शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

गोव्यातील किनाऱ्यांवरुन सोळा महिन्यांच्या काळात उचलला २0 लाख किलो कचरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 19:15 IST

गोव्यातील किनाऱ्यांवरुन गेल्या सोळा महिन्यांच्या काळात तब्बल २0 लाख किलो कचरा उचलण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

पणजी : गोव्यातील किनाऱ्यांवरुन गेल्या सोळा महिन्यांच्या काळात तब्बल २0 लाख किलो कचरा उचलण्यात आल्याचा दावा केला जात आहे. गेल्या जानेवारीपासून कचऱ्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. किनाऱ्यांवरील कचरा उचलण्याचे काम दृष्टी लाइफ सेविंग कंपनीकडे दिले असून या कपंनीने या सेवेचे १६ महिने पूर्ण केले. किनाऱ्यांवर जीवरक्षकाचे काम करणाऱ्या या कंपनीला १७ डिसेंबर २0१६ रोजी कचरा उचलण्याचे काम दिले होते. किनाऱ्यांवर येणाऱ्या पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात कचऱ्याची निर्मिती होते. १७ डिसेंबर २0१६ ते १५ एप्रिल २0१८ या कालावधीत १९ लाख ९0 हजार २५0 किलो कचरा उचलल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शंकर यांनी सांगितले. गेल्या तीन महिन्यांच्या काळातच तब्बल १ लाख ८९ हजार ९६८ किलो कचरा गोळा करण्यात आला. गेल्या वर्षी याच तीन महिन्यांच्या काळात २ लाख ६७ हजार ४७ किलो कचरा गोळा करण्यात आला होता. या वर्षी पहिल्या तिमाहीत तिपटीने कचरा वाढल्याचे स्पष्ट होते. एका प्रश्नावर शंकर म्हणाले की, शॅकमालक आता कचऱ्याच्या बाबतीत गांभीर्य दाखवून सहकार्य करु लागले आहेत. गेला काही काळ ओला आणि सुका कचरा वेगळा काढण्याबाबत त्यांना मार्गदर्शनही करण्यात आले. कचरा वाढण्याचे दुसरे एक कारण म्हणजे समुद्राच्या भरतीच्यावेळी समुद्रातून वाहत आलेला कचरा किनाऱ्याला लागतो. खराब हवामानाच्या काळात हा प्रकार सर्रास दिसून येतो. 

कचऱ्याबाबत खाते गंभीरच : बाबू आजगांवकर पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर म्हणाले की, गेले वर्षभर कंपनीच्या कामावर आम्ही बारकारईने नजर ठेवून आहोत. कचरा उचलण्याच्या कामात कोणतीही कसूर ठेवता कामा नये, असा इशारा वेळोवेळी आम्ही दिलेला आहे त्यामुळे कामही चांगल्या पध्दतीने चालले आहे. देश, विदेशातून येणाºया पर्यटकांना किनारे स्वच्छ मिळायला हवेत, ही आमची भूमिका आहे. कोठेही कचरा दिसल्यास फोटो काढून वॉटसअपवर पाठवल्यास २४ तासांच्या आत कारवाई केली जाते. त्यामुळे लोकांनीही सहकार्य करायला हवे.