शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

अपघात वाढले, यंत्रणा कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2024 12:51 IST

सरकारी यंत्रणा याबाबत कमी पडतेय हे मान्य करावे लागेल. 

राज्यात वाहन अपघातांचे प्रमाण एवढे वाढलेय की- एरव्ही शांत राहणारे समाजातील विविध लोक आता पोटतिडकीने बोलू लागले आहेत. रस्त्यांवर अपघातांत कोवळ्या जीवांचा बळी जात आहे. रस्त्यावर युवकांचे रक्त सांडत आहे. कधी रेन्ट अ कारगाड्या तर कधी भरधाव ट्रक तर कधी बसगाड्या अपघाताला कारण ठरत आहेत. दारूडे चालक तर सगळीकडेच दिसतात. अनेकदा रात्रीच्यावेळी दुचाकी चालवणे सर्वच शहरांत अत्यंत धोकादायक झाले आहे याविरुद्ध व्यापक आणि प्रभावी उपाययोजना व्हायला हवी; मात्र सरकारी यंत्रणा याबाबत कमी पडतेय हे मान्य करावे लागेल. 

लोकांचे जीव असे नाहक जात असले तरी, सत्ताधाऱ्यांकडून काही धावपळ केली जातेय असे दिसत नाही, फक्त काळ्या काचांच्या गाड्यांविरुद्धची मोहीम मात्र जोरात दिसतेय. अर्थात ती कारवाई सुरू ठेवायलाच हवी; मात्र सगळे वाहतूक पोलिस आणि आरटीओ यंत्रणेचा वापर सरकारने सध्या अपघातविरोधी उपायांसाठीच करायला हवा, केवळ महाराष्ट्र व कर्नाटकच्या गाड्या अडवून चालकांना तालांव ठोठावणे व सरकारी तिजोरी भरणे एवढेच वाहतूक पोलिसांचे काम असू नये. सर्व पोलिसांचा वापर वाहन अपघात रोखण्यासाठीच करायला हवा.

सार्वजनिक बांधकाम खात्याची यंत्रणाही निरुपयोगी ठरली आहे रस्त्यावरील स्पीड ब्रेकर्सना साधा रंगही काढला जात नाही, कधी तरी काढलेला रंग आता दिसत नाही, पांढरा रंग सातत्याने लावला तर चालकांना तो दिसेल तरी, बांधकाम खात्याचे अभियंते वारंवार फिल्डवर गेले तर त्यांना अपघातप्रवण क्षेत्र कळून येईल. अत्यंत धोकादायक वळणे आहेत, रस्त्यांच्या कडेने झाडे आहेत. अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे पर्यटक गोंधळतात आणि अचानक वाट्टेल तशी वाहने फिरवतात. 

बांधकाम खात्याची यंत्रणा सक्रिय झाली तर अनेक ठिकाणी अपघातविरोधी उपाययोजना करता येते. रस्त्याला एकदम टेकून असलेले क्रॉस आणि घुमट्यांचे स्थलांतर आतल्या बाजूला करावे लागेल. आजच्या काळात रस्त्यांना लागून अशी प्रार्थनास्थळे आता गरजेची नाहीत. भविष्यात वाहतुकीला त्यांचा अडथळा आणखी वाढणार आहे. रहदारी प्रचंड वाढतेय. कितीही उड्डाणपूल बांधले तरी, वाहनांची गर्दी कमी होणार नाही. प्रत्येक घरात दोन चारचाक्या आहेत. आताचा गोवा हा वेगळा गोवा आहे. येथे स्वतःच्या आणि दुसऱ्याच्याही जीवाची पर्वा नाही, अशी युवा पिढी तयार झाली आहे. बेदरकारपणे दुचाकी चालवणारे महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा नुकतेच नोकरीला लागलेले तरुण सगळीकडे दिसतात. 

दारू पिऊन ट्रक, टैंकर किंवा चारचाकी चालवणारे चालकही दुसऱ्याचा जीव घेत आहेत. मद्यपी चालकांविरुद्ध दोन महिन्यांपूर्वी पोलिस यंत्रणेने मोहीम उघडली होती. काही महिन्यांपूर्वी बाणस्तारी येथे एका धनिक कार चालकाने दारूच्या नशेत अपघात करून तिघांचा जीव घेतला. त्यावेळी राज्यात संतापाची लाट आली होती. सरकारी यंत्रणा त्यावेळी काही दिवस सक्रिय झाली होती. पुन्हा सगळे शांत झाले. दारुड्या चालकांविरुद्धचे अभियान कुठे गेले ? किती जणांचे परवाने निलंबित झाले, रद्द झाले, ते सरकारने जाहीर करावे, सरकारी यंत्रणेलाच निष्क्रियतेच्या नशेतून बाहेर काढण्याची वेळ आली आहे. आपल्याकडे सरकारी यंत्रणा फक्त राजकीय व्यवस्थेच्या सोयीसाठी कोट्यवधींच्या कामांची टेंडरे काढण्याबाबतच सक्रिय दिसते. बाकी लोक रस्त्यांवर मरतात किंवा जखमी होऊन पडतात, याचे कुणाला दुःख वाटत नाही.

वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी परवाच 'गोवा राज्य अपघातांची राजधानी झाले आहे,' असे विधान केले, जणू ते विरोधी पक्षात आहेत, अशा सुरात बोलले, महामार्ग व अन्य रस्ते खूप रुंद झाल्यामुळे लोक बेफाम वेगाने, बेपर्वाईने गाडी चालवतात, यावर गुदिन्हो यांनी बोट ठेवले. अर्थात हे खरे असले तरी, सरकारची यंत्रणा कुठे झोपा काढतेय, ते देखील गुदिन्हो यांनी सांगायला हवे. जानेवारी २०२४ ते २२ फेब्रुवारी २०२४ या एवढ्याशा कालावधीत एकूण ४५४ वाहन अपघात झाले. यात पन्नास जणांचा बळी गेला आहे. ५१ व्यक्तींना गंभीर दुखापत, तर १४२ व्यक्तींना किरकोळ जखमा झाल्या. अपघातांची मालिका रोखण्यासाठी गोव्यात एक मोठे जनआंदोलन उभे राहणे ही आता काळाजी गरज आहे.

 

टॅग्स :goaगोवाAccidentअपघात