शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

राज्यात पुरेसा जलसाठा; पाणी टंचाई भासणार नाही, तिळारी कालवा दुरुस्ती कामांना प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 10:10 IST

महाराष्ट्र आणि गोव्याच्या तिळारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्यांच्या पुनरुज्जीवनासाठी खर्चास मान्यता देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्याच्या बाजूने तिळारी कालव्याचे काम सुरू झाले आहे. महाराष्ट्रातील काम अजून सुरू करायचे आहे. आमच्याकडे पुरेल इतके कच्चे पाणी आहे. त्यामुळे तिळारी कालवा बंद केल्याने टंचाई भासणार नाही, असे जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.

सुमारे ३० वर्षांच्या कालव्याच्या देखभाल व दुरुस्तीचे काम महाराष्ट्र सरकारने करण्याचा निर्णय घेतला होता. यावर्षी जूनमध्ये झालेल्या तिळारी आंतरराज्य धरण प्रकल्पाच्या नियंत्रण मंडळाच्या सहाव्या बैठकीत महाराष्ट्र आणि गोव्याच्या तिळारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्यांच्या पुनरुज्जीवनासाठी खर्चास मान्यता देण्यात आली.

या कालव्यांचे काम सुरू आहे म्हणून गोव्यात पाण्याची कमतरता भासणार नसून गोव्यात पाण्याचा खूप साठा आहे. इतर सर्व धरणे भरलेली आहेत. या कालवा दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर लवकरच पाणी सोडले जाणार असल्याचे जलस्त्रोत मंत्री शिरोडकर यांनी सांगितले. दरम्यान, यापूर्वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमुळे कालवा दुरुस्तीचे काम काही दिवस पुढे ढकलले होते.

माती परीक्षण सुरु

राज्यात सध्या तीन नवीन धरणांवर शिक्कामोर्तब झाले असून, आणखी ४ लहान धरणांच्या जागा तपासणीची निविदा पुढील पंधरा दिवसांत काढली जाणार आहे. असेही शिरोडकर यांनी सांगितले. गोव्यातील धारबांदोडा तालुक्यात काजूमळ, तातोडी, माणके अशा तीन ठिकाणी ही धरणे बांधण्यात येणार आहे. या धरणांसाठी माती परीक्षणाचे काम हाती घेतले आहे. तसेच सत्तरी भागात चरावणे तसेच अन्य काही ठिकाणी मिळून आणखी चार धरणे येणार आहेत. या धरणांची जागा तपासणीसाठी निविदा काढली जाणार आहे, असेही मंत्री शिरोडकर म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाDamधरण