शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पुरेसा जलसाठा; पाणी टंचाई भासणार नाही, तिळारी कालवा दुरुस्ती कामांना प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 10:10 IST

महाराष्ट्र आणि गोव्याच्या तिळारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्यांच्या पुनरुज्जीवनासाठी खर्चास मान्यता देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्याच्या बाजूने तिळारी कालव्याचे काम सुरू झाले आहे. महाराष्ट्रातील काम अजून सुरू करायचे आहे. आमच्याकडे पुरेल इतके कच्चे पाणी आहे. त्यामुळे तिळारी कालवा बंद केल्याने टंचाई भासणार नाही, असे जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.

सुमारे ३० वर्षांच्या कालव्याच्या देखभाल व दुरुस्तीचे काम महाराष्ट्र सरकारने करण्याचा निर्णय घेतला होता. यावर्षी जूनमध्ये झालेल्या तिळारी आंतरराज्य धरण प्रकल्पाच्या नियंत्रण मंडळाच्या सहाव्या बैठकीत महाराष्ट्र आणि गोव्याच्या तिळारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्यांच्या पुनरुज्जीवनासाठी खर्चास मान्यता देण्यात आली.

या कालव्यांचे काम सुरू आहे म्हणून गोव्यात पाण्याची कमतरता भासणार नसून गोव्यात पाण्याचा खूप साठा आहे. इतर सर्व धरणे भरलेली आहेत. या कालवा दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर लवकरच पाणी सोडले जाणार असल्याचे जलस्त्रोत मंत्री शिरोडकर यांनी सांगितले. दरम्यान, यापूर्वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमुळे कालवा दुरुस्तीचे काम काही दिवस पुढे ढकलले होते.

माती परीक्षण सुरु

राज्यात सध्या तीन नवीन धरणांवर शिक्कामोर्तब झाले असून, आणखी ४ लहान धरणांच्या जागा तपासणीची निविदा पुढील पंधरा दिवसांत काढली जाणार आहे. असेही शिरोडकर यांनी सांगितले. गोव्यातील धारबांदोडा तालुक्यात काजूमळ, तातोडी, माणके अशा तीन ठिकाणी ही धरणे बांधण्यात येणार आहे. या धरणांसाठी माती परीक्षणाचे काम हाती घेतले आहे. तसेच सत्तरी भागात चरावणे तसेच अन्य काही ठिकाणी मिळून आणखी चार धरणे येणार आहेत. या धरणांची जागा तपासणीसाठी निविदा काढली जाणार आहे, असेही मंत्री शिरोडकर म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाDamधरण