शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

आयोगामार्फत पहिल्या टप्प्यात ७०० पदे भरणार! मुख्यमंत्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 15:21 IST

एक वर्षाचा पूर्वानुभव, अप्रेंटीस म्हणून काम अनिवार्य

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: कर्मचारी निवड आयोगाकडून ३१ डिसेंबरपर्यंत येणाऱ्या पहिल्या जाहिरातीद्वारे तब्बल ७०० पदांसाठी अर्ज मागवले जातील. शिपाई व इतर मल्टिटास्किंग, लिपिक तसेच अन्य 'क' श्रेणी पदांसाठी या जाहिराती असतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 'लोकमत'ला दिली.

शुक्रवारी दूरदर्शनवर झालेल्या 'फोन इन' कार्यक्रमात सावंत यांनी यासंबंधी उल्लेख केला होता. पहिल्या टप्प्यात नेमकी किती पदे असतील याबाबत जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वरील माहिती दिली. विविध सरकारी खात्यांकडून आयोगाने 'क' श्रेणीतील रिक्त जागांची माहिती मागवली. त्यानुसार पहिल्या टप्यात ७०० पदे भरली जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

२९ नोव्हेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारी सेवेत १५ वर्षे तसेच वयाची ४५ वर्षे पूर्ण केलेल्या शिपाई, कनिष्ठ लिपिक, अव्वल कारकून तसेच शाळांमधील शिक्षक, प्रयोगशाळा सहायक, टेक्निशियन तसेच पोलिस दलात कॉन्स्टेबलपासून उपनिरीक्षकांपर्यंत सर्व 'क' श्रेणी कर्मचाऱ्यांना सरकारने स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली आहे.

भविष्यात काही कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊन स्वेच्छा निवृत्ती घेतील तेव्हा आणखी पदे रिक्त होतील. तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. विविध प्रकल्पांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे राज्यात अनेक प्रकल्पांच्या उभारणीचे काम सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

हा आहे आयोग!

राज्य कर्मचारी निवड आयोगावर सरकारने तीन आयएएस अधिकारी नियुक्त केले आहेत. अध्यक्ष आयएएस डॉ. व्ही. कांडावेलू हे आहेत. शिवाय निवृत्त आयएएस अधिकारी दौलत हवालदार व आयएएस अधिकारी मिनीन डिसोझा हे आयोगाचे सदस्य आहेत.

आता तयारी करा सीबीआरटी परीक्षेची!

भरती करण्यासाठी गोवा राज्य कर्मचारी निवड आयोग स्थापन होऊन त्याचे प्रत्यक्षात कामही सुरू झाले आहे. उमेदवारांची सीबीआरटी अर्थात थेट संगणकीय पद्धतीनेच परीक्षा घेतली जाईल आणि गोवा लोकसेवा आयोगाप्रमाणे काही तासांतच निकाल जाहीर करण्यात येईल. विचारलेल्या प्रश्नांना उत्तराचे पर्याय दिले जातात. अचूक उत्तरासाठी केवळ टीकमार्क करायचे असते. निर्णयक्षमता असावी लागते. या परीक्षेमुळे निवड प्रक्रियेत पारदर्शकता येईल, अशी अपेक्षा आहे. सरकारी खात्यातील भरती प्रक्रिया जास्तीत जास्त पारदर्शी होण्यासाठी कर्मचारी निवड आयोग काम करणार आहे.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत