शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

७२ योजनांसाठी २ हजार कोटींचे प्रस्ताव; लिलाव केलेल्या खाणी सुरु करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 12:54 IST

गांधीनगर, गुजरात येथे आयोजित पश्चिम विभागीय परिषदेच्या बैठकीवेळी ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजीः केंद्र पुरस्कृत विविध योजनांतर्गत राज्यासाठी अधिकाधिक निधी आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. २ हजार १९६ कोटी ६५ लाख रुपयांच्या ७२ योजनांशी संबंधित प्रस्ताव केंद्र सरकारने विविध मंत्रालयांना सादर केले आहेत. तसेच राज्यातील लिलाव केलेल्या खाणी लवकर कार्यान्वित करण्याबाबत केंद्राशी चर्चा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

गांधीनगर, गुजरात येथे आयोजित पश्चिम विभागीय परिषदेच्या बैठकीवेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री तथा पश्चिम विभागीय परिषदेचे अध्यक्ष अमित शाह, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दमण, दीव आणि दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक प्रफुल्ल पटेल व अन्य मान्यवर उपस्थित होते. 

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, पोर्तुगिजांच्या तावडीतून गोवा मुक्त होऊन ६१ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात गोव्याने अर्थव्यवस्थेच्या अनेक क्षेत्रांमध्ये वाढ अनुभवली आहे. गोवा सरकार हे अंत्योदय, ग्रामोदय आणि सर्वोदय तत्त्वांवर कार्य करीत आहे. समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत योजना पोहोचाव्यात, कुणीही वंचित राहू नये, शाश्वत विकास हेच राज्याचे ध्येय आहे.

केंद्र सरकारचे पाठबळ मिळेल

केंद्र सरकारच्या पाठिंब्यांशिवाय राज्याची प्रगती साधणे अशक्य आहे. गोवा हे लहान राज्य असले तरी केंद्राने गोव्याला नेहमीच सहकार्य केले आहे. यासाठी गोव्याची जनता कृतज्ञ आहे. गोव्याने आपल्या सर विकासाचे ध्येय ठेवले असून त्यासाठी राज्याला, केंद्रीय मंत्रालयांकडून पाठबळ आवश्यक असून ते मिळेल, याची खात्री असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत