शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

'लाडली लक्ष्मी', 'गृहआधार'चे १७,४६५ अर्ज प्रलंबित; ३ वर्षांहून अधिक काळ गरजवंतांना प्रतीक्षा

By किशोर कुबल | Updated: October 24, 2024 07:20 IST

महिला बालकल्याण खात्याच्या सार्वजनिक माहिती अधिकारी कृतिका नाईक यांच्याकडून 'लोकमत'ला आरटीआय अर्जातून ही माहिती मिळाली आहे.

किशोर कुबल, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'लाडली लक्ष्मी' व 'गृहआधार' योजनांसाठी मिळून तब्बल १७,४६५ अर्ज गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असल्याची माहिती आरटीआय अर्जातून मिळालेल्या उत्तरातून पुढे आली आहे. सरकार एकीकडे कल्याणकारी योजनांचा डंका पिटत असताना, दुसरीकडे गरजवंतांची फरपट होत असल्याची स्थिती आहे. १४,००९ लाडली लक्ष्मी व ३,४५६ गृहिणी आपले अर्ज कधी मंजूर होतात या प्रतीक्षेत आहेत. त्यासाठी कार्यालयात हेलपाटेही मारत आहेत.

महिला बालकल्याण खात्याच्या सार्वजनिक माहिती अधिकारी कृतिका नाईक यांच्याकडून 'लोकमत'ला आरटीआय अर्जातून ही माहिती मिळाली आहे.

गृहआधार - विधवांबाबत योजनेची घोषणा; पण अंमलबजावणी नाही 

दरम्यान, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात एक घोषणा केली होती की, गृहआधारचा लाभ घेणाऱ्या गृहिणींचा कुंकवाचा आधार गेल्यास त्यांना गृहआधारचे १५०० व विधवांना समाज कल्याण खात्याच्या योजनेतून मिळणारे २५०० मिळून चार हजार रुपये दिले जातील. त्यासाठी एकच योजना असेल. परंतु याची अजून कार्यवाही झालेली नाही, असेही उघड झाले आहे.

गृहआधारचे केपेत सर्वाधिक, दाबोळीत किमान अर्ज 

गेल्या आर्थिक वर्षातील अर्ज मंजुरीची आकडेवारी नजरेखाली घातली असता 'गृहआधार'चे सर्वांत जास्त ३९२ अर्ज काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांच्या केपे मतदारसंघात मंजूर झालेले आहेत, तर सर्वांत कमी ४५ अर्ज मंत्री माविन गुदिन्हो यांच्या दाबोळी मतदारसंघात मंजूर झालेले आहेत.

फोंड्यात सर्वाधिक, ताळगावात कमी अर्ज 

दुसरीकडे 'लाडली लक्ष्मी'चे सर्वाधिक २३७ अर्ज कृषिमंत्री रवी नाईक यांच्या फोंडा मतदारसंघात मंजूर झालेले आहेत, तर सर्वांत कमी ६७ अर्ज आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या ताळगाव मतदारसंघात मंजूर झालेले आहेत.

विजय सरदेसाईंची सरकारवर टीका 

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले की, गृहआधार असो किंवा दयानंद सामाजिक सुरक्षा योजना, लाभार्थीच्या बँक खात्यांमध्ये महिन्याच्या पहिल्या पाच दिवसात पैसे जमा व्हायला हवेत. पर्रीकर मुख्यमंत्री असताना कल्याणकारी योजनांच्या बाबतीत त्यांचा नेहमीच हा कटाक्ष असायचा. गरजूंचे अर्ज मंजूर होत नाहीत आणि मंजूर झाले तर लाभार्थीना वेळेवर पैसे मिळत नाहीत, ही शोकांतिका आहे. सरकार इव्हेंटवर वायफळ खर्च करीत आहे. परंतु गरजूंचे अर्ज मात्र मंजूर न करता प्रलंबित ठेवले जात आहेत.'

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणState Governmentराज्य सरकारRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ताLokmatलोकमत