शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

राज्यातील २५ हजार युवक-युवतींना देणार उद्योगांना पूरक प्रशिक्षण: राजीव चंद्रशेखर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 08:35 IST

तीन विश्वकर्मा प्रशिक्षण केंद्रे आणि बॅचेसचा मडगावातून शुभारंभ.

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : गोव्यातील २५ हजार युवक-युवतींना वर्षभरात उद्योगांना पूरक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यातून आरोग्य, कृषी, तंत्रज्ञान व इतर क्षेत्रांत रोजगाराच्या संधी निर्माण होतील. भविष्यात प्रत्येक युवकाजवळ कौशल्य असणे आवश्यक आहे. त्यासाठी युवकांनी जागतिक स्तरावरील कौशल्य प्राप्त करावे, असे आवाहन केंद्रीय कौशल्य विकासमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मडगाव रवींद्र भवन येथे केले.

प्रधानमंत्री विश्वकर्मा प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री चंद्रशेखर बोलत होते. यावेळी राज्यातील तीन विश्वकर्मा प्रशिक्षण केंद्रे व बॅचेसचा शुभारंभ व्हर्चुअल पद्धतीने करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा, मडगावचे आमदार दिगंबर कामत, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, कौशल्य विकास केंद्रीय सचिव दीपक तिवारी व प्रसाद लोलयेकर उपस्थित होते.

यावेळी राज्यातील कारागिरांचा गुरू सन्मान देऊन मंत्री चंद्रशेखर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पुढे बोलताना चंद्रशेखर म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था वाढत आहे. त्याचबरोबर अनेक संधी उपलब्ध होत आहेत. काम करणाऱ्या प्रत्येक युवकाला शिक्षण व कौशल्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सध्या जागतिक पाचव्या क्रमांकावर अर्थव्यवस्था असून, लवकरच ती तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, पंतप्रधान विश्वकर्मा प्रशिक्षण केंद्र देशात सर्वप्रथम सुरू करण्याचा मान गोव्याला प्राप्त झाला आहे. १८ प्रकारच्या व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाईल. यासाठी ३२ कंपन्यांजवळ करार करण्यात आला आहे. यापुढे नोकरीसाठी पदवी शिक्षण, असे होणार नाही. पदवी शिक्षण घेताना आयटीआय प्रशिक्षणही घेता येईल. मात्र, यापुढे सरकारी नोकरीसाठी अप्रेंटीशीप असणे बंधनकारक असेल. किमान एक वर्ष कामाचा अनुभव असल्याशिवाय नोकरी मिळणार नाही, ती शिपायाची असो व कारकुनाची असो, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.

कारागिरांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्यात आले आहे. तसेच प्रशिक्षण दिल्या नंतर टूल किट खरेदी करण्यासाठी १५ हजार रुपये व प्रशिक्षण खर्च अडीच हजार रुपये. त्यानंतर व्यवसायासाठी विनातारण कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात नारीशक्ती, युवाशक्त्ती, किसानशक्त्ती व गरीब कल्याण या तत्त्वावर सरकारचे काम सुरू आहे. हर घर जल, हर घर फायबर, हर घर वीज, हर घर शौचालय व हर घर कौशल्य देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.  

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण