शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत १३ हजार रेशन कार्ड अपात्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 07:25 IST

सत्तरीत सर्वांधिक, तर धारबांदोडा सर्वांत कमी

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गेल्या पाच वर्षात राज्यातील तब्बल १३ हजार ४७६ रेशन कार्डधारकांनी आपले कार्ड अन्न व नागरी पुरवठा खात्याकडे परत केले आहेत. राज्यातील सर्व १२ तालुक्यांमध्येही अपात्र कार्ड परत करण्यात आले असून, यात सत्तरी तालुक्यातून सर्वाधिक म्हणजे २ हजार ४८२ घरांनी रेशन कार्ड परत केले आहेत, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

राज्यात २०२० ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत राज्य सरकारने केंद्र सरकारच्या निर्देशानुसार वार्षिक उत्पन्न ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असलेल्या कुटुंबांना त्यांचे रेशन कार्ड परत करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अनेक कुटुंबांनी स्वेच्छेने आपले कार्ड परत केले आहे. बार्देश तालुका दुसऱ्या क्रमांकावर असून, येथील १ हजार ९४५ कुटुंबीयांनी रेशन कार्ड परत केले आहेत, तर तीसवाड तालुक्यात १ हजार ६४८ कुटुंबीयांनी रेशन कार्डचा त्याग केला आहे.

२.६२ लाख रेशन कार्डधारक राज्यात एकूण २.६२ लाख रेशन कार्डधारक असून, त्यापैकी १३ हजार ५०० कार्डधारकांनी कार्ड परत केले आहेत. यात प्राथमिक घरकुल (पीएचएच), अंत्योदय अन्न योजना (एएवाय) आणि गरिबी रेषेपेक्षा वर (एपीएल) या तिन्ही गटांमधील कुटुंबांचा समावेश आहे. धारबांदोडा तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ४२९, फोंड्यात ५४१, तर सांगेमध्ये ६२९ कार्डधारकांनी रेशन कार्ड परत केले आहेत.

रेशन कार्ड परत करण्यासाठी संबंधितांना फॉर्म 'डी' भरून तालुका नागरी पुरवठा कार्यालयात ३० दिवसांच्या आत सादर करावा लागतो. केंद्र सरकारने राज्यांना अशा अपात्र लाभार्थ्यांची ओळख पटवून त्यांना सार्वजनिक वितरणप्रणाली (पीडीएस) मधून वगळण्याचे निर्देश दिले आहेत. 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (एनएफएसए) अंतर्गत करदाता व सरकारी नोकरांना रेशन कार्ड ठेवण्यास मनाई आहे. त्यामुळे अशा व्यक्तींनी आपले कार्ड स्वेच्छेने परत करावेत, असे आवाहन खात्याने केले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : 13,000 Ration Cards Surrendered in Goa Over Five Years

Web Summary : Over the past five years, 13,476 ration cardholders in Goa voluntarily surrendered their cards to the Food and Civil Supplies Department. The initiative followed government appeals to families exceeding a ₹50,000 annual income. Sattari saw the highest number of surrenders.
टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकार