शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

गोव्यातील किनाऱ्यांवरुन सोळा महिन्यांच्या काळात उचलला २0 लाख किलो कचरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 19:15 IST

गोव्यातील किनाऱ्यांवरुन गेल्या सोळा महिन्यांच्या काळात तब्बल २0 लाख किलो कचरा उचलण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

पणजी : गोव्यातील किनाऱ्यांवरुन गेल्या सोळा महिन्यांच्या काळात तब्बल २0 लाख किलो कचरा उचलण्यात आल्याचा दावा केला जात आहे. गेल्या जानेवारीपासून कचऱ्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. किनाऱ्यांवरील कचरा उचलण्याचे काम दृष्टी लाइफ सेविंग कंपनीकडे दिले असून या कपंनीने या सेवेचे १६ महिने पूर्ण केले. किनाऱ्यांवर जीवरक्षकाचे काम करणाऱ्या या कंपनीला १७ डिसेंबर २0१६ रोजी कचरा उचलण्याचे काम दिले होते. किनाऱ्यांवर येणाऱ्या पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात कचऱ्याची निर्मिती होते. १७ डिसेंबर २0१६ ते १५ एप्रिल २0१८ या कालावधीत १९ लाख ९0 हजार २५0 किलो कचरा उचलल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शंकर यांनी सांगितले. गेल्या तीन महिन्यांच्या काळातच तब्बल १ लाख ८९ हजार ९६८ किलो कचरा गोळा करण्यात आला. गेल्या वर्षी याच तीन महिन्यांच्या काळात २ लाख ६७ हजार ४७ किलो कचरा गोळा करण्यात आला होता. या वर्षी पहिल्या तिमाहीत तिपटीने कचरा वाढल्याचे स्पष्ट होते. एका प्रश्नावर शंकर म्हणाले की, शॅकमालक आता कचऱ्याच्या बाबतीत गांभीर्य दाखवून सहकार्य करु लागले आहेत. गेला काही काळ ओला आणि सुका कचरा वेगळा काढण्याबाबत त्यांना मार्गदर्शनही करण्यात आले. कचरा वाढण्याचे दुसरे एक कारण म्हणजे समुद्राच्या भरतीच्यावेळी समुद्रातून वाहत आलेला कचरा किनाऱ्याला लागतो. खराब हवामानाच्या काळात हा प्रकार सर्रास दिसून येतो. 

कचऱ्याबाबत खाते गंभीरच : बाबू आजगांवकर पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर म्हणाले की, गेले वर्षभर कंपनीच्या कामावर आम्ही बारकारईने नजर ठेवून आहोत. कचरा उचलण्याच्या कामात कोणतीही कसूर ठेवता कामा नये, असा इशारा वेळोवेळी आम्ही दिलेला आहे त्यामुळे कामही चांगल्या पध्दतीने चालले आहे. देश, विदेशातून येणाºया पर्यटकांना किनारे स्वच्छ मिळायला हवेत, ही आमची भूमिका आहे. कोठेही कचरा दिसल्यास फोटो काढून वॉटसअपवर पाठवल्यास २४ तासांच्या आत कारवाई केली जाते. त्यामुळे लोकांनीही सहकार्य करायला हवे.