शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

२०० तिळारी धरणग्रस्तांना सनदा मिळणार; साळ येथील कार्यक्रमात वितरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 11:48 IST

तिळारी धरण प्रकल्प हा गोवा व महाराष्ट्राचा संयुक्त प्रकल्प आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : तिळारी धरणामुळे स्थलांतरित झालेल्या व सध्या साळ पुनर्वसन कॉलनीत पुनर्वसन करण्यात आलेल्या २०० धरणग्रस्तांना सरकार रीतसर सनद देणार असल्याची माहिती आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी दिली. 

साळ पुनर्वसन कॉलनीतील दत्तात्रय देवस्थान सभागृहात शुक्रवार, २७ रोजी दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास जलसंपदामंत्री सुभाष शिरोडकर, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये जिल्हाधिकारी स्नेहा गिते, किशोर तावडे, राजाराम परब, प्रदीप रेवोडकार, सावित्री घाडी व पंच सदस्य उपस्थित असतील.

तिळारी धरण प्रकल्प हा गोवा व महाराष्ट्राचा संयुक्त प्रकल्प आहे. १९८० साली तो सुरू झाला. तिळारी नदीवर धरण उभारणीमुळे महाराष्ट्रातील दोडामार्ग तालुक्यातील पाल, सर्गाणे, शिरंगे, आयनोडे, पाटये, केंद्र खुर्द, केंद्र बुद्रुक, तेरवण मेढे, कोनाल ( भारडोगरवाडी) ही नऊ गावे पाण्याखाली गेली. धरणाचा तब्बल १११० कुटुंबांना फटका बसला. त्यातील दोनशे कुटुंबांचे साळ येथे तर उर्वरित ९१० कुटुंबांचे महाराष्ट्रात पुनर्वसन केले गेले.

नोकरीच्या बदल्यात धरणग्रस्तांना पाच लाख एकरकमी निधी देण्याचे ठरले. त्यातील ९४७ कुटुंबांना रोख रकम देताना ७७.३० टक्के वाटा गोवा सरकारचा तर २६.७० टक्के महाराष्ट्र सरकार मिळून आतापर्यंत ७०५ कुटूंबाना आर्थिक भरपाई दिली आहे. ऑगस्ट २०२२ रोजी सरकारतर्फे पार्टिशन प्रक्रिया दोन्ही सर्व्हेमध्ये सुरु करण्यात आली. आज सर्व २०० कुटुंबांतील लोकांना उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांतर्फे सनद मंजूर केल्याची माहिती आमदार शेट्ये यांनी दिली.

१६३ जण सरकारी सेवेत

साळ येथे २०० धरणग्रस्तांना सर्व्हे क्रमांक १३० व १३१ मध्ये २०.५८ हेक्टर जागा उपलब्ध करण्यात आली आहे. ही जागा १९९३ पासून जलसंपदा खात्याकडे होती. त्यानंतर या ठिकाणी दोनशेपैकी १२५ कुटुंबे वास्तव्यास होती. धरणग्रस्तांना सरकारी नोकरीत प्राधान्य देण्याचा प्रयत्न होता. त्यानुसार १६३ जणांना नोकरी देण्यात आली. त्यानंतर गोवा व महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांची संयुक्त बैठक ऑगस्ट २०१४ मध्ये झाली.

 

टॅग्स :goaगोवा