शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
2
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
3
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
4
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
5
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
6
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
7
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
8
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
9
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले
10
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! आतापर्यंत ११,६०० रुपये स्वस्त; आता खरेदी करावे की वाट पाहावी?
11
धावत्या ट्रेनमध्ये तरुणावर हल्ला; तब्बल ५४ वेळा चाकूने वार! वादाचं कारण ऐकून बसेल धक्का
12
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
13
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
14
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
16
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
17
Paytm, Gpay, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
18
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
19
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
20
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या

'लाडली लक्ष्मी', 'गृहआधार'चे १७,४६५ अर्ज प्रलंबित; ३ वर्षांहून अधिक काळ गरजवंतांना प्रतीक्षा

By किशोर कुबल | Updated: October 24, 2024 07:20 IST

महिला बालकल्याण खात्याच्या सार्वजनिक माहिती अधिकारी कृतिका नाईक यांच्याकडून 'लोकमत'ला आरटीआय अर्जातून ही माहिती मिळाली आहे.

किशोर कुबल, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'लाडली लक्ष्मी' व 'गृहआधार' योजनांसाठी मिळून तब्बल १७,४६५ अर्ज गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असल्याची माहिती आरटीआय अर्जातून मिळालेल्या उत्तरातून पुढे आली आहे. सरकार एकीकडे कल्याणकारी योजनांचा डंका पिटत असताना, दुसरीकडे गरजवंतांची फरपट होत असल्याची स्थिती आहे. १४,००९ लाडली लक्ष्मी व ३,४५६ गृहिणी आपले अर्ज कधी मंजूर होतात या प्रतीक्षेत आहेत. त्यासाठी कार्यालयात हेलपाटेही मारत आहेत.

महिला बालकल्याण खात्याच्या सार्वजनिक माहिती अधिकारी कृतिका नाईक यांच्याकडून 'लोकमत'ला आरटीआय अर्जातून ही माहिती मिळाली आहे.

गृहआधार - विधवांबाबत योजनेची घोषणा; पण अंमलबजावणी नाही 

दरम्यान, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात एक घोषणा केली होती की, गृहआधारचा लाभ घेणाऱ्या गृहिणींचा कुंकवाचा आधार गेल्यास त्यांना गृहआधारचे १५०० व विधवांना समाज कल्याण खात्याच्या योजनेतून मिळणारे २५०० मिळून चार हजार रुपये दिले जातील. त्यासाठी एकच योजना असेल. परंतु याची अजून कार्यवाही झालेली नाही, असेही उघड झाले आहे.

गृहआधारचे केपेत सर्वाधिक, दाबोळीत किमान अर्ज 

गेल्या आर्थिक वर्षातील अर्ज मंजुरीची आकडेवारी नजरेखाली घातली असता 'गृहआधार'चे सर्वांत जास्त ३९२ अर्ज काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांच्या केपे मतदारसंघात मंजूर झालेले आहेत, तर सर्वांत कमी ४५ अर्ज मंत्री माविन गुदिन्हो यांच्या दाबोळी मतदारसंघात मंजूर झालेले आहेत.

फोंड्यात सर्वाधिक, ताळगावात कमी अर्ज 

दुसरीकडे 'लाडली लक्ष्मी'चे सर्वाधिक २३७ अर्ज कृषिमंत्री रवी नाईक यांच्या फोंडा मतदारसंघात मंजूर झालेले आहेत, तर सर्वांत कमी ६७ अर्ज आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या ताळगाव मतदारसंघात मंजूर झालेले आहेत.

विजय सरदेसाईंची सरकारवर टीका 

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले की, गृहआधार असो किंवा दयानंद सामाजिक सुरक्षा योजना, लाभार्थीच्या बँक खात्यांमध्ये महिन्याच्या पहिल्या पाच दिवसात पैसे जमा व्हायला हवेत. पर्रीकर मुख्यमंत्री असताना कल्याणकारी योजनांच्या बाबतीत त्यांचा नेहमीच हा कटाक्ष असायचा. गरजूंचे अर्ज मंजूर होत नाहीत आणि मंजूर झाले तर लाभार्थीना वेळेवर पैसे मिळत नाहीत, ही शोकांतिका आहे. सरकार इव्हेंटवर वायफळ खर्च करीत आहे. परंतु गरजूंचे अर्ज मात्र मंजूर न करता प्रलंबित ठेवले जात आहेत.'

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणState Governmentराज्य सरकारRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ताLokmatलोकमत