शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

२०० तिळारी धरणग्रस्तांना सनदा मिळणार; साळ येथील कार्यक्रमात वितरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 11:48 IST

तिळारी धरण प्रकल्प हा गोवा व महाराष्ट्राचा संयुक्त प्रकल्प आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : तिळारी धरणामुळे स्थलांतरित झालेल्या व सध्या साळ पुनर्वसन कॉलनीत पुनर्वसन करण्यात आलेल्या २०० धरणग्रस्तांना सरकार रीतसर सनद देणार असल्याची माहिती आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी दिली. 

साळ पुनर्वसन कॉलनीतील दत्तात्रय देवस्थान सभागृहात शुक्रवार, २७ रोजी दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास जलसंपदामंत्री सुभाष शिरोडकर, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये जिल्हाधिकारी स्नेहा गिते, किशोर तावडे, राजाराम परब, प्रदीप रेवोडकार, सावित्री घाडी व पंच सदस्य उपस्थित असतील.

तिळारी धरण प्रकल्प हा गोवा व महाराष्ट्राचा संयुक्त प्रकल्प आहे. १९८० साली तो सुरू झाला. तिळारी नदीवर धरण उभारणीमुळे महाराष्ट्रातील दोडामार्ग तालुक्यातील पाल, सर्गाणे, शिरंगे, आयनोडे, पाटये, केंद्र खुर्द, केंद्र बुद्रुक, तेरवण मेढे, कोनाल ( भारडोगरवाडी) ही नऊ गावे पाण्याखाली गेली. धरणाचा तब्बल १११० कुटुंबांना फटका बसला. त्यातील दोनशे कुटुंबांचे साळ येथे तर उर्वरित ९१० कुटुंबांचे महाराष्ट्रात पुनर्वसन केले गेले.

नोकरीच्या बदल्यात धरणग्रस्तांना पाच लाख एकरकमी निधी देण्याचे ठरले. त्यातील ९४७ कुटुंबांना रोख रकम देताना ७७.३० टक्के वाटा गोवा सरकारचा तर २६.७० टक्के महाराष्ट्र सरकार मिळून आतापर्यंत ७०५ कुटूंबाना आर्थिक भरपाई दिली आहे. ऑगस्ट २०२२ रोजी सरकारतर्फे पार्टिशन प्रक्रिया दोन्ही सर्व्हेमध्ये सुरु करण्यात आली. आज सर्व २०० कुटुंबांतील लोकांना उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांतर्फे सनद मंजूर केल्याची माहिती आमदार शेट्ये यांनी दिली.

१६३ जण सरकारी सेवेत

साळ येथे २०० धरणग्रस्तांना सर्व्हे क्रमांक १३० व १३१ मध्ये २०.५८ हेक्टर जागा उपलब्ध करण्यात आली आहे. ही जागा १९९३ पासून जलसंपदा खात्याकडे होती. त्यानंतर या ठिकाणी दोनशेपैकी १२५ कुटुंबे वास्तव्यास होती. धरणग्रस्तांना सरकारी नोकरीत प्राधान्य देण्याचा प्रयत्न होता. त्यानुसार १६३ जणांना नोकरी देण्यात आली. त्यानंतर गोवा व महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांची संयुक्त बैठक ऑगस्ट २०१४ मध्ये झाली.

 

टॅग्स :goaगोवा