत्ता पहिली प्रवेश देणे म्हणजे एक वर्ष वाया घालविणे नव्हे तर विद्यार्थी परिपक्च बनण्यासाठी वेळ देणे ही तज्ज्ञांची मते खरी जरी असली तरी या धोरणाची अंमलबजावणी केल्यास ८० टक्क्याहून अधिक मुलांना एकाच वर्गात पुन्हा दुसऱ्या वर्षी बसावे लागणार आहे. त्यामुळे ते वर्ष विद्यार्थ्यांसाठी कंटाळवाणे ठरणार आहे. ही परिस्थिती ओळखूनच गोवा शिक्षण खात्याने नर्सरीपासून या धोरणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला होता.

कुणाचे कुठे चुकले?

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरु करण्याची सूचना गोवा सरकारला तीन वर्षापूर्वीच राज्य सरकारला करण्यात आली होती. त्यानुसार पूर्व प्राथमिक शिक्षण हे अधिकृत शिक्षण करण्यात आले होते आणि नर्सरी प्रवेश ३ वर्षे पूर्ण झाल्यावर देण्यास सांगण्यात आले होते. मात्र राज्य सरकारकडून त्याची अंमलबजावणी दोन वर्षे उशीरा सुरू केली. केंद्राने आता जारी केलेले परिपत्रक हे केंद्राच्या पहिल्या परिपत्रकाला अनुसरून सारखेच होते. पण गोव्यात अंमलबजावणीस विलंब केल्यामुळेच आता हा पेच प्रसंग निर्माण झाला आहे.

मुदत देण्यासाठी विनंती

केंद्र सरकारच्या परिपत्रकामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत गोव्यातील मुलाचे भवितव्य काय? असे विचारले असता शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी सांगितले की, पालकांनी व विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. गोव्यातील परिस्थिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला कळविण्यात आली आहे. त्यामुळेच या धोरणाची २०२६-२७ पासून अंमलबजावणी करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी विनंती केंद्राला केल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाSchoolशाळा