शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

फेरीबोटीसाठी दुचाकींना १५० तर चारचाकींना ६०० रुपयांचा पास; येत्या १५ दिवसांत अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 09:43 IST

यापुढे दुचाकींनाही शुल्क द्यावे लागणार: शिरोडकर.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गेल्या अनेक वर्षांपासून फेरीबोटीतून मोफत प्रवास करणाऱ्या दुचाकीवाल्यांना आता प्रति महिना १५० रुपयांचा पास काढावा लागणार आहे. तर पास नसल्यास प्रत्येक फेरीला १० रुपये आकारले जाणार आहेत. तसेच चारचाकी वाहनांनाही ६०० रुपयांचा महिन्याचा पास काढावा लागणार असल्याची माहिती नदी परिवाहन खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

नदी आणि परिवहन खात्याकडून येत्या १५ दिवसात या निर्णयाची अंमलबजावणी सुरु केली जाणार आहे. नदी परिवाहन खात्याकडे एकूण ३२ फेरीबोटी आहेत. त्यापैकी २८ फेरीबोटी या राज्यात १८ जल मागांवर कार्यरत आहेत. राज्यातील फेरीबोटीत दुचाकींना मोफत प्रवेश देण्यात येत होता. परंतु आता खात्याला मोफत सेवा देणे परवडत नसल्याने शुल्क लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री शिरोडकर यांनी सांगितले. ज्या वाहकांकडे पास नसेल त्या दुचाकीवाल्यांना १० रुपये शल्क भरावे लागणार असल्याचे शिरोडकर म्हणाले.

फेरीबोटीतून वर्षाला फक्त ७० लाख रुपये इतके उत्पन्न मिळत आहे. खाते प्रति ताफ्यासाठी वर्षाला सुमारे १ कोटी रुपये खर्च करते. दर महिन्याला प्रत्येक फेरी बोटीवरील कर्मचाऱ्यांच्या पगारावरही २.५ लाख रुपये खर्च करावे लागतात, त्यानंतर इंधन शुल्क आणि देखभाल खर्चही आहे. हे सर्व खात्याला न परवडणारे असल्याचे मंत्री शिरोडकर यांनी असल्याचे मंत्री शिरोडकर यांनी सांगितले.

नद्यांवर पूल नसल्याने गोव्यात ज्या जलमार्गावर फेरीबोट सेवा चालू आहे, त्यातील रायबंदर- चोडण फेरीसेवा ही नेहमीच वर्दळीची असते. केवळ चोडण बेटावरील लोकच या फेरीसेवेवर अवलंबून नाहीत, तर डिचोली, मये भागातील लोकही पणजीला येण्यासाठी चोडण फेरीबोटीचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. हा जलमार्ग राज्यातील सर्वात व्यस्त असा जलमार्ग आहे. एका फेरीबोटीच्या दिवशी सुमारे १२० फेऱ्या होतात.

वर्षाला ४५ कोटी खर्च

खात्याला ३२ फेरीबोटी चालवण्यासाठी वर्षाला ४५ कोटी रुपये खर्च करावे लागतात. मात्र शुल्क लागू केल्यानंतर किमान ४ कोटी तरी महसूल मिळणार आहे. उत्पन्नाची खर्चाशी तुलना केली तर तर ते खूपच कमी आहे. फेरीबोट चालविण्यासाठी दररोज किमान १०० लिटरच इंधनाची गरज असते.

चारचाकीवाल्यांना आता ४० रुपये

दिवाडी- जुने गोवे, सांपेद्र-दिवाडी, रासई- दुर्भाट, केरी- तेरेखोल, पणजी-बेती, वाशी- आमई, कामुल तुयें या फेरीबोटीही नेहमीच व्यस्त असतात. मडकई- कुठ्ठाळी फेरीबोटीतून अनेक वाहनधारक वास्कोत कामा, धंद्याला जाण्याठी प्रवास करीत असतात. या वाहनधारकांना फटका बसेल. बेटांवर राहणाऱ्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जाणायांना चारचाकीसाठी ये-जा करतानाचे ८० रुपये तिकीट मोजावे लागेल.

नदी परिवाहन खात्याने फक्त १५० रुपये शुल्क आकरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांना महिन्याचा पास दिला जाणार आहे. यातून ते किती वेळाही प्रवास करा शकतात. आम्ही दुचाकीवाल्यांकडून मोठी रक्कम आकारलेली नाही. - मंत्री सुभाष शिरोडकर, नदी परिवाहन खाते.

 

टॅग्स :goaगोवा