शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

७० हजार गोंयकारांनी सोडले भारतीय नागरिकत्व; पासपोर्ट कार्यालयाने दिलेल्या माहितीतून सत्य समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 09:54 IST

गोमंतकीयांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : २०११ ते २०२२ या ११ वर्षांच्या काळात ६९,३०३ गोमंतकीयांनी भारताचे नागरिकत्व सोडले असल्याची माहिती गोवा पासपोर्ट कार्यालयातील सूत्रांकडून देण्यात आली.

नोकरी, व्यवसायासाठी देशाचे नागरिकत्व सोडून जाणाऱ्यांचे प्रमाण वाढतच आहे. मागील ११ वर्षांत सुमारे १६.२१ लाख भारतीयांनी देशाचे नागरिकत्व सोडले. त्यांचे पासपोर्ट देशभरातील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयांमध्ये जमा केले आहेत. नागरिकता सोडणाऱ्यात आठ राज्यांचे प्रमाण अधिक आहे आणि त्यातही गोमंतकीयांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

जमा केलेल्या ६९.३०३ पासपोर्टपैकी ४०.४५ टक्के पासपोर्ट गोव्यातील आरपीओमध्ये आत्मसमर्पण करण्यात आले होते, असे परराष्ट्र मंत्रालयाने माहितीच्या अधिकाराच्या (आरटीआय) अर्जाच्या उत्तरात सामायिक केलेली आकडेवारी उघड करते.

एकूण नागरिकता सोडणाऱ्यात ९० टक्के लोक हे गोवा, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र. केरळ, तामिळनाडू, दिल्ली आणि चंदीगड येथील आहेत. त्यातही ६९.३०३ म्हणजेच ४०.४५ टक्के गोव्यातील लोक आहेत. देश सोडणाऱ्याा गोव्यातील लोकांत पोर्तुगालचे नागरिकत्व स्वीकारणारे सर्वाधिक आहेत. तसेच इंग्लंडचे नागरिकत्व घेतलेलेही आहेत.

१६.२१ लाख लोकांनी नागरिकत्व सोडले

२०११ पासून आरपीओमध्ये आत्मसमर्पण केलेले ६९,३०३ पासपोर्ट, या कालावधीत सोडण्यात आलेल्या भारतीय नागरिकत्वाचा केवळ एक अंश आहे. २०११ ते ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत १६.२१ लाखांहून अधिक भारतीयांनी त्यांचे नागरिकत्व सोडल्याची माहितीही यावेळी देण्यात आली

 

टॅग्स :goaगोवा