शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
5
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
6
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
7
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
8
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
9
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
10
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
11
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
12
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
13
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
14
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
15
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
16
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
17
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
18
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
19
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
20
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले

२०० तिळारी धरणग्रस्तांना सनदा मिळणार; साळ येथील कार्यक्रमात वितरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 11:48 IST

तिळारी धरण प्रकल्प हा गोवा व महाराष्ट्राचा संयुक्त प्रकल्प आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : तिळारी धरणामुळे स्थलांतरित झालेल्या व सध्या साळ पुनर्वसन कॉलनीत पुनर्वसन करण्यात आलेल्या २०० धरणग्रस्तांना सरकार रीतसर सनद देणार असल्याची माहिती आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी दिली. 

साळ पुनर्वसन कॉलनीतील दत्तात्रय देवस्थान सभागृहात शुक्रवार, २७ रोजी दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास जलसंपदामंत्री सुभाष शिरोडकर, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये जिल्हाधिकारी स्नेहा गिते, किशोर तावडे, राजाराम परब, प्रदीप रेवोडकार, सावित्री घाडी व पंच सदस्य उपस्थित असतील.

तिळारी धरण प्रकल्प हा गोवा व महाराष्ट्राचा संयुक्त प्रकल्प आहे. १९८० साली तो सुरू झाला. तिळारी नदीवर धरण उभारणीमुळे महाराष्ट्रातील दोडामार्ग तालुक्यातील पाल, सर्गाणे, शिरंगे, आयनोडे, पाटये, केंद्र खुर्द, केंद्र बुद्रुक, तेरवण मेढे, कोनाल ( भारडोगरवाडी) ही नऊ गावे पाण्याखाली गेली. धरणाचा तब्बल १११० कुटुंबांना फटका बसला. त्यातील दोनशे कुटुंबांचे साळ येथे तर उर्वरित ९१० कुटुंबांचे महाराष्ट्रात पुनर्वसन केले गेले.

नोकरीच्या बदल्यात धरणग्रस्तांना पाच लाख एकरकमी निधी देण्याचे ठरले. त्यातील ९४७ कुटुंबांना रोख रकम देताना ७७.३० टक्के वाटा गोवा सरकारचा तर २६.७० टक्के महाराष्ट्र सरकार मिळून आतापर्यंत ७०५ कुटूंबाना आर्थिक भरपाई दिली आहे. ऑगस्ट २०२२ रोजी सरकारतर्फे पार्टिशन प्रक्रिया दोन्ही सर्व्हेमध्ये सुरु करण्यात आली. आज सर्व २०० कुटुंबांतील लोकांना उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांतर्फे सनद मंजूर केल्याची माहिती आमदार शेट्ये यांनी दिली.

१६३ जण सरकारी सेवेत

साळ येथे २०० धरणग्रस्तांना सर्व्हे क्रमांक १३० व १३१ मध्ये २०.५८ हेक्टर जागा उपलब्ध करण्यात आली आहे. ही जागा १९९३ पासून जलसंपदा खात्याकडे होती. त्यानंतर या ठिकाणी दोनशेपैकी १२५ कुटुंबे वास्तव्यास होती. धरणग्रस्तांना सरकारी नोकरीत प्राधान्य देण्याचा प्रयत्न होता. त्यानुसार १६३ जणांना नोकरी देण्यात आली. त्यानंतर गोवा व महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांची संयुक्त बैठक ऑगस्ट २०१४ मध्ये झाली.

 

टॅग्स :goaगोवा