शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
4
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
7
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
8
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
9
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
10
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
11
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
12
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
13
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
14
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
15
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
16
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
17
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
18
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
19
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
20
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
Daily Top 2Weekly Top 5

फेरीबोटीसाठी दुचाकींना १५० तर चारचाकींना ६०० रुपयांचा पास; येत्या १५ दिवसांत अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 09:43 IST

यापुढे दुचाकींनाही शुल्क द्यावे लागणार: शिरोडकर.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गेल्या अनेक वर्षांपासून फेरीबोटीतून मोफत प्रवास करणाऱ्या दुचाकीवाल्यांना आता प्रति महिना १५० रुपयांचा पास काढावा लागणार आहे. तर पास नसल्यास प्रत्येक फेरीला १० रुपये आकारले जाणार आहेत. तसेच चारचाकी वाहनांनाही ६०० रुपयांचा महिन्याचा पास काढावा लागणार असल्याची माहिती नदी परिवाहन खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

नदी आणि परिवहन खात्याकडून येत्या १५ दिवसात या निर्णयाची अंमलबजावणी सुरु केली जाणार आहे. नदी परिवाहन खात्याकडे एकूण ३२ फेरीबोटी आहेत. त्यापैकी २८ फेरीबोटी या राज्यात १८ जल मागांवर कार्यरत आहेत. राज्यातील फेरीबोटीत दुचाकींना मोफत प्रवेश देण्यात येत होता. परंतु आता खात्याला मोफत सेवा देणे परवडत नसल्याने शुल्क लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री शिरोडकर यांनी सांगितले. ज्या वाहकांकडे पास नसेल त्या दुचाकीवाल्यांना १० रुपये शल्क भरावे लागणार असल्याचे शिरोडकर म्हणाले.

फेरीबोटीतून वर्षाला फक्त ७० लाख रुपये इतके उत्पन्न मिळत आहे. खाते प्रति ताफ्यासाठी वर्षाला सुमारे १ कोटी रुपये खर्च करते. दर महिन्याला प्रत्येक फेरी बोटीवरील कर्मचाऱ्यांच्या पगारावरही २.५ लाख रुपये खर्च करावे लागतात, त्यानंतर इंधन शुल्क आणि देखभाल खर्चही आहे. हे सर्व खात्याला न परवडणारे असल्याचे मंत्री शिरोडकर यांनी असल्याचे मंत्री शिरोडकर यांनी सांगितले.

नद्यांवर पूल नसल्याने गोव्यात ज्या जलमार्गावर फेरीबोट सेवा चालू आहे, त्यातील रायबंदर- चोडण फेरीसेवा ही नेहमीच वर्दळीची असते. केवळ चोडण बेटावरील लोकच या फेरीसेवेवर अवलंबून नाहीत, तर डिचोली, मये भागातील लोकही पणजीला येण्यासाठी चोडण फेरीबोटीचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. हा जलमार्ग राज्यातील सर्वात व्यस्त असा जलमार्ग आहे. एका फेरीबोटीच्या दिवशी सुमारे १२० फेऱ्या होतात.

वर्षाला ४५ कोटी खर्च

खात्याला ३२ फेरीबोटी चालवण्यासाठी वर्षाला ४५ कोटी रुपये खर्च करावे लागतात. मात्र शुल्क लागू केल्यानंतर किमान ४ कोटी तरी महसूल मिळणार आहे. उत्पन्नाची खर्चाशी तुलना केली तर तर ते खूपच कमी आहे. फेरीबोट चालविण्यासाठी दररोज किमान १०० लिटरच इंधनाची गरज असते.

चारचाकीवाल्यांना आता ४० रुपये

दिवाडी- जुने गोवे, सांपेद्र-दिवाडी, रासई- दुर्भाट, केरी- तेरेखोल, पणजी-बेती, वाशी- आमई, कामुल तुयें या फेरीबोटीही नेहमीच व्यस्त असतात. मडकई- कुठ्ठाळी फेरीबोटीतून अनेक वाहनधारक वास्कोत कामा, धंद्याला जाण्याठी प्रवास करीत असतात. या वाहनधारकांना फटका बसेल. बेटांवर राहणाऱ्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जाणायांना चारचाकीसाठी ये-जा करतानाचे ८० रुपये तिकीट मोजावे लागेल.

नदी परिवाहन खात्याने फक्त १५० रुपये शुल्क आकरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांना महिन्याचा पास दिला जाणार आहे. यातून ते किती वेळाही प्रवास करा शकतात. आम्ही दुचाकीवाल्यांकडून मोठी रक्कम आकारलेली नाही. - मंत्री सुभाष शिरोडकर, नदी परिवाहन खाते.

 

टॅग्स :goaगोवा