शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

साळ येथे शापोरा नदीवर ३५० कोटींचा बंधारा; ७५ लाख क्युबिक मीटर पाणी साठवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2024 07:28 IST

हा बंधारा पूर्ण झाल्यानंतर बार्देश व डिचोली तालुक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याचा दावा केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : साळ येथील शापोरा नदीवर ३५० कोटी रुपये खर्चुन तब्बल ७५ लाख क्युबिक मीटर पाणी साठवता येईल अशा मोठ्या बंधाऱ्याचे काम सध्या सुरू आहे. हा बंधारा पूर्ण झाल्यानंतर बार्देश व डिचोली तालुक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याचा दावा केला जात आहे.

जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी ही माहिती दिली. राज्यातील सहा धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याचा दावा करून मान्सून लांबणीवर पडला तरी जून-जुलैपर्यंत पाण्याची समस्या उद्भवणार नाही, असा दावा त्यांनी केला.

संपूर्ण दक्षिण गोव्याला पाणी पुरवणारे साळावली धरण ५२ टक्के भरलेले आहे. सत्तरी, डिचोली व बार्देश तालुक्याला पाणी पुरवणारे आमठाणे धरण ४० टक्के भरलेले आहे. अंजुणे ४६ टक्के, चापोली ६१ टक्के, पंचवाडी ४२ टक्के तर गावणे धरण ५७ टक्के भरलेले आहे. तर तिळारी धरण ९४ टक्के भरलेले आहे.

 

टॅग्स :goaगोवाWaterपाणी