शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनंतर मंत्र्यांनीही सोडले सचिवालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 12:07 IST

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे त्यांच्या आजारपणामुळे मंत्रालय तथा सचिवालयात येऊ शकत नाहीत. मात्र त्यांच्या अनुपस्थितीमुळे प्रशासकीय कामाचा वेग एकदम कमी झाल्याने काही मंत्र्यांनी सचिवालयात येणेच बंद केले आहे.

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे त्यांच्या आजारपणामुळे मंत्रालय तथा सचिवालयात येऊ शकत नाहीत. मात्र त्यांच्या अनुपस्थितीमुळे प्रशासकीय कामाचा वेग एकदम कमी झाल्याने काही मंत्र्यांनी सचिवालयात येणेच बंद केले आहे. रोहन खंवटे, विजय सरदेसाई, विश्वजित राणे यांचे सचिवालय तथा मंत्रालयात येणे आता खूपच कमी झाले आहे. किंबहुना ते येतच नाहीत.

मंत्री खंवटे यांनी आपण प्रशासन ठप्प झाल्याचा व फाईल्स अधिकारी मंजूर करत नसल्याचा निषेध म्हणून मंत्रालयात येत नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र कृषी मंत्री विजय सरदेसाई हे देखील मंत्रालयात येतच नाहीत. सरदेसाई हे पूर्वी महिनाभर सचिवालय तथा मंत्रालयात आलेच नव्हते. चतुर्थीच्या काळात ते पुन्हा आले होते. पण नंतर त्यांनी मंत्रालयात येणे बंद केले. राज्य नियोजन मंडळाची बैठक घेण्यासाठी एकदा ते सचिवालयात आले होते. पत्रकारांनी नुकतेच मंत्री सरदेसाई यांना खंवटे यांच्याविषयी विचारले तेव्हा आम्ही तरी सचिवालयात कुठे येतो असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. अर्थात सरदेसाई यांनी मात्र कसलाच निषेध केलेला नाही ते सचिवालयात जास्त काम नसल्याने जास्त येत नाहीत.

आरोग्य मंत्री विश्वजित राणे हे पूर्वी दर बुधवारी सचिवालयात येत होते. कारण बुधवारी मंत्रिमंडळ बैठका व्हायच्या. तथापि, आता मुख्यमंत्रीही सचिवालयात पोहोचत नसल्याने आणि मंत्रिमंडळाच्या बैठकाही होत नसल्याने मंत्री राणे यांनीही सचिवालयात येणे थांबविले आहे. ते मिरामार येथील त्यांच्या निवासस्थानातून सगळे सरकारी काम करतात. सर्व फाईल्स तिथेच जातात व अधिका-यांच्या बैठकाही तिथेच होतात.

सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर, जलसंसाधन मंत्री विनोद पालयेकर, पर्यटन मंत्री बाबू आजगावकर व कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे हे नियमितपणो सचिवालयात जातात. यापैकी मंत्री साळगावकर हे न चुकता मंत्रलयात जात असतात. 

दरम्यान, भाजपाच्या प्रदेश कोअर टीमच्या सदस्यांनी नुकतीच महसूल मंत्री खंवटे यांची भेट घेतली व त्यांनी निषेध का पुकारला आहे हे जाणून घेतले. प्रशासन ठप्प झालेले असल्याचे खंवटे यांनी भाजपच्या कोअर टीमला सांगितले. मंत्र्यांना ज्या बदल्या हव्या असतात त्या देखील होत नाहीत हे खंवटे यांनी भाजपामसोर मांडले आहे.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवाBJPभाजपा