शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

महाखाजन येथे दरड कोसळली; राष्ट्रीय महामार्ग ६६ वर वाढला धोका, सरकारच्या दुर्लक्षाबद्दल संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 09:56 IST

आणखी दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : धारगळ राष्ट्रीय महामार्ग ६६ वर रविवारी दरड कोसळण्याच्या घटनेची पुनरावृत्ती झाली. महामार्गावर गेल्या दोन दिवसांपासून मालपे बायपासजवळ दरड कोसळण्याची ताजी घटना आज घडली. गेल्यावर्षी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरड कोसळून एकेरी मार्ग बंद झाला होता, त्याच जागी पुन्हा दरड कोसळली. या परिसरात कंत्राटदाराने बॅरल आडवे लावून तेथे पट्ट्या लावल्या आहेत. आणखी दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राष्ट्रीय महामार्ग ६६ वर सुरू असलेल्या कामाबद्दल प्रचंड तक्रारी आहेत. कंत्राटदाराच्या मनमानी कारभाराचा फटका बसत असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. गेल्यावर्षी महाखाजन परिसरात दरड कोसळून एकेरी मार्ग पूर्णपणे बंद झाला होता. त्यामुळे सलग दीड ते दोन महिने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले होते. त्यावर उपाययोजना करण्यासाठी तब्बल वर्ष लागले.

गेल्यावर्षी कंत्राटदाराने महाखाजन येथे रस्त्यालगतचा डोंगर सरळ उभ्या रेषेत कापला होता. तो कर्व्ह पद्धतीने कापला असता तर दरड कोसळण्याची घटना घडली नसती, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. महाखाजन येथे आता दुसऱ्यांदा दरड कोसळली आहे. त्या भागातील अर्धा अधिक डोंगर कोसळण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रस्ता रुंदीकरणासाठी जेवढी जागा संपादित केली होती, तेवढाच डोंगर कापण्यात आला. आता अतिरिक्त डोंगर कापायचा असल्यास जमीन मालकाची परवानगी आवश्यक आहे. जर डोंगर शास्त्रीय पद्धतीने कापला नाही, तर केव्हाही डोंगराचा अर्धा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते. रात्रीच्या वेळी अचानक भर पावसात दरड कोसळली आणि वाहने ये-जा करीत असली तर लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो. डोंगरावर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाची साठवण टाकी आहे. या टाकीलाही धोका संभवत आहे. यावर त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे. 

गेल्यावर्षी दरड कोसळलेल्या ठिकाणी स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर आणि सार्वजनिक बांधकाम खाते, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन कंत्राटराला सूचना केल्या होत्या. त्याचे काय झाले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मालपे बायपासजवळ ज्या पद्धतीने दरड कोसळते, त्याच पद्धतीने महाखाजन येथे दरड कोसळत आहे. सरकारने वर्षभर कोणतीच उपाययोजना केलेली नाही. त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक रोहिदास हरमलकर यांनी केली आहे.

 

टॅग्स :goaगोवाmonsoonमोसमी पाऊसRainपाऊस