शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

राज्यात पुरेसा जलसाठा; पाणी टंचाई भासणार नाही, तिळारी कालवा दुरुस्ती कामांना प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 10:10 IST

महाराष्ट्र आणि गोव्याच्या तिळारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्यांच्या पुनरुज्जीवनासाठी खर्चास मान्यता देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्याच्या बाजूने तिळारी कालव्याचे काम सुरू झाले आहे. महाराष्ट्रातील काम अजून सुरू करायचे आहे. आमच्याकडे पुरेल इतके कच्चे पाणी आहे. त्यामुळे तिळारी कालवा बंद केल्याने टंचाई भासणार नाही, असे जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.

सुमारे ३० वर्षांच्या कालव्याच्या देखभाल व दुरुस्तीचे काम महाराष्ट्र सरकारने करण्याचा निर्णय घेतला होता. यावर्षी जूनमध्ये झालेल्या तिळारी आंतरराज्य धरण प्रकल्पाच्या नियंत्रण मंडळाच्या सहाव्या बैठकीत महाराष्ट्र आणि गोव्याच्या तिळारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्यांच्या पुनरुज्जीवनासाठी खर्चास मान्यता देण्यात आली.

या कालव्यांचे काम सुरू आहे म्हणून गोव्यात पाण्याची कमतरता भासणार नसून गोव्यात पाण्याचा खूप साठा आहे. इतर सर्व धरणे भरलेली आहेत. या कालवा दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर लवकरच पाणी सोडले जाणार असल्याचे जलस्त्रोत मंत्री शिरोडकर यांनी सांगितले. दरम्यान, यापूर्वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमुळे कालवा दुरुस्तीचे काम काही दिवस पुढे ढकलले होते.

माती परीक्षण सुरु

राज्यात सध्या तीन नवीन धरणांवर शिक्कामोर्तब झाले असून, आणखी ४ लहान धरणांच्या जागा तपासणीची निविदा पुढील पंधरा दिवसांत काढली जाणार आहे. असेही शिरोडकर यांनी सांगितले. गोव्यातील धारबांदोडा तालुक्यात काजूमळ, तातोडी, माणके अशा तीन ठिकाणी ही धरणे बांधण्यात येणार आहे. या धरणांसाठी माती परीक्षणाचे काम हाती घेतले आहे. तसेच सत्तरी भागात चरावणे तसेच अन्य काही ठिकाणी मिळून आणखी चार धरणे येणार आहेत. या धरणांची जागा तपासणीसाठी निविदा काढली जाणार आहे, असेही मंत्री शिरोडकर म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाDamधरण